<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-29976021</id><updated>2011-12-02T01:06:06.047+09:00</updated><category term='panchavati'/><category term='liquor'/><category term='nashik'/><category term='crime'/><category term='मराठी साहित्य'/><category term='gavwala'/><title type='text'>एका गाववाल्याचा ब्लॉग</title><subtitle type='html'>गावच्या बाता, गावाकडल्या गोष्टी, गावच्या आठवणी आणि इतर बऱ्याच गोष्टींची देवाण घेवाण करणारा एका खेडूताचा ब्लॉग</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>26</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-8860383494855022030</id><published>2011-11-30T20:45:00.000+09:00</published><updated>2011-11-30T20:45:38.111+09:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='liquor'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='crime'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='panchavati'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='nashik'/><title type='text'>कॉलेज तरुणाईही गावठी दारूच्या विळख्यात</title><content type='html'>तपोवन परिसरात रस्त्यावरच असलेल्या एका घरात घसून एका 50 वर्षीय दारूड्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्या मुलीच्या वडीलांनी त्या इसमाला रस्त्यावरच चोप दिला तेव्हा इतरांना खरा प्रकार समजला.... &lt;br /&gt;&lt;br /&gt;सरकारी खात्यात काम करीत असलेल्या येथीलच एका इसमाला वाघाडी परिसरातील गावठी दारूचे व्यसन लागले आणि ऐन पंचेचाळीशीतच दारूमुळे त्याला कुटुंबाला उघड्यावर सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अनेकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या अशा दुर्घटना केवळ पंचवटीतच नाही, शहरातील बऱ्याच भागात घडत असून त्याला कारणीभूत आहे वाघाडी परिसरात खुलेआम होत असलेली गावठी दारूची विक्री ! याठिकाणी उसाच्या गुऱ्हाळाप्रमाणे गावठी दारूचे अनेक अड्डे असून भल्या पहाटेपासूनच तेथे राजरोसपणे दारू विक्रीला सुरवात होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;जुना आडगांव नाक्‍यावरून निमाणी बस स्टॅंडकडे जाताना वाघाडी नाल्यावर एक पूल लागतो. या पूलावरून उजव्या हाताच्या पायऱ्यांनी खाली असलेल्या वसाहतीत शिरले की समोर जे दृश्‍य दिसत, ते पाहून कुणीही चांगला माणूस चक्रावतो. पायऱ्या संपल्या की नाल्याच्या कडेलाच अनेक दारूडे अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. बाजूलाच काही हातगाड्यांवर अंडी, भेळ अशा पदार्थांची विक्री सुरू असते. तिथेही काही दारूडे खरेदीसाठी उभे असतात. सायंकाळी तर या गर्दीत आणि पिऊन पडलेल्या माणसांच्या संख्येत बरीच वाढ झालेली असते. मध्येच एका अति-प्यायलेल्या माणसाला दोन जण कचऱ्याचे पोते फेकावे तसे पायऱ्यांजवळच्या कोपऱ्यात फेकत असतात. जवळच एक चांगले कपडे घातलेला, पर चेहऱ्यावर रगेलपणाचे भाव असलेला इसम त्या दोघांना फेकण्यासंदर्भात सूचना करत असतो, "दूर टाका त्याला, इथे टाकले तर त्रास देईल.' &lt;br /&gt;महापालिकेने या भागात सिमेंटचे पक्के रस्ते, नाल्याला जाळ्या बांधलेल्या असल्यामुळे नवख्या माणसाला येथे दारूचे अनेक अड्डे असतील याचा अंदाज बांधणे कठीण जाते. मात्र येथील काही झकपक दिसणाऱ्या घरांच्या शेजारच्या बोळातून आत घुसले की दारूच्या अड्ड्याचे "टिपीकल' दर्शन होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एका पत्र्याच्या शेडमध्ये जमिनीवरच अस्ताव्यस्त कपडे घालून, पुढ्यात प्लॅस्टिकचा मग घेऊन काही जण बसलेले असतात. त्यातील काहींचे पिणे सुरू असते. तर काही मटकी वगैरे खात असतात. आतून एक प्रौढ बाई त्यांना या पदार्थांचा पुरवठा करत असते. शेजारीच असलेल्या भिंतीशी 20 ते 25 लिटर क्षमतेचे पाच ते सहा ड्रम गावठी दारूने भरलेले असतात. एका पत्र्याच्या खुर्चीवर बसलेला शेठ "मग्ग्या'च्या हिशेबाने गावठी दारूची विक्री सुरू असते. पार्सल सेवाही इथे पुरवली जाते. 16 ते 18 रुपये दराने एक मग्गा (सुमारे अर्धा लिटर) गावठी दारू विकली जाते. शौकिनांना सोडाही विकला जातो. याच पद्धतीचे पाच ते सहा अड्डे येथे खुले आम सुरू असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt; आपण दोन मग्ग्यांची मागणी करतो. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित दारू पार्सलमधून दिली जाते. पार्सलला फुगा असे म्हणताता. "भाऊ तू कुठल्या कॉलेजचा? इथे बाजूच्या अनेक कॉलेजची पोरं येतात नेहमी'' पार्सल देणारा शेठ माहिती पुरवतो. ""पोलिसांचं काही टेंशन असलं, इतर काही प्रॉब्लेम असला तर बिनधास्त सांग, आपण कधीही मदत करू'' असे आश्‍वासन देत गिऱ्हाईक पटविण्याचा प्रयत्न करतो. आपण "फुग्यां'चे पार्सल घेऊन निघतो, तेव्हा दारात अनेक दारूडे अस्ताव्यस्त झिंगत पडलेले दिसतात. &lt;br /&gt;&lt;br /&gt;वाघाडी नाल्यातील हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून रासरोसपणे सुरू असल्याची माहिती येथील रहिवाशी पुरवतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत येथे दारूची विक्री चालते, तर रात्री उशीरा आणि पहाटे दारू गाळपाचा कार्यक्रम चालतो. विशेष म्हणजे या व्यवसायात राजकारण्यांसह अनेक बड्या मंडळींचा हात गुंतलेला असल्याची दबकी चर्चा येथील नागरिक करतात. अनेक वेळा हा प्रश्‍नही चव्हाट्यावर येतो, पण त्याकडे दुर्लक्षच करण्याचे सोयीस्कर धोरण राजकारण्यांसह प्रशासनही राबवित असल्याने, गावठी दारूचा हा व्यवसाय आता अनेकांनी रोजीरोटीचे साधनच केला असल्याचे चित्र आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-8860383494855022030?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/8860383494855022030/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=8860383494855022030&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/8860383494855022030'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/8860383494855022030'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2011/11/blog-post.html' title='कॉलेज तरुणाईही गावठी दारूच्या विळख्यात'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-1607039419957288229</id><published>2011-01-13T23:42:00.002+09:00</published><updated>2011-01-14T02:24:21.245+09:00</updated><title type='text'>एक "राज'कीय खेळी</title><content type='html'>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या सबुरीने निषेध नोंदवत आपल्या राजकीय मुरब्बीपणाचे (आणि मुत्सद्दीपणाचे) चांगलेच दर्शन घडविले. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या जाहीर सभेची सर्वांनाच मोठी उत्सुकता होती; आणि तशी उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी सुरवातीपासूनच राज ठाकरेंनी अगदी पद्धतशीरपणे प्रयत्न केला. आजच्या माध्यमकाळात असा प्रयत्न यशस्वी झाला नसला तरच नवल. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी ज्या संख्येने लोक उपस्थित होते, त्यावरून याची प्रचिती यावी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;औरंगाबाद येथील राज यांचे भाषण आगामी "राज'कारणाचा वेध घेणारे होते. सुरवातीलाच त्यांनी आमदार हर्षवर्धन जाधवांचा दोष असेल आपण त्यांचे समर्थन करणार नाही, अशी थोडीशी पडती वाटणारी भूमिका घेतली. त्यातून त्यांची आपल्या पक्षातील (आणि स्वत:च्या नेतृत्वातीलही) शिस्त मोठ्या खुबीने दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे संबंधित पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी केली. या मागणीमुळे मनसेच्या सर्वच कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांनाही आनंद वाटणे स्वाभाविक होते. त्यांना तसे वाटू देणे किंवा आपण तुमच्या पाठीशी आहोत ही भावना निर्माण करण्यात राज यशस्वी झाले.त्यातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील स्वतः:च्या चांगल्या नेतृत्वाची प्रतिमा सहजपणे भक्कम केली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;खरे तर पोलिसांच्या विरुद्ध धागा पकडून पुढे बोलता आले असते. पण नेमक्‍या याच ठिकाणी त्यांनी मुत्सद्दीपणा दाखवत, अशा घटनेत पोलिसांचा कसा वापर होतो, पोलिसांना आमचे नेहमीच कसे सहकार्य असते, या अर्थाचे बोलणे केले. त्याद्वारे पोलिसांचे मत आपल्याविषयी आणि मनसेविषयीही अनुकूल करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. विशेषतः: गृहमंत्री आर.आर.पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी आगपाखड केली. खरे तर तर राज्य सरकार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांच्या आघाडीचे. तेव्हा राज यांना आघाडी सरकारवरच थेट टीका करता आली असती. पण यातही त्यांनी राजकीय खेळी साधत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना लक्ष्य केले. त्यामुळे झाले असे की संपूर्ण सरकारवर टीकेची झोड उठविली, असा त्याचा अर्थ न होता तो केवळ काही मंत्र्यांपुरताच मर्यादित राहिला. या सगळ्यांमधून पोलिस आणि कॉंग्रेसचे एकप्रकारे लांगूलचालनच राज यांनी केले. (भविष्यात आघाडीत फूट पाडता येते का, याचाही राज यांचा छुपा मानस असू शकतो. त्यातून होणारा राजकीय फायदा अर्थातच मोठा असेल.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वसामान्य जनता, मनसेचे कार्यकर्ते, पोलिस आणि कॉंग्रेसवाले अशा सर्वांनाच आपल्या बाजूला ओढण्याची अप्रत्यक्ष राजकीय खेळी खेळण्यात राज यशस्वी झाले आहेत. या सगळ्या प्रकाराचे भविष्यात वेगळे परिणाम होतील. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे भविष्यात कदाचित बदलू शकतात, असेच एकंदर राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून जाणवते. ज्यांना राज यांच्या ठाकरी शैलीतील भाषणांची आवड आहे, त्यांच्यासाठी मध्ये-मध्ये तशा शैलीचा आधारही त्यांनी घेतला. जसे की, मुख्यमंत्र्यांना जुन्या काळातील खलनायकासारखे दिसतात असे म्हणणे. असे काही तोंडी लावण्यापुरते एक दोन प्रसंग सोडले, तर एकूणच संपूर्ण भाषण अतिशय संयमाने आणि भविष्यसूचक राजकीय चालींनीच भरलेले होते. थोडक्‍यात काय तर औरंगाबादच्या भाषणावर असलेल्या सरकारी मर्यादेच्या चौकटीतूनच राजकीय खेळीचा बाण सोडण्यात राज ठाकरेंना बऱ्यापैकी यश आले, असेच म्हणावे लागेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-1607039419957288229?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/1607039419957288229/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=1607039419957288229&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/1607039419957288229'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/1607039419957288229'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2011/01/blog-post.html' title='एक &quot;राज&apos;कीय खेळी'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-1349079923991840283</id><published>2010-05-21T20:40:00.004+09:00</published><updated>2010-05-21T21:10:15.817+09:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='मराठी साहित्य'/><title type='text'>दभिंशी मुक्त संवाद</title><content type='html'>&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/S_FL3wWrz4I/AAAAAAAAAdQ/Hqbv8cUR9bw/s1600/15052010998.jpg"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://2.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/S_FL3wWrz4I/AAAAAAAAAdQ/Hqbv8cUR9bw/s320/15052010998.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5472238443476799362" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;br /&gt;मागच्याच आठवड्याची गोष्ट.&lt;/strong&gt; संध्याकाळच्या वेळेस घराजवळ अचानकच दभिंची भेट झाली. ओघाओघाने गप्पा मारणेही आलेच. बऱ्याच विषयांवर अनौपचारिक गप्पा झाल्या. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने गेल्या दीड महिन्यात त्यांनी बऱ्याच गावांना, संस्थांना भेटी दिल्या. त्याविषयी बोलणे झाले. बोलण्याच्या ओघात त्यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या आत्मचरित्राचा, "अपार्थिवाचा यात्री'चा उल्लेख आला. दभिंसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांचे आत्मचरित्र म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वाचकासाठी एक जिज्ञासेचाच विषय. त्यात हे आत्मचरित्र विरळा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यात आयुष्यातील घटना आणि प्रसंग यापेक्षा वास्तू आणि स्थळे यांना केंद्रस्थानी ठेवले आहे. पण तुमच्या आयुष्यात काही तरी घटना, प्रसंग घडले असतीलच ना? असे त्यांना जरा धीर धरूनच विचारले. मग त्यांनीही मोकळेपणाने एक दोन प्रसंग सांगितले. शेवटी न राहवून त्यांना यासंदर्भात बोलण्यासाठी खास वेळ मागितली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी वेळ दिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मनात अनेक प्रश्‍न आणि कुतूहल घेऊनच सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. ते तयारच होत होत. अनौपचारिक बोलणे झाल्यानंतर मी पुन्हा आदल्या दिवशीचाच प्रश्‍न विचारला. म्हणालो की तुमच्या येणाऱ्या आत्मचरित्रात ज्याचा उल्लेख आला नाही, ते तुम्ही वाचकांना सांगायचे आहे. त्यावर ते हसले. म्हणाले,"माझ्या आयुष्यात सनसनाटी असे काही घडले नाही, तरीही साहित्याच्या प्रवासासंदर्भात काही प्रसंग आणि घटना सांगतो.' (अर्थात मी कान टवकारलेच होते)&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांनी पुढे बोलायला सुरवात केली. "हे पहा, वयाच्या बाराव्या वर्षांपासून आज शहात्तराव्या वर्षापर्यंत मी लिहितोय. सुरवातीला शाळेमध्ये निबंध आणि लघुनिबंध लिहिले, ते काही प्रकाशित केले नाही. माझे जे शिक्षक होते, मधुकर आणे गुरुजी, त्यांना ते लघुनिबंध आवडायचेत. ते म्हणायचे इतके सुंदर निबंध मी सुद्धा लिहू शकत नाही. म्हणायचे, हा मुलगा मोठा साहित्यिक होणार आहे. माझ्याबद्दल पहिलं साहित्यिक भविष्य या आणेगुरुजींनी वर्तविले. इथेच ते थांबले नाहीत तर मला नाना प्रकारची पुस्तके त्यांनी वाचायला दिली. वाङमयावर त्यांचं खूप प्रेम होतं. पण ते कधीही म्हटले नाहीत, की तू मेळ्यात ये, नाटकात ये. कारण त्यांना माझी अंतर्मुख वृत्ती माहीत होती. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक शिक्षक असतो, की जो सुप्त गुण ओळखतो. आणे गुरुजी बी.ए. झालेले होते.आश्‍चर्य म्हणजे मी जेव्हा विद्यापीठात एम.ए. शिकवायला लागलो, तेव्हा ते म्हणाले की मला तुझ्या वर्गात बसायचे आहे. मुद्दा हा की लहानपणापासून असं वाटायचं, की जेव्हा लिहिता वाचता येत नव्हतं, तेव्हापासून वाटायचं की आपण लेखक व्हावं. इतर लहानसहान गोष्टी करत होतो, पण त्या आपद्‌धर्म म्हणून करत होतो. हे कुठून आलं? कसं आलं? हे आज मी सांगू शकेल, त्या काळात असं काही नव्हतं. कारण माझे बहिणभाऊ काही लिहीत नव्हते. वाचनाचं वेड तसं साऱ्यांनाच होतं पण लेखनाचं वेड माझ्यात उपजतच आहे, असं म्हटलं पाहिजे. अजूनही शहात्तराव्या वर्षी मी लिहितो. मला अजून खूप लिहायचंय आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी लिहीत राहीन, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण स्फुरण येतंच असतं, काहीतरी नवनवीन सुचतंच असतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जेव्हा मी सोळा-सतरा वर्षांचा झालो, अर्थातच पूर्ण वयात आलो, तेव्हा अर्थातच तारुण्याच्या लहरी माझ्या मनामध्ये उठायला लागल्या आणि लघुनिबंधाबरोबर मी कविता लिहायला लागलो. त्या कविता मला माझ्या आत्मस्वरासारख्या वाटत. त्या मी कुणाला दाखवत नसे, अगदी आणेगुरुजींना सुद्धा कविता दाखविल्या नाहीत. त्यात प्रेमकविता, निसर्गकवितांचा समावेश होता. वाचन अर्थातच लहानपणापासून खूप अफाट होतं. त्यामुळे कविता सहज स्फुरत होत्या. त्याकाळात आधार कुलकर्णी नावाचा माझा मित्र होता. त्यालाही वाचनांच खूप वेड होतं आणि दुसरा मित्र होता मधू वाजगावकर, पुढे तो माझा सहकारी सुद्धा राहिला. हे दोघे रामकृष्ण मठातील वसतिगृहात राहात होते. तिथे आध्यात्मिक प्रवाह सुरू झाला. त्यांच्या सहवासाने माझ्यामध्ये एक शिस्त येत गेली; वाचनाची-लिखाणाची. ते साहित्याबद्दल, छंदाबद्दल बोलायचे. त्यामुळे माझ्या त्या मुक्त वृत्तीला या दोघांच्या सहवासामुळे छान आकार येत गेला. कविता तर मी लिहीतच होतो. तेव्हा नागपूर आकाशवाणीने युवकांसाठी खूप मोठी काव्यस्पर्धा घेतली होती. तेव्हा सगळे म्हणायला लागले की तू कविता पाठव. मला वाटलं कशाला पाठवायचं? कारण मला याचे आकर्षण नव्हतं. माझी मोठी बहीण शिक्षिका होती, आणि आदर्श शिक्षिका होती. तिला आम्ही जीजी म्हणायचो. अक्षर अगदी सुंदर, शुद्धलेखन अगदी चोख. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. वक्तृत्व उत्तम होतं आणि चारित्र्यसंपन्न. जुन्या पिढीतील शिक्षक जसे असत की नाकासमोर चालायचं आणि आपल्या आयुष्याचं उद्दीष्ट विद्यार्थी घडवणं हेच असे. अशी ती होती. तर ती म्हणाली, की तू कविता लिहितोस तर स्पर्धेकडे का नाही पाठवत. मी म्हणालो की मला काही त्या स्पर्धेसाठी पाठवायच्या नाहीयेत. पण तिने माझी कवितांची वही घेतली. त्याच्यातली एक कविता निवडली आणि ती आकाशवाणीला पाठवली. नंतर त्या कवितेला प्रथम पारितोषिक मिळालं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या कवितेचं नाव होतं "बारा आणि तास शलाका'. घड्याळाकडे पाहून मला सुचलेली ती कविता आहे. त्यातील बारा म्हणजे प्रियकर आणि तास काटा (की ज्याचे मी तास शलाका असे स्त्रीलिंगी रूप केले) प्रेयसी. आधुनिक युगाशी संबंधित आणि प्रेमाच्या भावनेवर आधारित ही दोन भागांमध्ये ही कविता होती. कविता परीक्षकांना फारच आवडली आणि माझा मोठा सत्कार झाला. नागपूर आकाशवाणीवर माझी मुलाखत, मोहन नगरकर नावाच्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. मला प्रश्‍न विचारला, कोणता कवी विशेष आवडतो? क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो, की मला बा.सी. मर्ढेकर हा कवी आवडतो. तर सगळेच उडाले. कारण बा.सी. मर्ढेकर तेव्हा वादग्रस्त समजले जायचे. माझ्या कवितांवर तेव्हा बालकवी आणि मर्ढेकर यांचा संस्कार होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या घटनेनंतर माझे प्रकाशनपर्व सुरू झाले. माझ्या कविता दैनिकांत, नियतकालिकांत प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यातील काही द.भि. कुलकणी या नावाने तर काही दत्ता कुलकर्णी या नावाने प्रसिद्ध होत असत. असे असले तरीही माझी कविता मला कधीही समाधान देत नव्हती. कारण माझ्या कवितांवर बालकवी, मर्ढेकर यांच्यासारख्या कवींचा संस्कार होता. त्यामुळे एक कवी म्हणून नाही, तर एक रसिक म्हणून मी त्या लिहिल्या असे मला वाटते. माझी पत्नी शिवरंजनी (आता ती हयात नाही) एकदा एका नियतकालिकाला मुलाखत देताना म्हणाली, की ज्या शक्तीच्या प्रेरणेमुळे कवी लोक कविता लिहितात, त्याच शक्तीच्या प्रेरणेमुळे दभि समीक्षा लिहितात. हे तिचे माझ्याबद्दल आणि समीक्षेबद्दलचे मत. ते ऐकल्यावर मी पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्ही सुरवातीलाच प्रेमकवितांचा उल्लेख केला. आता पुन्हा एकदा प्रेमात पडलो असे म्हणालात, याचा अर्थ तुमचा प्रेमविवाह झालाय का? तसे असेल तर त्याबद्दल आम्हालाही सांगा. &lt;br /&gt;&lt;br /&gt;असे विचारल्यावर दभिंचा चेहरा जरा खुलतो. थोडेसे हसूनच सांगायला लागतात, "त्यावेळेस मी एम.ए.चा बहिःस्थ विद्यार्थी होतो आणि एका कॉलेजमध्ये शिकवत असे. तिथे रजनी गाडगीळ नावाची एक विद्यार्थिनी होती. गोरी, घारी, दिसायला सुंदर. तेव्हा तिचे वय 19 असेल आणि माझे 24 वर्षे. ती आमच्या घराजवळच राहायची. बरेचदा ती आमच्याघरी येत असे. एकदा अशीच आलेली असताना, घराच्या जिन्याजवळच तिने मला विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का? माझ्या अंतर्मुख स्वभावामुळे मी तिला लग्नाबाबत विचारणार नाही, असे तिला वाटले असावे. अर्थात मलाही ती आवडत होतीच. मग दोघांनीही या विषयी एकमेकांच्या घरी सांगितले. तिला वडील नव्हते. ती कोकणस्थ आणि मी देशस्थ यामुळे दोघांच्याही घरच्यांनी थोडी कुरकूर केली. मला तेव्हा काही मोठ्या पगाराची नोकरी नव्हती, शिवाय मी दिसायला बारीक, सावळा. त्यामुळेही तिच्या घरून थोडा विरोध झाला. पण नंतर मी एम. ए. ला पहिला आलो. मी प्राध्यापक होऊन स्थिरावणार म्हणून मग दोन्हीकडचा विरोध मावळला आणि आमच्या लग्नाला संमती मिळाली आणि रजनी गाडगीळची शिवरंजनी कुलकर्णी झाली. आमच्या बाबतीत आणखी एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते. ती म्हणजे त्या काळी आम्ही लग्नापूर्वीच कुटुंबनियोजनाचा निर्णय घेतला होता. कारण माझे पीएचडीचे आणि माझ्या बायकोचे बीएचे शिक्षण सुरू होते. ते पूर्ण झाल्यावर लग्नानंतर चार वर्षांनी आम्हाला मुलगा अभिनंदन झाला. तोपर्यंत आम्हाला मूल होत नाही म्हणून घरच्यांना काळजी वाटायची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दभि आपल्या प्रेमाच्या आठवणीबद्दल सांगत असताना, मध्येच माझ्या मनात प्रश्‍न आला. कविता, समीक्षा, प्रेम वगैरेमधून हा माणूस आध्यात्मिकबाबीकडे कसा पोचला असावा? ज्ञानेश्‍वरीचे उल्लेख यांच्या बोलण्यातून वारंवार का येतात? त्यांचे एकमेकांशी काय नाते आहे. हा प्रश्‍न त्यांना विचारला. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मग ते थोडे गंभीर होऊन सांगू लागले, " नागपूरला आमच्या घराजवळच रेल्वेचा दवाखाना होता. रेल्वेखाली येऊन अपघात झाल्यावर जखमींना, मृतांना तेथे आणत. अनेकदा त्या दवाखान्याच्या अंगणात प्रेतं ठेवलेली असत. एका तर एक मरणोन्मुख माणूस त्याही अवस्थेत म्हणत होता - मले पेरू पाहिजे, मले पेरू पाहिजे. तो काही पेरूचा हंगाम नव्हता. पण मरतानाही त्याची इच्छा कायम होती. एकाच क्षणी चालणारी बोलणारी माणसं, दुसऱ्याच क्षणी अशी कशी संपतात, हे पाहून माझ्या मनावर खूप परिणाम झाला आणि नंतर मीही माणसाच्या या प्रवासाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तुला सांगतो, माझ्या सगळ्या साहित्यावर या गोष्टीचा सतत प्रभाव राहिला आहे. हा माझा अधिबंध झाला आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने माझ्या अध्यात्माच्या प्रवासाला सुरवात झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता तुमच्या ज्ञानेश्‍वरीच्या प्रेमाबद्दल सांगा, मी मध्येच त्यांना छेडतो. मग तेही आपले बोलणे सुरूच ठेवतात, "माझी आई धार्मिक वृत्तीची होती, तिला दासबोध, ज्ञानेश्‍वरी वगैरे ग्रंथांची आवड होती. ती निरक्षर होती. त्यामुळे माझ्याकडून ती ज्ञानेश्‍वरीचे वाचन करून घेई. ते वाचताना मला ज्ञानेश्‍वरीची गोडी लागली. दरम्यान आईच्या बरोबरीच्या बायका तिच्याबरोबरच ज्ञानेश्‍वरी ऐकण्यासाठी येऊ लागल्या. नंतर नंतर तर त्या तांदूळ आणि नारळ आणायला लागल्या. माझ्या वडिलांना हे समजल्यावर त्यांनी माझा "बुवा' होऊ नये म्हणून वाचन बंद केले. असे असले तरी ते मला ज्ञानेश्‍वरी वाचू नको असे म्हणाले नाही. त्यांनी बुवाबाजीला शह दिला पण माझे वाचन चालू ठेवले. त्यानंतरच्या काळात मी ज्ञानेश्‍वरी शिकलो, दुसऱ्यांनाही शिकवायला लागलो, नंतर त्यावर ग्रंथही लिहिले. इतकेच नाही तर माझा ज्योतिषाचाही अभ्यास आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्योतिष शब्द ऐकल्यावर मला जरा धक्का बसला. मी त्यांना हा काय प्रकार आहे? ते विचारले. यावर ते हसून म्हणाले, मी भविष्य पाहतो, हात पाहतो, माझ्याकडे अनेक कुंडल्या अभ्यासाला आहेत. हे बघ, या समोरच्या मांडणीत सर्वांत खाली ज्या फाइल ठेवल्या आहेत ना, त्या सर्व कुंडल्या आहेत आणि या मांडणीच्या सर्वांत वरच्या कप्प्यात ज्योतिषाची पुस्तके आहेत. तुला आश्‍चर्य वाटेल पण, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याच्या एक वर्ष आधी मी डोंबिवलीत झालेल्या ज्योतिष संशोधक संमेलनाचा अध्यक्ष होतो. त्यातील माझे भाषण सर्वांना आवडले. मुळात भविष्य वगैरे यावर माझा विश्‍वास नव्हता. माझे वडील बंधू हस्तरेषातज्ज्ञ होते. त्यांच्याशी या विषयावर वाद घालण्यासाठी मी हस्तरेषाशास्त्र शिकलो. त्यानंतरच्या काळात मी मुंबईला "पब्लिसिटी' विभागात नोकरीला असताना माझ्याबरोबर एक सहकारी होते. त्यांनी माझी पत्रिका पाहून काही भविष्य वर्तविले. पुढे ते खरे ठरत गेले. त्यामुळे मीही ज्योतिषाचा अभ्यास करायला लागलो. गेले तीस वर्ष हा अभ्यास मी करतोय. माझ्यामते ज्योतिष विद्या ही भविष्य सांगणारी विद्या नाही, तर तो एक अध्यात्माचा आविष्कार आहे. अध्यात्म मानवजातीचे विश्‍वातील स्थान काय? हे सांगते; तर मानव जातीतील एकेका व्यक्तीचे स्थान काय? हे ज्योतिष सांगते. पण ही गोष्ट आधी सांगितली असती तर लोकांनी माझ्याकडे रांगा लावल्या असत्या. आता मी पंचाहत्तर वर्षांचा आहे, त्यामुळे तुला सांगायला काही हरकत नाही. (ते मिस्कील हसतात.) &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी मात्र एकाच व्यक्तीचे कवी, शिक्षक, समीक्षक आणि ज्योतिषी असे पैलू असू शकतात? याबद्दल मनातल्या मनात आश्‍चर्य करतच त्यांचा निरोप घेतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-1349079923991840283?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/1349079923991840283/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=1349079923991840283&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/1349079923991840283'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/1349079923991840283'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2010/05/blog-post_21.html' title='दभिंशी मुक्त संवाद'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/S_FL3wWrz4I/AAAAAAAAAdQ/Hqbv8cUR9bw/s72-c/15052010998.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-66959627035868353</id><published>2009-04-29T20:38:00.000+09:00</published><updated>2009-04-29T20:39:20.482+09:00</updated><title type='text'>वास्तव पत्रकारीतेचे आणि आयुष्याचेही</title><content type='html'>पुण्यातील ऑफीसमध्ये बसून मी हा ब्लॉग लिहीतोय. आज २९ एप्रिलचा बुधवार आहे. आता दुपारचे ४.३० वाजलेत. साधारणत: सहा किंवा साडेसहाच्या दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागातून पुण्याच्या मुख्य आवृत्तीकडे बातम्या यायला सुरुवात होईल. त्यात मुख्यत: वाढत्या उन्हाळ्याच्या बातम्या असतील. उन्हामुळे होणाऱ्या त्रासाच्या बातम्या असतील. उष्माघाताच्या त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या बातम्याही त्यात असतील. कदाचित त्यात मालेगांव परिसरातील उष्माघाताची बातमीही त्यात असेल. आणि त्या बातमीत उष्माघाताने आज सकाळीच दगावलेल्या माझ्या लाडक्‍या मामाचेही नाव असेल. मात्र नेहमीच्या सवयीने मी ती बातमी कदाचित सहजरित्या संपादित करू शकणार नाही किंवा कदाचित मी ती वेबसाईटवर जलदरित्या "अपडेट' ही करू शकणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नेहमी इतरांच्या बातम्या निर्विकारपणे देणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकारासाठी हा मोठाच धक्का असेल. मग मी या सगळ्या विषयावर विचार करेल.... कदाचित स्वत:ला समजावेलही.... जगात रोज कितीतरी घटना घडतात त्यावेळेस आपल्याला काहीच वाटत नाही पण त्यात आपले कुणीतरी असले तरच आपण हेलावतो वगैरे वगैरे. अशीच स्वत:ची समजूत काढेल... किंवा हळूच बाजूला जाऊन कुणाच्या नकळत पोटभर रडून घेईल. मात्र हे दु:ख मामा तरुणपणातच तडकाफडकी गेल्याचे असेल की पुण्यापासून १५ तासांच्या अंतरावरील त्याच्या गावी गेलो तर त्याची राख तरी बघायला मिळेल की नाही याचे असेल; किंवा ही घटना बातमी म्हणून समजली या पत्रकारीतेल्या वास्तवाचे; ते मला स्वत:लाच नेमकेपणाने सांगता येणार नाही... हतबल आणि असहाय अशी माझी अवस्था असेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण एक गोष्ट मात्र पुन्हा पुन्हा मला जाणवेल; ज्याच्या भरवशावर आपण अनेक गोष्टी करतो, अहंकार करतो त्या आयुष्याच्या बेभरवसेपणाची, दगाबाज वृत्तीची...!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-66959627035868353?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/66959627035868353/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=66959627035868353&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/66959627035868353'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/66959627035868353'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='वास्तव पत्रकारीतेचे आणि आयुष्याचेही'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-6905821929991503791</id><published>2009-03-31T23:50:00.000+09:00</published><updated>2009-03-31T23:51:39.063+09:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='gavwala'/><title type='text'>आन्याबाई !</title><content type='html'>आन्याबाई ! तू आता या जगात नसली तरीही का कोण जाणे? तुझी आठवण मात्र नेहमी येत असते. तसा तुझा नी माझा काही संबंधच नव्हता. रक्ताचे नाते सोड पण तू तर माझी शेजारीही नव्हती किंवा माझ्या आई-आजी वगैरेंची मैत्रीण नव्हतीस. एका गल्लीत राहायचो इतकाच काय तो संबंध….आणि मी तर कित्ती कित्ती लहान होतो तेव्हा.. अगदी बालवाडीत जायचो. तरीही तू माझ्या पक्की लक्षात आहेत. आठवणीत आहेस?&lt;br /&gt;&lt;br /&gt;आन्याबाईऽऽऽ ! असे कसे गं तुझे नाव? गल्लीतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तुला आन्याबाईच म्हणायचे. आजी- काकू- मावशी असे शब्द कधी ऐकण्यात आले नाहीत. आणि तूही मोठ्या मनाने त्यांना प्रतिसाद द्यायची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुला माहिताय की आम्ही तुला गल्लीत नेहमीच बघायचो? तशी तू चारचौघात उठून दिसणारी म्हातारी नव्हतीच गं. चेहऱ्यावर सर्वत्र सुरकुत्या पडलेल्या. कमरेतून वाकलेली. जुनाट लुगडे नेसणारी. बुटक्‍या उंचीची आणि परिस्थितीने खूप गरीब असशील असे वाटणारी…. पण तरीही तुझ्याविषयी आकर्षण वाटायचे आम्हा मुलांना. तुला नेहमी बघायचो आम्ही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रोज सकाळी तुझा नियम ठरलेला असायचा. तो म्हणजे नळावरून पाणी भरणे. तुझ्याइतकेच जुने, कळकट आणि ठिकठिकाणी चेपलेले अल्युमिनियमचे पातेले घेऊन तू पाणी भरायला यायचिस; मुळात तुझ्याच्याने ते पातेलेही उचलायचे नाही इतकी तू थकलेली असायची. पण तू तरी काय करणार तुला सर्व करावेच लागायचे कारण एकटीच राहायचीस ना तू ! … तुझ्या त्या पाणी भरण्याचे मला काय कौतुक वाटायचे म्हणून सांगू…!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसा आपला दोघांचा संवाद झालाच नाही गं कधी… तुझ्याशी बोलायचं कसं हाच माझ्या मनात प्रश्‍न असायचा. मग तुझ्याविषयी कुतूहल वाटायचे सारखे. पण एकदा आपला संवाद झालाच. एकदा मी अंगणात खेळत असताना तू मला बोलावून घेतलेस. अन्‌ मीही धावत माडीवर असलेल्या तुझ्या घरी आलो. अन्‌ तू मला मातीचे बैल दिलेस खेळण्यासाठी. एकूण ६ बैल होते ते. पण ते बैलही कसे गं, तुझ्यासारखेच गरीब. ना त्यांना रंग ना रूप ! नुसता गेरू फासलेला. पण तरीही तू मोठ्या प्रेमानं मला ते देऊ केलेस. अन्‌ मी ही मोठ्या आवडीने ते घेतले. तुला माहितीये की पुढे कितीतरी दिवस त्या मातीच्या बैलांशी मी खेळत होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर आन्याबाई..! तुझ्यात आणि माझ्यात झालेला हा एकमेव पहिला आणि शेवटचा संवाद. मी मात्र मनाच्या कोपऱ्यात तो जपून ठेवलाय. तुला माहिताय का? मी त्यावेळेस हळूच तुझे घर पाहून घेतले होते. पण मला नाही आवडले ते… किती गरीब होतीस गं तू! तुझ्याकडे रोजच्या गरजेइतक्‍याही वस्तू असू नये.. शिवाय तू एका पोटमाळ्यावरच्या अंधाऱ्या खोलीत राहायचीस, अगदी गैरसोयीची होती ती खोली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यावेळेस अगदी लहान असलो ना तरीही तुझ्याविषयी मला का कोण जाणे उगाचच कणव आला आणि तुझा चेहरा आणि तुझे नांव कायमचे माझ्या मनात कोरले गेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नंतर नंतर आन्याबाई तू गल्लीत येईनाशीच झाली. कुणी म्हणे तू घरातच पडून असते. मग एके दिवशी गल्लीत एक गाडी आली. त्यात खूपशी माणसं होती. त्यांनी तुला उचलले आणि गाडीत टाकून घेऊन गेले. मी पाहिले होते तेव्हा तुला. तू फारच आजारी आणि थकलेली होती. स्वतः:ची शुद्धही तुला नव्हती. तुला चालताही येत नव्हते. तुला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ती माणसं आली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला वाटलं की तू आता लवकरच बरी होऊन येशील. नेहमीप्रमाणे पोचे आलेलं पातेलं घेऊन नळावर पाणी भरण्यासाठी येशील. पण तू कधी आलीच नाहीस गं…. नंतर कुण्या मोठ्या माणसांकडून कळले की तू आता कधीच येणार नाहीस म्हणून… खूप वाईट वाटले तेव्हा. तुझा माझा काही संबंध नसताना रडावेसे वाटले मला…&lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि आता? मला माहितीय की तू या जगात असणं शक्‍यच नाही. पण तरीही माझ्या मनाच्या कोपऱ्यात मी तुला अजूनही जपून ठेवलंय. गेली कितीतरी वर्षे तू माझ्या आठवणीत येत असतेस.. येत आहेस.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण आन्याबाई… तू अशीच आठवणीत येत रहा… असं वाटतंय की प्रत्यक्षात आपण एकमेकांशी नातं जोडू शकलो नाही पण आठवणीतील आपले नाते मात्र पक्के आहे. !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-6905821929991503791?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/6905821929991503791/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=6905821929991503791&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/6905821929991503791'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/6905821929991503791'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2009/03/blog-post.html' title='आन्याबाई !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-6547220749187508723</id><published>2008-09-04T18:36:00.002+09:00</published><updated>2008-09-04T19:26:33.550+09:00</updated><title type='text'>महाराष्ट्रातील गणेशस्थाने</title><content type='html'>&lt;strong&gt;महाराष्ट्रात अष्टविनायकांबरोबरच प्रत्येक गावाची आणि शहराची खास अशी गणेश श्रद्धास्थाने आहेत। प्रत्येक ठिकाणी त्यांची वैशिष्ट्ये निरनिराळी आहेत. अशा गणेश स्थानांविषयीची माहिती आपण या लेखाद्वारे करून घेणार आहोत.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;पुणे परिसरातील गणपती&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;कसबा गणपती&lt;/strong&gt; हे पुण्याचे ग्रामदैवत। इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला राजवाडा बांधला तेव्हा जिजाबाईंनी समारंभपूर्वक कसबा गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली व दगडी गाभारा बांधून दिला. श्री शिवाजी महाराजांच्या वाड्याला लागूनच हे स्थान असल्याने शिवाजी महाराज व त्यांच्या घराण्यातील मंडळी वारंवार या गणपतीच्या दर्शनास जात असत. प्रथम ही मूर्ती तांब्याच्या आकाराची होती परंतु वारंवार शेंदूर लावीत असल्यामुळे तिची उंची आता सुमारे तीन फूट आणि रुंदी पाच फूट झाली आहे. पुण्यात शनिवारवाड्याच्या बाजूलाच कसबा गणपतीचे स्थान आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;सारसबाग&lt;/strong&gt; - श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांना थेऊरच्या गणेशाद्वारे झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी उजव्या सोंडेच्या मूर्ती थेऊरची प्रतिकृती म्हणून इ।स। १७७४ मध्ये सारसबागेच्या तळ्यात स्थापन केली. त्यामुळे हा गणपती पुढे कितीतरी दिवस तळ्यातील गणपती म्हणून ओळखला जात असे. आता सारसबाग तळ्यातील सिद्धिविनायक म्हणून तो ओळखला जातो. पेशवेकालीन मूर्ती खराब झाल्यामुळे एकदा १८८२ आणि एकदा १९९० अशी दोनदा बदलण्यात आली. पर्वतीच्या पायथ्याशी, स्वारगेट जवळ हे स्थान आहे.दशभुज चिंतामणी - पुण्याला पर्वतीच्या पायथ्याजवळ लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये श्रीगणेशाचे हे स्थान आहे. दशभुजा असलेली ही मूर्ती अति प्राचीन आहे. श्री दामोदर खळदकर यांना झालेल्या दृष्टांतानुसार खोदाईकाम करताना ९ ऑक्‍टोबर १९६४ रोजी ही मूर्ती आढळली. हे अत्यंत जागृत ठिकाण असून अनेक श्रीभक्तांना तसे अनुभव आले आहेत.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span style="color:#333333;"&gt;याशिवाय पुणे शहरात श्रीगणेशाची अनेक स्थाने आहेत। त्यांची माहिती पुढीलप्रमाणे -शनिवार पेठेतील वरद-गुपचूप गणपती, सहकारनगर, पर्वती जवळील दशभुज चिंतामणी, सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती, गणेशखिंडीतील श्री पार्वतीनंदन, कर्वे रोडवरील दशभुज चिंतामणी, पर्वतीजवळ थोरले नानासाहेब पेशवे यांनी स्थापन केलेला सदरेतला गणपती, नारायण पेठेतील मोदी सिद्धिविनायक गणपती।&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span style="color:#333333;"&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरचिंचवड स्टेशनपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मोरया गोसावी मंगलमूर्तीचे मंदिर आहे। ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे. महाराष्ट्रातील थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. हे एक जागृत गणेशस्थान आहे. इ.स. १६५५ मध्ये मोरया गोसावी यांनी येथे जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १६५९ मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी येथे मंदिर उभारले. या क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे श्री समर्थ रामदास, श्री संत तुकाराम महाराज हेही या स्थानाचे भक्त होते.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;strong&gt;मुंबई व ठाणे परिसरातील गणपती&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;मुंबईमधील अनेक गणपतींपैकी एक म्हणजे सध्या प्रख्यात असलेला प्रभादेवीजवळचा सिद्धिविनायक. लक्ष्मण विठू पटेल यांनी हे मंदिर १८०१ मध्ये बांधल्याचा कागदोपत्री पुरावा सापडतो. मूळचे मंदिर तसे लहान आहे. अक्कलकोटच्या महाराजांचे शिष्य रामकृष्ण जांभेकर यांनी गोविंदराव फाटक यांना मंदिराच्या देखभालीकरीता पाठविले. त्याप्रमाणे श्री फाटक यांनी बरेच कष्ट घेऊन येथील परिसराची सुधारणा केली. एकदा त्यांच्या मनात मूळची काळ्या पाषाणाची असलेली मूर्ती रंगविण्याचे आले. त्यानुसार त्यांनी आकर्षक स्वरूपात ही मूर्ती रंगविली. तेव्हापासून या मंदिरात बदल घडून आला. मंदिराची सध्याची वास्तू नव्याने बांधण्यात आली आहे. १९९४ साली श्रृंगेरी पीठाच्या जगद्‌गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते या नव्या वास्तूवर विधिवत कलश बसविण्यात आला.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;टिटवाळ्याचा महागणपती&lt;/strong&gt; ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्‍यात मध्य रेल्वेच्या मार्गावर टिटवाळा स्टेशन आहे। स्टेशनपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर टिटवाळ्याच्या महागणपतीचे मंदिर आहे. येथे महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून भाविक दर्शनासाठी येतात. असे म्हणतात की महाभारतात वर्णन केलेल्या प्रसिद्ध कण्वमुनींचा आश्रम आजच्या टिटवाळा गावच्या परिसरात होता. दुष्यंत राजाने आपली पत्नी शकुंतला हिला ओळखले नाही तेव्हा कण्वमुनींनी शकुंतलेला गणेशव्रत करण्यास सांगितले. त्यानुसार तिने गणेशाचे पूजन-अर्जन केले. शकुंतला ज्या गणेशाची पूजा करीत असे तीच मूर्ती म्हणजे टिटवाळ्याचा महागणपती. पेशवेकाळापर्यंत ही गणेशमूर्ती गुप्त अवस्थेत होती. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;मात्र थोरले माधवराव पेशवे यापरिसरात आले असता त्यांना गणेशमूर्तीबाबत दृष्टांत झाला। दरम्यान त्याचवेळेस पाण्याच्या सोयीसाठी येथील तलावाची दुरुस्ती सुरू असताना तिथे रामचंद्र मेहेंदळे यांना आजची गणेशमूर्ती सापडली। पेशव्यांनी त्यानंतर तिथे तत्काळ छोटेसे गणेशमंदिर बांधले. या गणेशाला "वरविनायक' किंवा "विवाहविनायक' असेही म्हणतात. कारण ज्यांचे विवाह जुळण्यात काही अडचणी असतील अशांचे विवाह या गणेशाच्या भक्तीने जुळून येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;मुंबईमधील इतर गणपती मंदिरांची माहिती पुढीलप्रमाणे - गिरगांवचा फडके गणपती; बोरीवलीच्या वझिरा नाका येथील स्वयंभू गणपती, मुंबादेवीजवळचा गणपती; भुलेश्वरजवळील गणेश मंदिर, वांद्रा येथील सिद्धिविनायक; डोंगरबाग, दादर येथील जोशी यांच्याकडील मांदार गणेश; ठाणे येथील एकवीसमुखी वरदविनायक।&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;ठाणे जिल्ह्यातील अन्य गणपती मंदिरे अशी - भिवंडी तालुक्‍यातील अणजूर येथील नाइकांचा सिद्धिविनायक; मुरबाड येथील कमलचक्राधिष्ठित गणपती; ठाणे शहरातील जांभळी नाक्‍यावरचा मांदार सिद्धिविनायक।&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;कोकणातील गणपती&lt;/strong&gt; &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;पुळ्याचा गणपती&lt;/strong&gt; - रत्नागिरी शहरापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर समुद्रकिनाऱ्यालगत गणपतीपुळे हे स्थान आहे। मुद्‌गलपुराणात या गणपतीचे माहात्म्य विशद केले आहे। देशात चार दिशांना चार मंगलमूर्तींची महास्थाने आहेत. त्यांना द्वारदेवता अशी संज्ञा आहे. त्यापैकी कोकण किनारपट्टीत समुद्रतीरावरील ही पश्‍चिम द्वारदेवता आहे. अष्टविनायकांखेरीज जी काही जागृत गणेश मंदिरे महाराष्ट्रात आहेत त्यांच्यात पुळ्याच्या गणपती मंदिराचा समावेश होतो. इ.स. १६०० मध्ये मोगलाईच्या काळात गणेशभक्त असलेले बाळभटजी भिडे या ठिकाणी येऊन राहिले. त्यांना गणेशाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांनी येथील जंगल तोडून जागा स्वच्छ केली. तेव्हा दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी त्याठिकाणी गवताचे छप्पर उभारून पूजा-अर्चेस सुरवात केली. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले होते. तसेच माधवराव पेशवे आणि रमाबाई यांनी येथे धर्मशाळा बांधली. येथील वैशिष्ट्य हेच की ज्या टेकडीच्या पायथ्याशी ही गणेशमूर्ती आहे तिलाच गणेशस्वरूप समजले जाते. त्यामुळे गणेशाला प्रदक्षिणा घालायची असेल तर संपूर्ण टेकडीलाच अनवाणी प्रदक्षिणा घालावी लागते. अशी प्रदक्षिणा घालणे हा येथील उपासनेचा महत्त्वाचा धार्मिक विधी समजला जातो. खळाळत्या समुद्रकिनाऱ्यालगत आणि गर्द वृक्षराजींच्या सान्निध्यात वसलेले हे गणेशस्थान येणाऱ्या भाविकांना समाधान आणि शांतता प्रदान करत असते.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;strong&gt;गुहागरचा उरफाटा गणपती।&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यात गुहागर येथे ही गणेशमूर्ती आहे। ही मूर्ती कोळीलोकांना समुद्रात सापडल्याचे सांगतात। एकदा समुद्राच्या पाण्यामुळे गुहागर बुडण्याची वेळ आल्यावर या गणेशाला संकटनिवारणासाठी लोकांनी प्रार्थना केली. तेव्हा पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती पश्‍चिमाभिमुख झाली आणि समुद्र मागे हटला. तेव्हापासून या गणेशाला "उरफाटा' गणपती हे नाव पडले. सुमारे ३०० वर्षांपूर्वी या गणपतीची स्थापना झाली.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;strong&gt;विनायक गावचा सिद्धिविनायक&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;रायगड जिल्ह्यातील उरण जवळ विनायक नावाचे छोटेसे गाव आहे। तिथेच या सिद्धिविनायकाचे स्थान आहे। हे मंदिर हंबीरराज राजाच्या काळचे, सुमारे सातशे- आठशे वर्षाचे प्राचीन मंदिर आहे. येथील सिद्धिविनायकाची मूर्ती साडेतीन ते चार फूट उंचीची असून त्याच्या दोन्ही बाजूस ऋद्धिसिद्धिच्या मूर्ती विराजमान आहेत. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;मुरुडचा बल्लाळ विनायक&lt;/strong&gt; रायगड जिल्ह्यात मुरुड-जंजिऱ्याजवळ बल्लाळ विनायकाचे स्थान आहे। जंजिऱ्यापासून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर हा गणेश भक्तांसाठी विराजमान झालेला आहे। या गणेशाचे वैशिष्ट्य असे की अष्टविनायकांपैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्वर पूर्वी याच स्थानी होता. परंतु मुघल मूर्तीभंजकांच्या भीतीने त्याला येथून पालीला हलविण्यात आले होते. तथापि श्री बल्लाळ विनायकाची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी १९०३ मध्ये गणेश भक्तांनी याच जागी एक पाषाणमूर्तीची स्थापना केली. त्यानंतर १९०९ मध्ये संगमरवरी मूर्तीसह मंदिर बांधण्यात आले. पूर्वीच्या स्थानमाहात्म्यामुळे असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनास येत असतात.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;दिवेआगरचा सुवर्ण गणपती&lt;/strong&gt; श्रीवर्धन तालुक्‍याच्या मध्यभागी अरबी समुद्रकिनाऱ्यालगत दिवे आगर गाव वसलेले आहे। प्राचीन काळी या ठिकाणी मौर्य व शिलाहार यांचे राज्य होते। त्याकाळी अरब आणि पोर्तुगीज यांचे या परिसरात समुद्रमार्गाने हल्ले होत असत. त्यांच्यापासून रक्षण व्हावे म्हणून हजार वर्षांपूर्वी दिवेआगरची सुवर्ण गणेशाची मूर्ती जमिनीखाली पुरून ठेवली होती. दरम्यान १९९७ साली एका संकष्टी चतुर्थीच्या शुभदिनी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळसुपारीच्या बागेत खोदकाम करताना ही मूर्ती आढळली. त्यानंतर या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांचे लोंढे या ठिकाणी येऊ लागले.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;कोकणातील इतर गणेशस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे आहे&lt;/strong&gt; - कनकेश्वर, ता। अलिबाग, जि। रायगड येथील रामसिद्धिविनायक; अलिबाग जवळील आवास गावचा वक्रतुंड; खोपोली ते पाली रस्त्यावरील, जांभूळपाडा गावचा श्री दशभुज सिद्धलक्ष्मी गणेश; उरण जवळील चिरनेर गावचा श्री महागणपती; कर्जत तालुक्‍यातील कडाव गावचा श्री दिगंबर सिद्धिविनायक; अगरगुळे, जि. रत्नागिरी येथील गलबतवाल्यांचा गणपती; चिपळूण तालुक्‍यातील हेदवीचा दशभुज लक्ष्मीगणेश; दापोली तालुक्‍यातील आंबोली गणपती आणि आंजर्लेचा कड्यावरचा सिद्धिविनायक; चिपळूण तालुक्‍यातील परशुराम येथील परशुराम गणेश; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील रेडीचा श्री द्विभुज महागणपती.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span style="color:#ff6600;"&gt;&lt;strong&gt;&lt;span style="font-size:130%;"&gt;दक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्रातील गणपती&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;strong&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;कोल्हापूर&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;शिरोळ तालुक्‍यातील गणेशवाडीचा गणपती&lt;/strong&gt; - शिरोळ तालुक्‍यात कागलवाडजवळ कृष्णा नदीच्या काठी असलेले हे गणेशस्थान ५६ विनायकांपैकी आहे असे म्हणतात। सरदारकी मिळण्यापूर्वी पटवर्धनांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशाला तामसी उपासना चालत नाही. तसे करणाऱ्यांना भयंकर स्वरूपात गणेशाचे दर्शन होते. असे अनुभव आल्याचे सांगितले जाते.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;कोल्हापूरचा जोशीराव गणपती किंवा बिनखांबी गणेशमंदिर&lt;/strong&gt; - कोल्हापूर शहरातील महाद्वार रोडवर हे गणेशस्थान आहे। वाईकर यांच्याकडील विहिरीच्या दुरुस्तीत एक स्वयंभू गणेशमूर्ती सापडली। तेव्हा १८८२ साली कोल्हापूरचे छत्रपती आणि नागरिकांनी मिळून या मूर्तीची मंदिरात स्थापना केली. या मंदिराला खांब नसल्यामुळे त्याला बिनखांबी गणेशमंदिर असेही संबोधले जाते. मूळचे संगमेश्‍वरचे जोशीराव ज्योतिषी छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात येथे राहत असत. जोशीरावांच्या शेजारी असल्याकारणाने या गणपतीला जोशीराव गणपती असेही म्हणतात.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;कोल्हापुरातील अन्य गणपतीस्थानांची माहिती पुढीलप्रमाणे - महालक्ष्मी मंदिरातील घाटी दरवाजाकडे तोंड असलेला आणि नवसाला पावतो अशी ख्याती असलेला मोक्षी गणपती; कसबा बीड, जि। कोल्हापूर येथील शिलाहारांचा गणपती. करवीर तालुक्‍यातील चंबुखडी येथील सिद्ध बटुकेश्वर गणेश; गडहिंग्लज तालुक्‍यातील मौजे इंचनाळचा श्री गणेश.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;strong&gt;सांगलीचे प्रसिद्‌ध गणेश मंदिर&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;दक्षिण महाराष्ट्रात सांगलीचे गणेश मंदिर देवस्थान फार प्रसिद्ध आहे। श्री गणेश म्हणजे सांगलीच्या पटवर्धनांचे कुलदैवत. थोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी १८४३ मध्ये या गणेशाची स्थापना केली. या मंदिराची निर्मिती ज्योतिबाच्या डोंगरावरील उत्कृष्ट प्रतीच्या काळ्या पाषाणापासून करण्यात आलेली आहे. या गणेश मंदिरात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून पाच दिवस मोठ्या समारंभपूर्वक गणेशोत्सव साजरा केला जातो.याशिवाय सांगली जिल्ह्यात मिरजेतील तळ्यावरचा गणपती आणि तासगावचे गणपती पंचायतन ही गणेशस्थाने प्रसिद्‌ध आहेत.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;strong&gt;साताऱ्याचा ढोल्या गणपती&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;साताऱ्यातील या गणेशाची मूर्ती आकाराने १० ते १२ फूट उंच असल्याकारणाने त्याला ढोल्या गणपती म्हणतात। या गणपतीचे मूळ नाव मात्र "ज्येष्ठराज' असे आहे. हे फार प्राचीन गणेश मंदिर आहे. मराठेशाहीच्या आधी शिलाहार वंशातील राजा भोज याने साताऱ्याचा किल्ला बांधला. त्यावेळी गावच्या रक्षणासाठी त्याने या गणेशाची स्थापना केली. साताऱ्यातील सर्व मंगलकार्यांची पहिली अक्षता या गणपतीला दिली जाते. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;या गणपती शिवाय सातारा शहरात; खिंडीतील गणपती, शनिवार पेठेतील फुटका गणपती, चिमणपुऱ्यातील गारेचा गणपती आदी गणेशस्थाने आहेत. तर सातारा जिल्ह्यात वाई येथे कृष्णाकाठावरील ढोल्या गणपती, वाई तालुक्‍यातील ब्राम्हणशाई येथील श्री गणपती देव संस्थानचा गणपती; तसेच सातारा तालुक्‍यातील अंगापूर येथील शाहूकालीन गणेश मंदिर आदी गणेशस्थाने भक्तांमध्ये प्रसिद्‌ध &lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;.अक्कलकोट, जि. सोलापूर&lt;/strong&gt; येथील स्वयंभू गणेश मूर्तीअक्कलकोट महाराजांच्या समाधी मंदिराजवळच त्यांचे भक्त चोळप्पा यांचा वाडा आहे। चोळप्पांचे वंशज हल्ली या वाड्यात राहतात. त्यांच्यापैकी श्री अप्पू महाराज यांच्याकडे ही स्वयंभू गणेश मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोटच्या ज्या वाड्यात सर्वप्रथम अक्कलकोटचे स्वामी आले त्याच वाड्यात गणेश चतुर्थीच्या दिवशी ही मूर्ती सापडली. ही गणेशमूर्ती मांदाराची असून सोंड लांब व उर्ध्वगामी आहे. या गणेशाची प्राणप्रतिष्ठा १९६६ रोजी झाली. नवसाला पावतो अशी ख्याती असल्याकारणाने अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी येणारे अनेक भक्त चोळप्पांच्या वाड्यातील या गणेशाचे आवर्जून दर्शन घेतात.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;याशिवाय सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरपासून चार किलोमीटर अंतरावरील पखालपूरचा गणपती प्रसिद्ध आहे।&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;अहमदनगरमधील अक्षता गणपती&lt;/strong&gt; - अहमदनगर शहराच्या गुजरगल्लीत दोनशेवर्षांपेक्षाही जुने असे हे गणपतीमंदिर आहे। हे स्वयंभू आणि जागृत स्थान समजले जाते. येथील श्रींची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. मंगलकार्याच्या प्रसंगी या गणपतीला वाजत-गाजत अक्षता देण्याची प्रथा असल्याने या गणेशाला अक्षता गणेश हे नांव पडले.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;माळीवाडा गणपती&lt;/strong&gt; - नगर शहराच्या दक्षिणेकडे माळीवाडा वेशीने आत जात असताना हे पुरातन गणेश मंदिर लागते। येथील गणेशमूर्ती १० फूट उंच, उजव्या सोंडेची आहे। असे सांगतात की सुमारे साठेक वर्षांपूर्वी या गणेशमूर्तीला घाम आला होता. तेव्हा यज्ञयागादीक करून तो थांबविण्यात आला. तेव्हापासून हे मंदिर भक्तांमध्ये विशेष प्रसिद्ध पावले आहे.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;आव्हाने येथील "निद्रिस्त' गणपती&lt;/strong&gt;  अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावापासून १७ किलोमीटर अंतरावर अवनी नदीच्या तीरावर आव्हाने बुद्रूक नावाचे गाव आहे। या गावी हा "निद्रिस्त' गणपती वसलेला आहे। महाराष्ट्रात अशी दुर्मिळ मूर्ती अन्यत्र कोठेही नाही. अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या मोरगावच्या गणपतीचे अंशात्मक स्थान म्हणून हा गणपती ओळखला जातो.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;उत्तर महाराष्ट्रातील गणपती&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;strong&gt;नाशिकचा मोदकेश्वर&lt;/strong&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;नाशिक शहरात गोदावरी नदीच्या तीरावर मोदकेश्वराचे पुरातन मंदिर आहे। याचा आकार मोदकाच्या आकाराचा असल्यामुळे त्याला मोदकेश्वर असे नाव पडले। जागृत स्थान म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. गणपतीच्या ५६ स्थानांपैकी हे एक स्थान आहे. या गणपतीला हिंगण्यांचा गणपती म्हणूनही ओळखले जाते.  याविषयी पुराणात एक आख्यायिका सांगितली जाते, की श्री शंकरांनी मदनाला शाप दिल्यानंतर त्याला पूर्ववत होण्यासाठी गणेशोपासना सुचविली। त्यावेळी रतिसह मदनाने कठोर गणेशसाधना करून श्री गणेशाचा कृपाप्रसाद मिळविला. मोदकेश्वर म्हणजे मदनाने आराधना केलेले "कामवरद' महोत्कट क्षेत्र होय.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;साताऱ्या प्रमाणेच नाशिकमध्येही एक ढोल्या गणपती आहे। नाशिक शहराच्या मध्यवर्ती अशोक स्तंभ चौकात या गणपतीचे मंदिर आहे। ही गणेशमूर्ती सात ते आठ फूट उंचीची आहे। &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;नाशिकपासून साधारणतः: आठ किलोमीटर अंतरावर आनंदवल्ली गाव आहे. या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर गणेशाचे पेशवेकालीन मंदिर आहे. याला नवश्‍या गणपती असे म्हणतात. हे स्थान फारच रम्य आणि शांत स्थान आहे. या ठिकाणी मंदिराच्या सभागृहात अष्टविनायकांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. अशा या आठ मूर्ती आणि गाभाऱ्यातील मूळ मूर्ती असे मिळून एकूण नऊ गणपती होतात म्हणून याला नवश्‍या गणपती हे नाव पडले असे म्हणतात. तर काही भक्‍तांच्या सांगण्यानुसार नवसाला पावतो म्हणून या गणपतीचे नाव नवश्‍या गणपती असे.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;याशिवाय नाशिक शहरात सोमवार पेठेतील पेशवेकालीन खांदवे गणपती, काळाराम मंदिरातील गणपती; गोरेराम मंदिराच्या पश्‍चिमेकडील दशभुज सिद्धिविनायक; पंचवटीतील गणेशवाडी येथील पुरातन तिळ्या गणपती; कपालेश्‍वर मंदिराजवळील उजव्या सोंडेचा गणपती; दूध बाजारातील त्र्यंबक दरवाजा चौक गणपती; उपनगर, नाशिक रोड येथील इच्छामणी गणपती; भद्रकाली मंदिराजवळील साक्षी गणेश; रविवार कारंजा चौकातील श्री सिद्धिविनायक अशी अनेक गणेशस्थाने आहेत।&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;नाशिक जिल्ह्यातील गणेश मंदिरांची नावे अशी - श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील पूर्व दरवाज्याकडचा सिद्धिविनायक; सिन्नरच्या भैरवनाथ मंदिरातील श्रीगणेश; अंजनेरी येथील पुरातन गणेश मूर्ती; सप्तश्रृंगी गडा खालील गणेश कुंडाजवळचा श्रीगणेश।&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;धुळे शहरात पेशव्यांच्या काळचा उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचे मंदिर आहे। तसेच येथील पांझरा नदीकाठचे गणेशमंदिर गणेशभक्‍तांमध्ये प्रसिद्ध आहे. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;श्रीगणेशाचे अर्धपीठ अर्थात एरंडोलजवळील "पद्मालय'जळगाव जिल्ह्यातील "पद्मालय' हे प्रसिद्ध गणेश क्षेत्र आहे। श्रीगणेशाच्या अडीच पीठांपैकी "अर्ध' पीठ म्हणून "पद्मालय' क्षेत्र ओळखले जाते. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एक मैल अंतरावरील एका डोंगरावर पदाय गणेशाचे स्थान आहे. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे येथील गाभाऱ्यात श्रीगणेशाच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत। पैकी एक उजव्या सोंडेची तर एक डाव्या सोंडेची आहे। भक्तगणांत हे स्थान नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेशस्थानापासूनच सुमारे पाच किलोमीटर अंतरावर भीम-बकासूर युद्धाची जागा आहे.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;विदर्भातील गणपती&lt;/strong&gt; &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;यवतमाळ जिल्ह्यातील कळंबचा श्री चिंतामणी&lt;/strong&gt; यवतमाळहून वर्धा - नागपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळंबचा चिंतामणी आहे। हे स्थान विदर्भातील कदंबपूर म्हणून ओळखले जाते. गणपतीच्या २१ क्षेत्रांमध्ये हे स्थान गणले जाते. गणेशपुराण आणि मुद्‌गल पुराणात या क्षेत्रासंबंधीचे आणि तेथील चिंतामणी संबंधीचे वर्णन आलेले आहे. अष्टविनायकांपैकी थेऊर येथील चिंतामणी गणेशाची जी कथा वर्णिली आहे; तीच याही गणेशाची आहे. या गणेशाची स्थापना इंद्राने केली असल्याचा पुराणात दाखला आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर खूप खोलात आहे. त्यामुळे जवळ गेल्याशिवाय मंदिराचे दर्शन होत नाही. मंदिरासमोरच दर्शनी बाजूस उजव्या हाताला चौमुखी गणेशाची मूर्ती आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच पाषाणातून ही मूर्ती कोरलेली आहे. या मंदिराच्या काही पायऱ्या उतरल्यानंतर मध्येच एक चौकोनी कुंड आहे. यालाच पावनकुंड असे म्हणतात. या कुंडाला जिवंत झरे आहेत.&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;विदर्भातील अन्य गणपतींची स्थाने अशी&lt;/strong&gt; - वर्धा जिल्ह्यातील केळझरचा एकचक्रा गणेश; नागपूर जिल्ह्यातील आधासा (क्षेत्र अदोष) येथील शमी विघ्नेश; नागपूर शहरातील सीताबर्डी किल्ल्याचा गणपती; नागपूर शहरातील टिळक पुतळ्यासमोरचा श्री सिद्धिविनायक; बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील स्वयंभू वटसिद्ध गणेश; पायानील, ता। अहेरी, जि. गडचिरोली येथील सागाच्या जंगलातील गणेश मंदिर; अकोला शहरातला स्वयंभू श्री मांदार गणेश; चंद्रपूर जिल्ह्यातील आवारपूर, ता. गोंडपिंपरी येथील श्री सिद्धिविनायक; पवनार, वर्धा येथील श्रीचिंतामणी. &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;span class=""&gt;&lt;strong&gt;मराठवाड्यातील गणपती&lt;/strong&gt; &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;औरंगाबादजवळील वेरूळचा लक्षविनायक - औरंगाबादपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावी गणेशाचे हे स्थान आहे। गणेशाच्या एकवीस स्थानांपैकी एक स्थान समजले जाते। शिवपुत्र स्कंदाने या गणेशाची स्थापना केल्याचा पुराणात उल्लेख सापडतो.सेंदूरवाड्याचा सिंदुरान्तक गणेशऔरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्‍यातील सेंदूरवाडा येथे या गणेशाचे स्थान आहे. खाम नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे. खाम नदीत हेमाडपंती बांधणीचे श्रीगणेशाचे मंदिर आहे. हे एक अत्यंत जागृत स्थान समजले जाते. याच ठिकाणी श्रीगणेशाने सिंदूरासुराशी युद्ध केले. त्यावरून या गणेशाला सिंदुरान्तक गणेश हे नाव पडले. येथील गणेशमूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या पाठीमागे डाव्या बाजूला त्याच दगडात म्हसोबाची मूर्ती कोरलेली आढळते. याठिकाणी उंदीर हे गणपतीचे वाहन नाही. उंदीर आणि गणपतीचे याच ठिकाणी युद्ध झाले होते अशीही एक आख्यायिका येथे प्रसिद्‌ध आहे.&lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;मराठवाड्यातील अन्य गणेशस्थाने पुढीलप्रमाणे - अजिंठ्याची गणेशलेणी; सातारा येथील द्वादशहस्त गणेश; औरंगाबाद शहरातील समर्थ नगर येथील श्री वरद गणेश मंदिर; मराठवाड्यातील स्वयंभू सिद्‌धस्थान नांदेड येथील त्रिकुट गणेश; नांदेड शहरातील जोशीगल्लीतील श्रीगजानन; नांदेड शहरातील नवसाला पावणारा आखाड्याचा गणपती; कंधार, जि. नांदेड येथील साधुमहाराजांचा गणपती; दाभाड,ता.नांदेड येथील श्री सत्य गणपती मंदिर; नवगण राजुरी, जि. बीड येथील नवगणपती; अंबाजोगाई, जि. बीड येथील पाराचा गणपती; बीड जिल्ह्यातील नामलगांव गणेश; राक्षसभुवन, जि. बीड येथील विज्ञानगणेश क्षेत्र; गंगामसले, जि. बीड येथील भालचंद्र गणेश; गणेशाच्या साडेतीन पीठांपैकी पूर्णपीठ असलेले जालना जिल्ह्यातील राजूर, ता. भोकरदन येथील वरेण्यपुत्र गणपती क्षेत्र. &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div align="left"&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-6547220749187508723?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/6547220749187508723/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=6547220749187508723&amp;isPopup=true' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/6547220749187508723'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/6547220749187508723'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2008/09/blog-post.html' title='महाराष्ट्रातील गणेशस्थाने'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-6386963770920254133</id><published>2008-06-28T16:56:00.001+09:00</published><updated>2008-06-28T17:01:32.528+09:00</updated><title type='text'>पाऊस आला सुंदर</title><content type='html'>&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/SGXvuUcm-xI/AAAAAAAAAOc/NsNK1R9QRRM/s1600-h/Paus.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5216839322420312850" style="CURSOR: hand" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/SGXvuUcm-xI/AAAAAAAAAOc/NsNK1R9QRRM/s400/Paus.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;हिरवं हिरवं झाड&lt;br /&gt;ढगाला म्हणतं पाऊस पाड&lt;br /&gt;मग धुक्‍याने भरले डोंगर&lt;br /&gt;पाऊस आला सुंदर&lt;br /&gt;अशा या पावसात&lt;br /&gt;मस्त भिजले दोन मांजर&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-6386963770920254133?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/6386963770920254133/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=6386963770920254133&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/6386963770920254133'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/6386963770920254133'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2008/06/blog-post.html' title='पाऊस आला सुंदर'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/SGXvuUcm-xI/AAAAAAAAAOc/NsNK1R9QRRM/s72-c/Paus.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-4635480455839764982</id><published>2008-01-06T03:16:00.000+09:00</published><updated>2008-01-06T03:19:21.873+09:00</updated><title type='text'>विचार "पांढरपेशी'...</title><content type='html'>&lt;strong&gt;सकाळची &lt;/strong&gt;गडबड सुरु. रोजचीच आवरसावर. दुसऱ्या मजल्यावरच्या मला अचानक एक आवाज येतो. मी कान टवकारतो...&lt;br /&gt;आता स्पष्ट आवाज, "" भंग्याऽऽरवालेऽऽय्य,...रद्दी पेपऽर.... भऽऽयंग्यारवालेऽऽय्य''..&lt;br /&gt;"रद्दी देवू या का बऱ्याच महिन्यांची?', माझा विचार. मी बायकोला विचारतो.&lt;br /&gt;सकाळच्या गडबडीत कश्‍श्‍याला उगाच, या अर्थानं तिचा त्रासिक चेहरा. मी दुर्लक्ष करतो.&lt;br /&gt;"रद्दीचे ओझे तर जाईल' या विचाराने मी खिडकीत जातो. &lt;br /&gt;दरम्यान पुन्हा तो आवाज... जोडीला चेहराही... विटलेला लाल शर्ट आणि मळकट चेहरा; खिडकीखाली उभा असलेला...!&lt;br /&gt;"शुक... शुऽक', वरच्या खिडकीतून मी.&lt;br /&gt;खालून त्याची नजर माझ्याकडे...&lt;br /&gt;"काय द्यायचंय?' त्याचा प्रश्‍न.&lt;br /&gt;"रद्दी आहे, दुसऱ्या मजल्यावर ये', दोन बोटं दाखवून मी खूणावतो.&lt;br /&gt;तो यायला तयार. अन्‌ मी रददी शोधण्याच्या कामाला..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दारावर &lt;/strong&gt;टक टक.&lt;br /&gt;मी सावध.माझ्या डोक्‍यात विचारचक्र, जोडीला संशयही..&lt;br /&gt;माझा डोळा "सेफ्टी होल'वर. बाहेर तो.&lt;br /&gt;मी पुन्हा सावध..&lt;br /&gt;"आत जा तू' बायकोला माझे फर्मान. वैतागून ती आतल्या खोलीत.&lt;br /&gt;मी दार उघडतो. समोर तो. पंचविशीचा; दाढी वाढलेला; काळ्या-मळकट चेहऱ्याचा; अंगावर लाल शर्ट- काळी विजार; हातात तराजू...&lt;br /&gt;माझ्या नकळत डोक्‍याची शीर तडकलेली...&lt;br /&gt;"याला घ्यायचा का आत?, चांगली नसतात अशी माणसं; चोऱ्याही करतात; घरात बायको आहे आपल्या...' , एका क्षणात असंख्य विचार.&lt;br /&gt;मी दार उघडतो. तो रेटून आत. माझा पारा चढलेला. शांत राहण्याचा माझा प्रयत्न..&lt;br /&gt;मी विचारतो," काय भाव देणार?'&lt;br /&gt;"किलोला पाच रुपये', त्याचे "प्रोफेशनल' उत्तर.&lt;br /&gt;"... रद्दी न देता हाकलून द्यावा का याला, असाच?...' माझ्या मनात पुन्हा विचार.&lt;br /&gt;पण मी तसं करत नाही....&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मग&lt;/strong&gt; मी त्याच्याशी "उच्च लेव्हलचं' बोलतो..."खरं तर, तुझ्या सारख्याला मी रद्दी देतच नसतो; दुकानात देतो... पण ओझं वाहायचा कंटाळा आला म्हणून तुला बोलावलं..'&lt;br /&gt;त्याची शून्य प्रतिक्रिया, पण नजर भिरभिरती.&lt;br /&gt;मी त्याला "ऑब्जर्व्ह करतो.&lt;br /&gt;"झोपडपट्टीछाप..; .... साले, चोर असतात हे...' माझं विचारचक्र सुरु तरीही त्याच्या पुढ्यात रद्दी टाकतो.&lt;br /&gt;"आणखी काही आहे? भंगार सामान... जुनी भांडी...?' त्याचा धंदेवाईक प्रश्‍न.&lt;br /&gt;त्याचा प्रश्‍न मला आवडत नाही. मी अस्वस्थ.&lt;br /&gt;"नाही... एवढंच आहे,' माझं तुटक उत्तर.&lt;br /&gt;तो पेपर मोजायला वळतो.&lt;br /&gt;" आता हा वजनात मारणार.. हे.... लोक असेच फसवतात.. इथं दहा किलोचे पाच किलो वजन भरवतील अन्‌ बाहेर पंधरा किलो करुन विकतील.. शेवटी चोराचीच वृत्ती,' माझे सावध विचार....&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"&lt;strong&gt;जुने&lt;/strong&gt; कुकर घेता का तुम्ही?' आतून बायकोचा आवाज. मग तिचं बाहेर येणं&lt;br /&gt;तो रद्दी मोजायचा थांबतो.&lt;br /&gt;"वस्तू बघून सांगतो,' त्याचे आगाऊ उत्तर.&lt;br /&gt;आता मात्र माझ्या डोक्‍याची शीर तडकलेली.&lt;br /&gt;"" या "थर्डक्‍लास' माणसासमोर बाहेर येण्याची हिला गरज काय?.. स्साली, ही माणसं चांगली नसतात,' मी मनातून भडकलेला. तरीही मी संयम बाळगतो.&lt;br /&gt;" किती रुपये देणार, मोडीचे?' माझा त्रासिक प्रश्‍न.&lt;br /&gt;" वीस रुपये किलोप्रमाणे...' त्याचं अनपेक्षित उत्तर.&lt;br /&gt;... आता मात्र मला राहवत नाही. "काहीतरी सांगू नको; राहू दे ती मोड; द्यायची नाही मला', मी डाफरतो.&lt;br /&gt;तो अस्वस्थ होतो, चुळबुळतो...&lt;br /&gt;"तेवढी रद्दी घे अन्‌ जा.. बाकी, पुन्हा कधीतरी..' माझा आवाज थोडा चढलेला..&lt;br /&gt;".. आणखी आहे का काही?' त्याचा चिवटपणा.&lt;br /&gt;" न्नाही रे बाऽबा ! कश्‍श्‍याला माझा वेळ घेतोस..? माझे चिडके उत्तर.&lt;br /&gt;तो मुकाट रद्दी मोजतो.&lt;br /&gt;माझ्या डोक्‍यात राग गेलेला... "झक मारली अन्‌ हया टीनपॉट माणसाला बोलावलं,' मी स्वत:लाच शिव्या देतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;"रद्दी &lt;/strong&gt;नीट बघ, काही वस्तू - फाईल वगैरे असतील तर, त्या बाजूला काढ' माझी दरडावून सूचना.&lt;br /&gt;दरम्यान त्याचं काम संपतं.&lt;br /&gt;"चाळीस रुपये होतात रद्दीचे' माझ्या चेहऱ्याचा वेध घेऊन तो बोलतो.&lt;br /&gt;"काऽऽय? फक्त चाळीऽस? शंभर व्हायला पाहिजे एवढी रद्दी आहे ती.. लुटतोय स्साला..' माझ्या डोक्‍यात विचार सुरु.&lt;br /&gt;"जाऊ देत... देवून टाकू तेवढ्याला रद्दी.. ही ब्याद तर जाईल इथून..' माझा सुजाण विचार.&lt;br /&gt;"ठिकाय ! दे चाळीस, अन्‌ लवकर आवर ते' माझं निर्वाणीचं बोलणं&lt;br /&gt;"धा रुपये सुट्टे आहेत?' त्याचा प्रतिप्रश्‍न.&lt;br /&gt;"आहे', त्रासिक मी.&lt;br /&gt;माझी लगबग. त्याच्याकडून पन्नासची नोट घेऊन व त्याला दहा रुपयाची नोट देवून, मी त्याला कटवतो.&lt;br /&gt;मी दार आदळून बंद करतो. माझा सुटकेचा निश्‍वास...&lt;br /&gt;"त्याला बोलवायलाच नको होता...; हे लोक चोऱ्याही करतात..; इथून पुढे सावध राहिले पाहिजे..: दरवाजे वगैरे व्यवस्थित बंद केले पाहिजे...' माझ्या डोक्‍यात विचारांचे थैमान.&lt;br /&gt;पंधरा मिनिटे मी विचारात..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दारावर &lt;/strong&gt;पुन्हा टक टक. मी सावध. डोळा "सेफ्टीहोल'वर. &lt;br /&gt;दारात पुन्हा तोच,.. कळकट...थर्डक्‍लास..!&lt;br /&gt;मी धडधडत दार उघडतो...&lt;br /&gt;"काय आहेऽऽ?', सेफ्टीडोअरच्या आडून मी सुरक्षितपणे डाफरतो.&lt;br /&gt;तो विचकट हासतो. खिशात हात घालून दहाची नोट काढतो... माझ्या पुढे सरकावतो.&lt;br /&gt;माझा हात नकळत पुढे...&lt;br /&gt;"मघाशी तुम्ही धा रुपायची नोट दिली नाऽऽ, तिला चिकटून एक नोट जास्त आली', त्याचे चाचरत उत्तर.&lt;br /&gt;माझा शून्य प्रतिसाद...&lt;br /&gt;माझ्या हातात नोट कोंबून तो सर्रकन जीना उतरलेला...सेफ्टी डोअरला लागून मी तसाच उभा. सून्न...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता मला विचार करायलाही सूचत नाही...!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-4635480455839764982?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/4635480455839764982/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=4635480455839764982&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/4635480455839764982'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/4635480455839764982'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2008/01/blog-post.html' title='विचार &quot;पांढरपेशी&apos;...'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-4470865752241670646</id><published>2007-10-29T17:07:00.000+09:00</published><updated>2007-10-29T17:07:35.686+09:00</updated><title type='text'>ऑपरेशन कलंक' : स्टींग की ऍक्‍टींग?...</title><content type='html'>&lt;strong&gt;पाच वर्षांपूर्वी घडलेल्या गुजरात दंगलींमधील "सत्य' ऐन निवडणूकांच्या तोंडावरच एखादे तहलकासारखे एखादे माध्यम जेव्हा उघडकीस आणते. त्यात मागील स्टींग ऑपरेशनमध्ये केलेल्याच पक्षाला लक्ष्य केले जाते. तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या मनात संबंधित माध्यम आणि संबंधित पक्ष दोघांविषयीच्या शंकेला वाव निर्माण होतो. याशिवाय संबधित "स्टींग' मुळे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यातील शांतता व स्थैर्यालाही हानी पोहोचू शकते.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;घटना तशी पूर्वी घडलेली, पण अलीकडचीच वाटावी इतकी ती आजही लक्षात राहते. ती घटना म्हणजे "तहलका' च्या वेबसाईटवर प्रसारित केलेले "स्टींग ऑपरेशन'. शोध पत्रकारितेचा दृश्‍य नमूना असणाऱ्या या ऑपरेशनमुळे तत्कालीन भाजप सरकारमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. इतकेच नाही तर त्यावेळच्या भाजपचे अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांनाही स्टींग ऑपरेशनमध्ये रंगेहाथ पकडले होते. देशात आणि परदेशातही या ऑपरेशनमुळे एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचा परिणाम म्हणून भाजपचे तत्कालिन अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांना पदच्यूत करण्यात आले. नंतर या ऑपरेशनचे प्रसारण वेबसाईट व्यतिरिक्त एका खाजगी दूरचित्रवाणीवरुनही नंतर दाखविण्यात आले. या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की तहलका नावाची माध्यमसंस्था आणि तिचे प्रवर्तक तरुण तेजपाल यांचे नाव एका रात्रीत प्रसिद्‌धीझोतात आले. त्यानंतर तहलका चे नाव कमी-अधिक प्रमाणावर अधून मधून लोकांच्या समोर येतच राहिले. त्यांनी मध्यंतरी स्वत:चे साप्ताहिक सुरु केले, तेव्हा त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता पुन्हा एका "स्टींग ऑपरेशनमुळे' तहलकाचे नाव गाजत आहे. यावेळीही त्यांनी पुन्हा भाजपलाच आपले लक्ष्य बनवले असल्याचे या ऑपरेशनमधून दिसून येते. या स्टींग ऑपरेशनला त्यांनी "ऑपरेशन कलंक' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे गुजरातमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर तहलकाची ही शोध पत्रकारिता जास्त "लक्ष्यवेधी' ठरते. विशेष म्हणजे यावेळेसही तहलकाचे "स्टीग ऑपरेशन' एका खाजगी वाहिनीवर दाखविण्यात येत आहे. पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये ज्या काही धार्मिक दंगली उसळल्या त्या पूर्वनियोजित होत्या, इतकेच नव्हे तर त्यामागे तत्कालिन (आणि आताचेही) मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा छुपा पाठिंबा होता, पोलीसही त्यात सक्रीय होते, शिवाय काही हिंदूत्ववादी संघटना सामिल झाल्या होत्या; अशा प्रकारचे तथ्य तहलकाला आपल्या नव्या ऑपरेशनमधून उघड करायचे आहे. खरे तर गुजरात दंगलींविषयी तथ्य, सत्य वगैरे सांगणारे शेकडो अहवाल अनेक संस्थांनी त्याचवेळेस तयार केले होते. आपलाच अहवाल कसा सत्य सांगतो याचे दावे-प्रतिदावेही केले होते.त्यात काही माध्यमेही आघाडीवर होती. या अहवालांमधूनही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. अर्थात त्यातून काहीच हशील झाले नाही. दंगलीमध्ये बळी पडलेले परत आले नाहीत की त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जे काही नुकसान झाले ते भरुन निघाले नाही. माध्यमांनी आणि अहवालांनी नरेंद्र मोदींविषयी एवढा ओरडा करुनही, दंगलींनंतर थोड्याच काळात झालेल्या विधानसभा निवडणूकांतमध्ये भाजपला सत्ता मिळाली आणि नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री बनले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता पुन्हा गुजरातमधील विधानसभा निवडणूका तोंडावर आहेत आणि त्याचवेळेस तहलकाने आपले स्टींग ऑपरेशन केले आहे. खरे तर गुजरात दंगलीनंतर लगेचच त्यांना हे "स्टींग ऑपरेशन' करुन नरेंद्र मोदी हे भारतीय लोकशाहीला आणि घटनेला अपेक्षित असे धर्मनिरपेक्ष मुख्यमंत्री नाहीत असे दाखविता आले असते. शिवाय त्यावेळी निवडणूकांची पार्श्‍वभूमीही त्यांना उपलब्ध होती. म्हणजेच त्यांच्या या "सत्यशोधन'(?) अहवालाला सामान्य जनतेसमोर मोठ्या प्रमाणात जाण्यासाठी त्यावेळी योग्य परिस्थिती उपलब्ध होती. परंतु त्यावेळी त्यांना असे ऑपरेशन करायचे सुचले नसले पाहिजे किंवा त्यात हवे तसे "पोटेंशियल' मिळाले नसले पाहिजे, की जे आता मिळाले असावे कदाचित! किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाला सत्तेवर येण्यासाठी तेव्हा इतर माध्यमांनी योग्य ती "परिस्थिीती' तयार केली आहेच, त्यात आपले आणखी काय प्रयोजन? असाही सूज्ञ विचार "तहलका' वाल्यांनी केला असला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या "स्टींग ऑपरेशन'साठी गुजरात विधानसभा निवडणूकांची सध्याची वेळ त्यांनी निवडली असली पाहिजे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;काही माध्यमांनी अशा तऱ्हेने केलेल्या "सत्य(?) शोधनातून' गुजरातमध्ये कोण निवडून येणार? कोण जाणार? हे याठिकाणी महत्त्वाचे नाही. तर त्याचा सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होणार? काय परिणाम होऊ शकतील? कोणती राजकीय गणिते मांडली जातील आणि त्यातून कोण फायदा-गैरफायदा उपटेल? हे इथे महत्त्वाचे वाटते. त्यातील एक मुद्दा म्हणजे सर्वसामान्य जनतेवर होणारे परिणाम. या "स्टींग ऑपरेशनमध्ये' जी काही सत्ये उघडकीस आणली आहेत, त्यातून एका बहुसंख्य धर्माच्या लोकांनी अल्पसंख्याक धर्माच्या लोकांवर ठरवून अत्याचार केले असे सूचित होते. याचा परिणाम म्हणून संबंधित अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. एक सुप्त असंतोष त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. त्याला हवा देण्याचे काम काही कट्टरपंथी नेते आणि धूर्त राजकारणी करु शकतील. त्याचा परिपाक म्हणून देशात पुन्हा सामाजिक अस्थैर्य माजविण्यात हे लोक यशस्वी होतील. तसे झाले तर दोन धर्मांच्यामधील तयार झालेल्या दुफळीरुपी तव्यावर हे राजकारणी आपली सत्तेची पोळी भाजून घेतील आणि हपापल्यासारखे पुन्हा सत्तेवर येतील. आपल्या भारतीय समाजाचे आतापर्यंतचे दूर्दैव असे की आपण विनाकारणच जात-पात-धर्म वगैरेमध्ये गुंतून पडतो. प्रसंगी भावूकही होतो. त्यातूनच मग जातिय-धार्मिक दंगली उसळतात आणि त्याचा थेट फायदा समाजकंटक आणि संधीसाधू राजकारण्यांना होतो. धार्मिक दूफळी हा राजकारण्यांना मतांसाठी मिळालेला एक हूकूमी एक्का आहे. संधी सापडताच त्याचा वापर ते करुन घेतात. तहलकाच्या "स्टींग' मुळे तशी परिस्थिती केवळ गुजरातमध्येच नाही तर देशामध्येही उदभवू शकते. अर्थात त्यात संधीसाधू राजकारणी आपली पोळी भाजतीलच परंतु सामान्य जनतेचा त्यात नाहक बळी जाईल. हा झाला सर्वसामान्यांच्या काळजीचा मुद्दा. राजकीय घडामोडीचा विचार करायचा झाला तर सत्तेचा पिपासू असणारा कोणताही पक्ष देशभर या घटनेचे भांडवल करु शकतो. गुजरातमध्ये त्याचा उपयोग करता येईलच येईल शिवाय देशातही त्याचा वापर करता येईल. कारण बऱ्याच राजकारण्यांना याघडीला मध्यावधी निवडूकांचे वेध लागले आहेत. जनतेच्या प्रश्‍नापेक्षा केंद्रातील सत्तेचा प्रश्‍न त्यांना जिव्हाळ्याचा वाटू लागला आहे. अशा लोकांसाठी असे "स्टींग ऑपरेशन' म्हणजे आयताच कळीचा मुद्दा होईल. विशेष म्हणजे या "स्टींग ऑपरेशनचा दोन्ही बाजूने वापर करता येऊ शकतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;याठिकाणी मग पुन्हा मुद्दा उपस्थित होतो की माध्यमांनी तर आपले जागृतीचे काम करायचे नाही का? तसे तर करायलाच हवे परंतु त्यासाठी वेळेकाळेचे योग्य ते भान ठेवायला हवे. निवडणूकांत कोण योग्य? कोण वाईट या गोष्टी मतदारांवर सोपवायला हव्यात वाटल्यास काही मार्गदर्शन जरूर करावे परंतु सामाजिक शांततेवर आणि एकीवर गदा येऊ शकेल अशा गोष्टी मात्र करु नये असे कोणालाही कळकळीने वाटेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-4470865752241670646?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/4470865752241670646/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=4470865752241670646&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/4470865752241670646'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/4470865752241670646'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2007/10/blog-post.html' title='ऑपरेशन कलंक&apos; : स्टींग की ऍक्‍टींग?...'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-1600341214412109589</id><published>2007-07-02T21:51:00.001+09:00</published><updated>2007-07-02T21:51:49.535+09:00</updated><title type='text'>तपश्‍चर्यतून फुलविले आदिवासींचे जीवन !</title><content type='html'>&lt;a href="http://www.indianwildlifeclub.com/mainsite/Amte.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 255px; CURSOR: hand" height="301" alt="" src="http://www.indianwildlifeclub.com/mainsite/Amte.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; &lt;strong&gt;गेली तेहतीस वर्षे महाराष्ट्राच्या सीमेवरील भामरागडच्या परिसरातील दुर्गम जंगलात वसलेल्या आदिवासी लोकांची आरोग्य, शिक्षण, शेती अशा विविध माध्यमातून डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ.मंदा आमटे समर्पितपणे सेवा करत आहेत. आपल्या प्रयत्नांनी तेथील जीवनमान बदलत आहेत. पैकी त्यांच्या प्रयत्नांतून शेतीसंदर्भात जे काही बदल झाले आहेत त्याबद्दलची माहिती डॉ. प्रकाश आमटेंशी संवाद साधून येथे दिली आहे.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;"केवळ लज्जारक्षणापुरतेच कापड इथले लोक अंगावर घालतात कारण त्यांनी कापूस बघितलाच नाही आणि इथे कापूसही पिकत नाही.' भामरागड आणि हेमलकशाच्या दुर्गम परिसरातील माडिया आदिवासींच्या जीवनाबद्दल डॉ. प्रकाश आमटे सांगतात तेव्हा ऐकणारा क्षणभर सुन्न होऊन जातो. तसं पाहू गेलं तर हा भाग नागरी जीवनापासून तुटलेलाच वाटतो. त्यात शासकीय यंत्रणेची उदासिनता आणि गैरप्रवृत्तींच्या लोकांनी आदिवासींच्या अज्ञानाचा घेतलेला गैरफायदा येथील लोकांचे जीवन अधिकच समस्याग्रस्त बनवतात. मुख्य प्रश्‍न आहे तो त्यांच्या जगण्याचा. अर्थात असे असले तरीही येथील आदिवासी शेतकरी विदर्भातील शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करत नाही. हे ऐकून मग विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करत असावा असा प्रश्‍न आपण नकळत डॉ. आमटेंना करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यावर ते "आत्महत्या करण्याचं कारणच नाही' अशी सुरुवात करुन शेतीसाठी काढलेले कर्ज इतर कामांसाठी शेतकरी वापरतात, त्यामुळे शेती पिकत नाही आणि कर्ज तर डोक्‍यावर असतेच. बऱ्याचदा मग खोट्या प्रतिष्ठेसाठीही अनावश्‍यक खर्च केला जातो. कर्ज वाढले की मग नैराश्‍य येते आणि आत्महत्येकडे शेतकरी वळतो अशी कारणमीमांसा करतात. आमच्या भागाच्या तुलनेत विदर्भामध्ये बऱ्याच सोई उपलब्ध आहेत या गोष्टीकडेही ते डॉ. आमटे लक्ष वेधतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांचे हे उत्तर अर्थातच विचार करायला भाग पाडते. मग सहजच भामरागड आणि हेमलकसा परिसरातील शेतीची काय स्थिती आहे? अशी उत्सूकता मनात डोकावते. शिवाय डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदा आमटे यांनी केलेल्या विविध सुधारणांपैकी शेतीच्या सुधारणा जाणून घ्याव्या असे वाटते. ही इच्छा बोलून दाखवल्यावर मग डॉ. आमटे आदिवासींचा जीवनपटच उलगडून दाखवतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ते म्हणतात, "आम्ही येथे आलो तेव्हा कंदमुळं खाणं आणि शिकार करणं ही उपजीविकेची मुख्य साधनं होती. आणि "शिफ्टींग कल्टीवेशन' पद्धतीने ते शेती करत असत. या पद्‌धतीत जंगलातील जागा साफ करुन शेतीसाठी तयार केली जाई. मग त्यावर पावसाळ्याच्या सुरुवातीला गवतासारखाच एक प्रकार असणाऱ्या "कोदू कुटकुटे' नावाचे बियाणे टाकले जाई की झाली पेरणी. यातून जे काही उगवेल त्याला ते "पीक' समजत. त्यांची ही शेती एका ठिकाणी नसे. एक- दोन वर्षे याच पद्धतीने एका जागेवर पेरणी करायची, पुढे मग त्या जमिनीचा कस कमी व्हायला लागला की पुन्हा नवी जमीन तयार करुन शेती करायची अशा पद्धतीची ही "शिफ्ट कल्टीवेशन'ची शेती चालत असे. अर्थात हे अन्नही त्यांना पुरेसे नसायचे. त्यातून पोटही भरत नसे. मग पुरक अन्न म्हणून कंदमुळं आणि शिकार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरं शिकार म्हणावं तर तोही एक जुगारच. बऱ्याचदा शिकार मिळण्याचीही शाश्‍वती नसते. कारण वर्षानुवर्षे शिकार करुन आता प्राण्याचे प्रमाणही कमी झालंय. त्यामुळे दिवसभरात काही मिळालं तर ठिक नाही तर उपाशी राहिले आणि मिळालं तरी सगळ्यांनी वाटून घेतल्यावर प्रत्येकाच्या वाट्याला थोडसंच येणार. मग पोट भरण्यासाठी आंबील नावाचा प्रकार ते खायचे. आंबील म्हणजे भाताचा कोंडा रात्रभर पाण्यात भिजत घालून सकाळी तो खायचा व त्यातून पोट भरायचं. यातूनच मग कुपोषणासारख्या समस्या निर्माण व्हायच्या.' डॉ. आमटे भरभरुन सांगत राहतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपल्य प्रयोगाविषयी ते सांगतात, "हे सगळं आम्हाला या भागात राहायला आल्यावर समजलं की अशी बिकट परिस्थिती आहे. ज्याठिकाणी दोन वेळचं खायला मिळायला पाहिजे त्याठिकाणी एकवेळचं सुद्‌धा पुरेसं खायला नाही. आम्ही या गोष्टींची कारणं शोधायला सुरुवात केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यांना एक तर मजुरी मिळत नाही, दुसरं म्हणजे ज्ञान नाही कारण शिक्षण अजिबातच नव्हते. मग आम्ही 1976 मध्ये जेव्हा शाळा सुरु केली, तेव्हा इतर अभ्यासाबरोबर शेतीचेही शिक्षण द्यायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी संस्थेच्याच शेतात हे प्रयोग सुरु केले. त्यामध्ये भात कसा पिकवायचा? भाताची रोपे तयार झाल्यावर लावणी कशी करावी ? त्यातून उत्पादन कसे वाढते? अशा पद्धतीने शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याबरोबरच भाजीपाला कसा पिकवायचा हे सुद्धा शिकवलं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसऱ्या वर्षी शाळेतील मुलांच्या पालकाचेच शेत आम्ही शेतीच्या प्रात्यक्षिकासाठी घेतलं. अर्धा एक एकरचा जमिनीचा तुकडा प्रत्येक गावात निवडला आणि त्याठिकाणी शाळेचे शिक्षक आणि मुले शेतीच्या प्रात्यक्षिकांसाठी जायची. सुरुवातीला या आदिवासींच्या त्याला विरोध असे पण त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांकडून आग्रह केल्यावर शेतीच्या या प्रात्यक्षिकासाठी ते तयार होत. शेतीच्या या प्रयोगाचा फायदा असा झाला की त्यांच्या उत्पन्नात वाढ झालीच शिवाय त्यांना शेती कशी करावी ? भाजीपाला कसा लावावा? रोपे कशी लावावी याचे ज्ञानही मिळाले. त्यातून शेतीविषयी त्यांच्यात काही प्रमाणात जागृति निर्माण झाली. अर्थात सिंचनाच्या सोयी नसणे आणि केवळ पावसाच्याच पाण्यावर शेती अवलंबून असणे अशा समस्या असल्याने शेतीतून मिळणारे उत्पन्न वर्षभर पोट भरण्यासाठी पुरेसे पडत नव्हते. त्यातूनही उपाशी राहण्याची वेळ यायची.' हे सर्व ऐकल्यावर त्यांच्या बिकट कार्याची जाणीव होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इथल्या समस्यांची डॉ. आमटे विश्‍लेषण करतात, त्याची कारणंही सांगतात त्यांच्या मते आदिवासी उपाशी राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे शोषण. येथील आदिवासींना काम करुनही मजूरी मिळत नाही. कंत्राटदार, शासकीय अधिकारी, सावकार आणि एकूणच यंत्रणेकडून त्यांचे शोषण होते. उपाशीपोटी त्यांच्याकडून काम करुन घेतले जाते मात्र मजूरी दिली जाईलच याची खात्री नाही. त्यातूनच मग या लोकांचे शोषण होते. या लोकांना एवढंही कळत नाही की ज्या आदिवासीला खायला मिळत नाही, ज्याला उपाशी राहावे लागते; त्याच्या हक्काची मजूरी आपण कशी हडप करतो? ज्याच्याकडे काहीच नाही त्यालाही लुटायचे अशी ही "नागरी' लोकांची मनोवृत्ती. हे लोक असं का करतात? असा नेहमी प्रश्‍न पडतो. यातूनच मग आदिवासींच्या कुपोषणाचे प्रमाण वाढते व हळूहळू त्यांची तब्येत ढासळत जाते व शेवटीत त्यांचा मृत्यू ओढवतो. अशा प्रकारचे कुपोषणाचे बळी म्हणजे नागरी व्यवस्थेतील भ्रष्ट माणसांनी एक प्रकारे केलेले खूनच वाटतात.' हे सांगताना अर्थातच डॉक्‍टर आमटे व्यथीत झालेले दिसतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे ते आणखी माहिती देतात, "आदिवासींच्या शोषणाचा एक आणखी एक प्रकार तर फारच धक्कादायकच आहे. तो म्हणजे भाताच्या बदल्यात मीठ विकणं. पूर्वी आदिवासी लोक मीठ खात नसत. बाहेरील व्यापाऱ्यांनी त्यांना मीठाची सवय लावली. त्यातही त्यांचे शोषणच झाले. म्हणजे व्हायचे असे की एक किलो मीठाच्या बदल्यात हे व्यापारी आदिवासींकडून चक्क दोन किलो भात घ्यायचे. विशेष म्हणजे त्यावेळी मीठाची किंमत होती अवघी 15 ते 20 पैसे किलो. केवळ आदिवासीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांचे अशा प्रकारचे शोषण व्हायचे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात या गोष्टीची कुठेही नोंद घेतली जात नाही. कुठेही वाच्यता होत नाही. कारण हे बळी म्हणजे एकदम न जाता हळूहळू घेतले जातात. हा एक "स्लो पॉयझनिंगचाच' प्रकार आहे. मग या प्रकारच्या अन्यायाविरुद्‌धही आम्ही आवाज उठवायला सुरुवात केली. शोषित आदिवासींच्या तक्रारी लिहून घ्यायला सुरुवात केली. भ्रष्ट यंत्रणेतील गैरकारभार उजेडात येऊ लागले. त्यातूनच मग काही अधिकाऱ्यांना निलंबनासारख्या शिक्षाही झाल्या. त्याचा चांगला परिणाम झाला. शासन यंत्रणेतील गैरकारभारावर वचक बसला. इतका की या भागात नवीन बदलून येणारा अधिकारीही घाबरला. त्यामुळे आदिवासींना त्यांची हक्काची मजूरी मिळण्यास सुरुवात झाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग मजुरी आणि शेतीच्या उत्पन्नावर येतील लोकांचे जेमतेम वर्षभर भागायला लागले. याचा परिणाम "लोकबिरादरी प्रकल्पा'विषयी आदिवासी लोकांचा विश्‍वास वाढायला मदत झाली. सुरुवातीला दवाखान्याच्या माध्यमातून, विविध रोगांवर उपचार करुन या लोकांमध्ये आरोग्याची जाणीव-जागृति निर्माण केली. मग शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावले व शिक्षणाची जाणीव आल्यानंतर शेतीसुधारणेवर भर दिला. अशी ही कामे एकात एक गुंतलेली आहेत. एकमेकांशी निगडीत आहेत. अर्थात हे सर्व काही ठरवून केले नाही. आधी फक्त ठरवले होते, डॉक्‍टरकीच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करावेत आणि त्यांना आरोग्याचं ज्ञान द्यावं, त्यातूनच बाकीच्याही गोष्टी घडत गेल्या.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग या सर्वांचे फलित सांगतातना डॉ. आमटे म्हणतात, "अर्थात हे सर्व काम गेल्या तेहेतीस वर्षांतले. आता अशी परिस्थिती आहे की येथील लोक शेती करु लागले आहेत. अर्थात त्यातही त्यांच्यापुढे समस्या आहेत. मुळात येथील शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. जलसंधारण आणि मृदसंधारणाच्या कामाची या ठिक?णी मोठ्या प्रमाणावर आवश्‍यकता आहे. या ?किाणी पाऊसमान चांगले आहेत. पावसाळ्यात नदी- नाले दुथडी भरुन वाहत असतात. ते अडविण्याची गरज आहे. तसेच शेततळी, बांध-बंधारे, यांचीही इथे उणीव जाणवते. खरे तर शेततळ्यांच्या माध्यमातून मत्स्यशेतीलाही येथे वाव आहे. त्यातून निदान या लोकांना पोटभर तरी खायला मिळेल. त्यामुळे त्यांच्यातील प्रथिनांची कमतरता दूर व्हायला आणि कुपोषणाचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. मात्र आजही शासनाचे या भागाकडे दुर्लक्षच आहे. शेतीच्या किंवा रोजगार हमीच्या कोणत्याही योजना इथे ?ाबविल्या जात नाहीत. शासकीय यंत्रणा त्याबाबतीत उदासिन असल्याचे दिसून येते. खरे तर केंद्र शासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिलेली असूनही त्या योजना इथे राबविल्या जात नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. शासकीय यंत्रणा जर याठिकाणी पुरेशी सतर्क आणि कार्यक्षम झाली तर शेतीसह सर्वच बाबतीत या भागातील लोकांचा विकास होऊ शकतो. त्यातून त्यांचे आजचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल. अर्थात त्यासाठी शासनाची आणि शासकीय यंत्रणेची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.'&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे सर्व मांडून झाल्यावर मग आपण हळूच त्यांना तेथील दुग्धोत्पादनाविषयी विचारतो, त्याविषयी ऐकल्यावर मात्र तेथील आदिवासींविषयी आपला आदर नक्कीच वाढतो. ते सांगतात, "देशाच्या इतर भागात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन केले जाते. मात्र येथील आदिवासींना गाईचे दूध काढण्याची माहितीच नाही. मुळात गाईचे दूध हे केवळ तिच्या वासरांसाठीच असते असा या लोकांना समज आहे. त्यामुळे शेतीसाठी गाई-बैलांचा वापर केला तरीही गाईचे दूध काढले जात नाही इतका उदात्त विचार या लोकांमध्ये असतो. त्यामुळे जर बाळंतपणात एखादी स्त्री दगावली तर तिच्या मुलाला जगविण्यासाठी पुरक अन्न उपलब्ध नसते आणि आईशिवायचे ते मूलही मग दगावते असा अनुभव आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात हळूहळू या परिस्थितीतही बदल होत आहे. दुग्धोत्पादनासंबंधी त्यांच्यात नगण्य का होईना जाणीव येत आहे. तथापि इथेही त्यांना मदतीची आवश्‍यकता आहे. गोधन जर एखाद्या आदिवासीने बाळगायचं ठरवलं तर त्याला खायला चारा कोठून आणायचा हा प्रश्‍नही त्या ठिकाणी आहे. म्हणूनच यासाठी चांगल्या शासकीय अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे'.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-1600341214412109589?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/1600341214412109589/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=1600341214412109589&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/1600341214412109589'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/1600341214412109589'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2007/04/blog-post_30.html' title='तपश्‍चर्यतून फुलविले आदिवासींचे जीवन !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-47959046083144959</id><published>2007-04-12T19:13:00.001+09:00</published><updated>2007-04-12T19:13:26.364+09:00</updated><title type='text'>जिंका जिंका परिस्थिती ( विन-विन सिच्युएशन)</title><content type='html'>मोठमोठ्या कॉर्पोरेटस्‌ मधून "जिंका जिंका परिस्थिती( विन-विन सिच्युएशन) हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. शहरातून थेट खेड्यापर्यंत हा शब्दप्रयोग पोहोचला आहे. मनुष्यांच्या सान्निध्यात राहून गाई-म्हशीही आता या शब्दप्रयोगाचा वापर करून बऱ्यापैकी फायदा पदरात पाडून घेऊ लागल्या आहेत. तो कसा? ते पाहू.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका खेडेगावात एक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी राहत होता. शेतीपासून, जनावरांपर्यंत विविध गोष्टीत चांगले प्रयोग राबवून त्याने बरीच प्रगती साधली होती. अशा या शेतकऱ्याची बऱ्यापैकी शेती होती. शेतात छानशी आमराई होती. राहत्या घराजवळच गुरांचा गोठा होता. या गोठ्यात हौसा नावाची म्हैस, गौरा नावाची गाय आणि करडा नावाची शेळी आपापाल्या परिवारासह सुखेनैव नांदत असत. कुठेही चरायला, फिरायला जायचे झाले की हे सर्व सोबतच जात असत. मग त्यांच्या मैत्रीत गाय, म्हैस, शेळी असा जातीभेद नसे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पण अलीकडे मात्र या तिघींच्याही परिवारात एक प्रकारची तेढ निर्माण झाली होती. एकमेकांना मिळणारा हिरवा चारा, चंदी यांच्या वाटपातून त्यांच्यात मतभेद उदभवले होते. त्यातूनच हवेदावेही केले जात. गौरा गाईचे म्हणणे असे होते की, हौसा म्हशीला डुंबण्यासाठी अतिरिक्त पाण्याची सोय करून देऊन आपला मालक "स्पेशल ट्रिटमेंट देतो'. याऊलट हौसा म्हशीला असे वाटायचे की गाईंना पूज्य मानण्याच्या हिंदू धर्मातील पद्धतीमुळे मनुष्यप्राणी या गौरापुढे नाक घासतो, तिला खास दिवशी पुरणपोळी वगैरे दिली जाते. याशिवाय तिला मारहाण करणे वगैरे पाप समजतात आणि असे जर कोणी केले तर त्याविरुदध वेगवेगळ्या मानवी संघटना आवाज उठवतात. शासनानेही गाईच्या जातीला विशेष सवलती दिल्या आहेत. काही राज्यात तर गोवंश हत्याबंदी सारखे कायदेही करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही गाय जास्तच भाव मारते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या दोघींप्रमाणेच शेळीचेही काही मुद्दे होते. तिच्या आकारामुळे तिला हीन लेखले जाते अशी तिची तक्रार होती. शिवाय गाई, म्हशीच्या दूधाचे सध्या बऱ्यापैकी "ब्रॅंडीग' होते त्यामुळे शेळीच्या दूधाला कुणी विचारत नाही. मग आपला मालकही आपल्याला गौरा-हौसा प्रमाणे खायला घालत नाही. त्यासाठी आपल्याला गावाजवळच्या टेकड्यांवर, माळरानावर भटकावे लागते. करडा शेळीचे गौरा आणि हौसा बद्दल जसे संयुक्त मत होते, तसेच त्या दोघींचेही करडा बद्दल तसेच विरोधी मत होते. त्यांच्या मते करडा शेळी आकाराने लहान असल्याने तिच्यावर शेतीकामाची काहीच जबाबदारी नसते. त्यामुळे तिला वेगवेगळ्या ठिकाणी मस्त दौरे वगैरे करायला मिळतात. आपल्याला मात्र गोठ्यात किंवा शेतातच रहावे लागते. आपण जेव्हा दावणीला बांधलेले असतो तेव्हा ही करडा छानपैकी वेगवेगळ्‌या दौऱ्यांना जाते. मालकही तिला फिरण्यासाठी प्रोत्साहन देतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर असे हे मतभेद वाढत जाऊन विकोपाला पोचले होते. त्यामुळे तिघींचाही स्वभाव आकडू बनला होता. तसेच "इगो प्रॉब्लेम' का काय म्हणतात, त्याचीही लागण त्यांना व्हायला लागली होती. त्यांच्यातला संवादच हरवला होता. शेवटी या सर्वांचा परिणाम व्हायचा तोच झाला. तिघींचीही कार्यक्षमता कमी झाली. गौरा-हौसा पूर्वीसारख्या दूध देईनाशा झाल्या तर दूरवर खाणे शोधायचा कंटाळा केल्याने करडाच्या तब्येतीवर परिणाम होऊन ती बारीक दिसायला लागली. ही सर्व गोष्ट चाणाक्ष शेतकऱ्याच्या ध्यानात यायला वेळ लागला नाही. त्याने आपल्या गोठ्यामधली परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी आपल्या अमित नावाच्या मुलावर सोपवली. अमित हा पदवीधर आणि हुशार मुलगा होता. शेतीची त्याला आवड होती. शहरात राहून त्याने "कार्पोरेट शेती' सारख्या विषयांचा अभ्यास केला होता, त्याच्या जोडीला मनुष्यबळ विकास ( एच. आर.) विषयातील प्रशिक्षणही त्याने घेतले होते. मनुष्यांप्रमाणेच प्राण्यांचेही एक मानसशास्त्र असते हे त्याला एका शेतीच्या दैनिकातील लेखमालेवरून माहिती झाले होते. गोठ्यातील प्राण्यांच्या मानसशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून त्याठिकाणी "एच. आर. (मनुष्यबळ विकास)' च्या काही कल्पना राबविल्या तर त्यांच्या उत्पादन क्षमतेवर निश्‍चित चांगला परिणाम होईल असा त्याने निष्कर्ष काढला. मनुष्यबळासाठी जसा "एच. आर.'सारखा प्रकार असतो तसाच प्राण्यांसाठी एखादी "ऍनीमल रिसोर्स' सारखी गोष्ट असते का? यासाठी त्याने शोध सुरु केला. कोणत्याही नवीन गोष्टी केवळ पुण्यातच केल्या जातात असे तो ऐकून होता. त्यादृष्टीने त्याने पुण्यातील मित्रांकडे संपर्क साधून चौकशी केली, तर त्याला चक्क अशी संस्था कार्यरत असल्याचे समजले. इतकेच नाही तर प्राण्यांचा विकास करण्यासाठी ही संस्था सर्वेक्षण वगैरे करून देते आणि आवश्‍यकता असल्यास आपल्याकडील क&lt;br /&gt;ाही प्रशिक्षित प्राणी संबंधीत गोठ्यात " ए. आर.' म्हणूनही पाठवते. अमितला यामुळे फारच आनंद झाला. त्यासंस्थेशी संपर्क साधून आपल्या गोठ्यातील जनावरांची परिस्थिती सांगितली. संस्थेने त्याला सर्वेक्षण करावे लागेल असे सांगितले. अमित त्यासाठी तयार झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लवकरच पुण्याहून गावाकडे असलेल्या हौसा-गौरा-करडा यांच्या सर्वेक्षणासाठी "ए. आर( अर्थातच ऍनीमल रिर्सार्स) चे पथक दाखल झाले. सर्वेक्षणाअंती त्यांनी असा निष्कर्ष काढला की, " या सर्व जनावरांमध्ये "कम्युनिकेशन प्रॉब्लेम' आहे, तो घालविण्यासाठी आमच्या संस्थेतून नुकतेच "ए.आर.' चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एका अरबी घोड्याला तुम्हाला प्रशिक्षक म्हणून नेमावे लागेल. हा घोडा पूर्णपणे प्रशिक्षित आहे. त्याला प्राण्यांमधील संवादशास्त्राची चांगली जाण आहे. त्यामुळे तो तुमच्याकडील जनावरांची मानसिकता समजावून घेऊन त्यांची उत्पादनक्षमता निश्‍चितच वाढवू शकेल.' मग त्या "ए.आर.' झालेल्या घोड्याला शेतकऱ्याच्या गोठ्‌यातील प्राण्यांबरोबर काही दिवस ठेवण्यात आले. काही दिवसातच चांगले परिणाम दिसून आले. गोठ्यातील जनावरे काही प्रश्‍न, मतभेद असतील तर त्या घोड्याला सांगायच्या आणि तोही आपले ज्ञान वापरून त्या समस्या सोडवायचा. लवकरच गौरा, करडा आणि हौसा यांच्यात "कम्युनिकेशन' निर्माण झाले. त्याचा परिणाम त्यांच्यातील मतभेद कमी होण्याला झालाच शिवाय त्यांची "प्रॉडक्‍टीव्हिटी' सुधारण्यासाठीही मदत झाली. हौसा-गौराला तर सर्वाधिक दुग्धोत्पादनाचे पुरस्कारही मिळाले. शेतकरीही खूष झाला. सर्व काही सुरळीत झाले असल्याने "ए.आर.'वाल्या घोड्याला आता परतावे लागणार होते. तो परतत असताना गोठ्यातील सर्व प्राणी त्याच्याभोवती जमा झाले आणि "आम्हाला काहीतरी दोन चांगले युक्तीचे शब्द सांग' असा त्यांनी आग्रह धरला. मग त्याने या सर्वांना "विन-विन सिच्युएशन' ( अर्थातच जिंका जिंका परिस्थिती) बद्दल सांगून एकत्र काम केले तर कसा फायदा होतो तेही सांगितले. सर्वांना ते पटले. मग त्यांनीही यापुढे गुण्या गोविंदाने नांदायचे ठरवले. विन-विन सिच्युएशनमध्ये जगायचे ठरवले. त्यांचे जीवन पुन्हा पहिल्यासारखे झाले&lt;br /&gt;.&lt;br /&gt;**********************&lt;br /&gt;&lt;br /&gt;ते असेच आनंदाने जगत असताना मे महिना उजाडला. दिवस आंब्याचे होते. गोठ्याशेजारच्या आंब्याच्या आढीतून आंब्यांचा मस्तपैकी घमघमाट सुटला होता. या सर्वांनाच आंबे खावे असे वाटत होते. पण हे शेतकऱ्याला सांगायचे कसे? मग त्यांना युक्ती सुचली. गौरा- हौसा- करडा यांनी एक दिवस "विन विन सिच्युएशनचा' प्रयोग करण्याचे ठरवले. हौसा म्हैशीने मोठ्याने " आम्म्या? आम्म्म्याऽऽऽ? असा आवाज काढून शेतकऱ्याच्या अमित नावाच्या मुलाला बोलावले. आणि चक्क तो आलाही. तो आल्यावर करडा शेळी मोठ्याने " मे, मेऽऽऽ मेऽऽऽ( अर्थात मे महिना या अर्थाने) ओरडली. करडा अशी म्हणाल्याबरोबर गौराने ठेवणीला "हंबाऽऽऽ, हंबाऽऽऽ, ...बाऽऽऽआंबाऽऽऽऽ (म्हणजे आंबे हवेत)' असे ओरडायला सुरवात केली. शेतकऱ्याच्या चाणाक्ष मुलाला ते लगेच समजले आणि त्याने खूश होऊ तिघांना आणि त्यांच्या परिवाराला आंबे आणून दिले. मनसोक्त आंबे खाल्यावर "विन विन ?च्यिुएशन' चे असेही परिणाम होतात या विषयावर मग तिघींनीही छानपैकी गप्पा मारल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;************************&lt;br /&gt;&lt;br /&gt;या अनोख्या प्रयोगाची माहिती मीडियापर्यंत पोहोचलीच. त्यांनी चक्क त्यावर ब्लॉग, वेबसाईटमधून लेख लिहीले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-47959046083144959?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/47959046083144959/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=47959046083144959&amp;isPopup=true' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/47959046083144959'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/47959046083144959'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2007/04/blog-post.html' title='जिंका जिंका परिस्थिती ( विन-विन सिच्युएशन)'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-8572577220533186538</id><published>2007-01-11T15:57:00.001+09:00</published><updated>2007-01-11T15:57:44.067+09:00</updated><title type='text'>नुस्ता हिशेब</title><content type='html'>&lt;p align="center"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/RaXfO910FbI/AAAAAAAAAAM/pArquBF04rc/s1600-h/sunset.jpg"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5018662807985722802" style="WIDTH: 212px; CURSOR: hand; HEIGHT: 290px" height="290" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/RaXfO910FbI/AAAAAAAAAAM/pArquBF04rc/s400/sunset.jpg" width="219" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;आयुष्यभर लिहीलेला जमा-खर्च,&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;चाळला एका संध्याकाळी&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;तेव्हा लक्षात आलं....&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;आता उरल्याय फक्त काही जुन्या डायऱ्या&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;अक्षरांनी भरलेल्या...&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;अन्‌ तसेच एक जुने पेन, &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;कुरकुरणारे...&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;मग विचार केला,&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;डायऱ्या चाळून घेऊ...&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;अन्‌ बघू सगळा हिशेब एकदा..&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;चाळल्यावर समजलं,&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;त्यातही बरीच पानं कोरी होती....&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;&lt;strong&gt;--पंकज&lt;/strong&gt; &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-8572577220533186538?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/8572577220533186538/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=8572577220533186538&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/8572577220533186538'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/8572577220533186538'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2007/01/blog-post.html' title='नुस्ता हिशेब'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_dq2uihwktK4/RaXfO910FbI/AAAAAAAAAAM/pArquBF04rc/s72-c/sunset.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-116298456362902343</id><published>2006-11-08T20:09:00.000+09:00</published><updated>2006-11-08T20:16:47.223+09:00</updated><title type='text'>लहानपणचे आंदोलन !</title><content type='html'>शेतीबद्दल प्रत्यक्षात खूप काही माहिती असण्याचे ते वय नव्हतं. अर्थात तरीही शेताशी वेगवेगळ्या कारणाने संबंध यायचाच. कुणाच्या शेतावरुन ऊस तोडून आण; कुणा मित्राबरोबर त्याच्या शेतातून हरभरा आण; कधी कुणा अनोळखी शेताच्या बांधावर असलेल्या बोरीच्या झाडाची, रखवालदाराची नजर चुकवून बोरंच पळव; यासाठी शेताशी भरपूर संबंध यायचा. शाळेतून सुटल्यानंतर कधी कुणाच्या शेतावर तर कधी नदीकाठी अशी भटकंती चालत असे. हे वडिलांचे बदलीचे गांव होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आमची स्वत:ची शेती मात्र वडिलांच्या मूळ गांवी होती. बरीचशी कोरडवाहू. केवळ बाजरी वगैरेचे उत्पादन व्हायचे अन्‌ तेही कमी. एकदा चक्क दहा हजार रुपये खर्चून लांबवरुन पाणी वगैरे मिळवून कांदा केला. पण नशीब खराब, त्यावेळी कांद्याचे उत्पन्न अमाप आले अन्‌ भाव गडगडले. दहा पैसे प्रति किलो. अनेकांनी कांदे फेकून दिले. आम्हाला केवळ चार-पाचशेचे उत्पन्न झाले. अर्थात वडिल व काकांकडून ही माहिती नंतर केव्हातरी समजलेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt; ज्या गावांत आम्ही राहात होतो, तेथेही हीच परिस्थिती होती. कांदा फेकून द्यावा लागला होता. मग माझ्या बरोबरीची पोरंटोरांनाही शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे याची जाणीव होऊ लागली होती. दरम्यान त्याचवेळेस शेतकरी संघटनेची चळवळ राज्यात जोर पकडत होती. आम्ही रहात असलेलं गांव तर खास शेतकरी संघटनेचंच समजलं जायचं. अधून मधून काही ना काही कार्यक्रम, आंदोलनं, मोर्चे वगैरे प्रकार त्यानिमित्ताने घडायचे. गावातील समग्र भिंतींवर गेरूच्या रंगाने एकच घोषणा ठळकपणे असायची," शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे.' आम्ही मुलंही आमच्या गप्पांच्या विषयांत शेतमालाला रास्त भाव मिळण्याविषयी चर्चा वगैरे करत असू. अर्थात चौथी किंवा पाचवीत असू त्यावेळेस.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या खूप जवळच्या तरुण कार्यकर्त्यांपैकी एक कार्यकर्ता त्या गावचा. त्यामुळे शरद जोशींचाही एकदोनदा या गावी कार्यक्रम झालेला. त्या कार्यकर्त्याचे घर आमच्याच गल्लीत होते. तो वडिलांचा विद्यार्थीही होता. पन्नासच्या आसपास असलेल्या त्याच्या आईचे आमच्या कडे येणे-जाणे असे. माझ्या आईशी कधी-कधी त्या गप्पा मारायला येत. गप्पांमध्ये आपल्या मुलाच्या कर्तृत्वाचा, शेतकरी संघटनेचा आणि शरद जोशींचा हमखास उल्लेख असे. कधी कधी मी या गप्पा दुरुनच पण बारकाईने ऐकत असे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींची माहिती मिळे व त्या आधारे शाळेतली जी मुले शेतकरी संघटनेवर आणि बाजारभावावर अधिकारवाणीने(?) बोलत असत, त्यांच्या समोर बऱ्यापैकी भाव खाता येई. अर्थात अशाच पद्‌धतीने काळ पुढे सरकत राहिला. आम्ही शाळा, खेळ यांच्याबरोबरच शेतांमध्ये भटकत राहीलो. शेतातील रानमेवा मुक्तपणे चाखत राहिलो. गप्पा मारत राहिलो. तिकडे शेतकरी संघटनेची आंदोलनंही होत राहिली आणि शेतमालाला रास्त भाव मिळायलाच पाहिजे याच्या घोषणाही होत राहिल्या.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही मुलं आता सातवीत होतो. नुकतीच शाळा सुरु झाली होती अन्‌ पाऊसही. एक दिवस सकाळीच शेतकरी संघटनेच्या त्या कार्यकर्त्याच्या आई आमच्याकडे आल्या. संघटनेच्या एका मोर्चासाठी आपल्याला नाशिकला जायचेय म्हणाल्या. गावातील बऱ्याच बायका येणार म्हणाल्या. आई तयार झाली. ते बघून मीही तिच्याबरोबर जाण्याचा हट्ट करू लागलो आणि तिच्याबरोबर येण्याची संमती मिळवली. शाळेला अर्थातच दांडी. आंदोलन-मोर्चा वगैरे गोष्टी समजण्याचे ते वय नव्हतेच. आनंद एवढाच होता की टेम्पोतून जिल्ह्याच्या गावापर्यंत प्रवास करायला मिळणार होता. त्यानंतर ठरलेल्या वेळी व ठिकाणी एकत्र जमून आमचा टेम्पो नाशिककडे निघाला. त्यात बहुतेक बायकाच होत्या. &lt;br /&gt;&lt;br /&gt;साधारण साडेअकरा-बाराच्या सुमारास आम्ही नाशकात पोहोचलो. नाशिकच्या कालीदास कलामंदीरात आमची उतरण्याची व्यवस्था केलेली होती. तिथल्या वेटिंग रुममध्ये आमचे चहापाणी झाले. कुणी डबे वगैरे आणले होते, ते तिथेच खाल्ले. या ठिकाणी जिल्ह्यातून खूपच लोक आलेले होते. सगळीकडे त्यांचीच गर्दी होती. आता कुठे जायचे? काय करायचे? अशा चौकशा करून मी मध्येच आईला सतावत होतो. दरम्यान नाट्यगृह काय असते? कसे असते? या बाबतची माझी उत्सुकता मी या ठिकाणी हिंडून भागवून घेतली. एका गावाकडच्या पोराला शहरातल्या एवढ्या मोठ्या नाट्यगृहाचे अप्रूप वाटणारच. या नाट्यगृहातून नंतर सर्वांनाच कुठेतरी जायचे होते. झेड.पी., झेड. पी. असे काही बायका व पुरुष म्हणत होते. झेड.पी.वर मोर्चा न्यायचा होता. तिथे भाषणंही होणार होती. त्यानंतर मग आम्हाला परत गावी जायला मिळणार होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt; माझी चुळबुळ सुरुच होती. कुणीतरी मग एक कागद माझ्या हातात दिला आणि म्हणाले की तू भाषण करशील का तेथे? मला बोलायला लावण्याची आयडीया कुणाच्या सुपिक डोक्‍यातून आली कोण जाणे. मी शाळेच्या कार्यक्रमांत बऱ्यापैकी भाषणं करतो हे त्यांना आईकडून कळाले असेल कदाचित. मला मात्र त्यावेळी भटकण्याऐवजी भाषण करायला लागणार या विचाराने वैताग आला होता. कारण आतापर्यंत मी फक्त लोकमान्य टिळक, सानेगुरुजी, डॉ.आंबेडकर, छ. शिवाजी महाराज, या राष्ट्रपुरुषांविषयीच भाषणे केलेली होती. एखाद्या संघटनेबद्दल, मोर्चात भाषण करण्याचा मला काही अनुभव नव्हता. परंतु नंतर एक गोष्ट चांगली झाली की ती जबाबदारी माझ्याकडून निघून गेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता याठिकाणहून मोर्चाला सुरुवात झाली. शाळेच्या प्रभातफेरीत जातात तशीच बायका-पुरुष-मुले वगैरे दोन-दोनच्या जोड्या करून रांगेने चालायला लागली. मी आईचा हात धरून मोर्चात चालायला लागलो. नाशिक शहराच्या बहुतेक सर्व भागांत फिरून हा मोर्चा झेड.पी.च्या ठिकाणी येणार होता. मोर्चात अधून-मधून घोषणाही दिल्या जात होत्या. पुन्हा शेतमालाला बाजारभाव मिळालाच पाहिजे ही घोषणा होतीच आणि घोषणा देणाऱ्यात मीही होतो. मोर्चाच्या दरम्यान एक गोष्ट घडली, ती म्हणजे थोडयाच वेळात पावसाला सुरवात झाली. &lt;br /&gt;&lt;br /&gt;कुणाकडेच छत्री वगैरे काही नव्हते. आमच्याकडेही. पावसाचा जोर तर वाढतच होता. परंतु कुणीही मोर्चाची रांग मोडली नाही की आडोशाला जाऊन थांबले नाही. सर्वजण प्रचंड भिजले होते. पण तरीही मोर्चा सुरुच होता. मी ओला व्हायला लागलो तसा आईने मला तिच्या पदराखाली घेतले. अर्थात पाऊस लागतच होता. शहरातून हिडणारी सर्व मंडळी आमच्याकडेच बघत असल्याचे मला जाणवत होते. शेवटी एकदाचा ठरल्याप्रमाणे झेड.पी. नावाच्या जागेवर मोर्चा आला. तेथील रस्ता या टोकापासून त्या टोकापर्यंत प्रचंड गर्दीने भरुन गेला होता. पोलीसांचा प्रचंड बंदोबस्त होता. पोलीसांच्या गाड्याही बऱ्याच होत्या. आम्ही बसलो होतो त्या शेजारीच कमरेला बंदूक लावलेला एक फौजदार टाईप पोलीस काही सवंगड्यांसह ऐटीत उभा होता. इकडे मुख्य नेत्यांचे भाषण सुरु झाले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;भाषण काय झाले ते काही समजले नाही. पण मध्येच "शासनाला याची जाणीव असायला हवी..... आमचे शासनाला सांगणे आहे.. ' वगैरे वाक्‍य कानावर पडत होते. त्यावेळेस जवळ उभा असलेला पोलीस म्हणजेच शासन असा माझा पक्का समज झालेला होता. थोड्या वेळाने काय झाले कुणास ठाऊक पण कुणीतरी घोषणा केली, " आपल्या मुख्य नेत्यांना नुकतीच अटक करण्यात आलेली आहे. त्याचा निषेध म्हणून आपण सर्वांनीच अटक करून घ्यायची आहे.' या घोषणेनंतर एकच गोंधळ उडाला. आई आणि मी थोडे घाबरलो,आता काय होणार या विचाराने. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मग कुणीतरी सांगितले की बाजूला ज्या पोलीसांच्या गाड्या उभ्या आहेत, त्यात आपल्याला जायचेय. बाजूला मिनीबससारख्या निळ्या रंगाच्या व जाळी लावलेल्या पोलीसांच्या गाड्या उभ्या होत्या. सर्वानी मग त्यात बसण्यासाठी एकच गोंधळ केला. या गर्दीत कोण कुठे तर कोण कुठे निघून गेले. आमची आणि आमच्या बरोबरीच्या बायकांचीही ताटातूट झाली. आईही गोंधळली आणि घाबरली. तिनं माझा हात घट्ट धरुन ठेवला. पण तिला ओढतच मी एका पोलीसांच्या गाडीपाशी घेऊन गेलो. आणि बायकां आणि पोलीस यांच्या गर्दीतून वाटत काढत बसमध्ये चढलोही.&lt;br /&gt;&lt;br /&gt; बसमध्ये चढल्यावर सर्वात आधी एक गोष्ट केली माझ्यासाठी खिडकीजवळची जागा बघीतली आणि शेजारचे सीट आईसाठी पकडून ठेवले. मग तिथून खाली गर्दीत असलेल्या आईला ओरडून सांगितले, "तुझी पण जागा धरलीय गं, पटकन आत ये' मग बऱ्याच वेळाने गर्दीतून वाट काढत आई आली आणि मी पकडलेल्या जागेवर बसली. त्यावेळेस एवढ्या गर्दीतून दोन जागा पकडल्याचे पूरेपूर समाधान आणि अभिमान माझ्या मनात दाटून आला होता. आपण जागा पकडली ती गाडी पोलीसांची आहे आणि आपल्याला अटक झालीये ही गोष्ट तर मी साफच विसरून गेलो होतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;यथावकाश आम्ही पोलीसकॅंपवर आलो. त्याठिकाणी पोलीसांसाठीच्या बराकींमध्ये आमची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. तिथे आम्हाला त्यांच्यातर्फे चहाही देण्यात आला. दोन-तीन तास थांबल्यानंतर सायंकाळी सायंकाळच्या सुमारास आम्ही परत आमच्या टेंम्पोत बसलो आणि गावाकडे परत निघालो. टेम्पो निघताना पुन्हा घोषणा वगैरे झाल्या, शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे. आमची गाडी गावच्या वाटेला लागली. रात्र होत होती. आकाशात चंद्र उगवला होता. हवेत गारवा होता. त्या रम्य वातावरणात मीही मग आईच्या मांडीवर हळूच डोके ठेवून शांतपणे झोपून गेलो. अभावितपणे, लहानपणीच एक&lt;br /&gt;ा आंदोलनात सामिल झालेल्या मला मात्र त्यावेळेस ही कल्पना नव्हती की मोठं झाल्यावर आपल्याला रोजच्या जीवनात अनेक आंदोलनांना सामोरं जावं लागणार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज या घटनेला जवळपास सोळा सतरा वर्षे होऊन गेलेली आहेत. त्या आंदोलनात सहभागी झालेले अनेक नेते पक्ष बदलत मोठे झालेले आहेत. कुणी या जगाचा निरोपही घेतला आहे. शेतमालाला रास्त भाव मिळायलाय पाहिजे असे म्हणणारे माझे शाळासोबती, कुणी नोकरी- व्यवसायात, तर कुणी शेतीत स्थिरावले आहेत. मी ही एका शेतीसंबंधी दैनिकात स्थिरावलोय. आजही शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. जोरात सुरु आहे. सर्व काही व्यवस्थित सुरू आहे....प्रत्यक्षात साकारली नाही ती एकच गोष्ट, "शेतमालाला रास्त भाव मिळण्याची.'&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-116298456362902343?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/116298456362902343/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=116298456362902343&amp;isPopup=true' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/116298456362902343'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/116298456362902343'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/11/blog-post.html' title='लहानपणचे आंदोलन !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-116039926333945246</id><published>2006-10-09T22:05:00.000+09:00</published><updated>2006-10-09T22:07:43.363+09:00</updated><title type='text'>सुतळीबॉम्ब'ची चाचणी</title><content type='html'>आवाज करणाऱ्या फटाक्‍यांची मला लहानपणापासूनच भीती वाटत आलीय. त्यातले त्यात सुतळी बॉम्ब सारखे प्रकार माझ्या दृष्टीने फारच भयानक. साधारणपणे हायस्कूलात जायला लागल्यावर मी लवंगी फटाके उडविण्याचे धैर्य करू लागलो. त्याची पद्धतही मोठी सुरक्षित होती. एका कागदावर एका टोकाला लवंगी फटाका ठेवायचा आणि तो कागद दुसऱ्या टोकाने पेटवायचा. (त्यामुळे होतं काय? की फटाक्‍याच्या वातीपर्यंत आग येऊन तो पेटण्यास साहजिकच वेळ लागतो आणि आपल्याला त्या ठिकाणाहून सुरक्षित जागी पळून जाऊन कानात बोटे घालण्यासाठी वेळ मिळतो.) साधारणपणे सातवीत येईपर्यंत ही पद्धती वापरुन लवंगी फटाक्‍यांबरोबरच मोठमोठे लक्ष्मी बॉम्ब उडवायला शिकलो होतो. याच कालावधीत दिवाळी संपल्यानंतर सुतळीबॉम्ब फोडल्यानंतर फारच विलक्षण अनुभव माझ्या वाट्याला आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर घडले असे, डोंबिवलीच्या घनदाट पद्धतीने बांधलेल्या इमारत कम चाळीत माझा मामा राहत होता. आम्हा भाच्यांवर त्याचा प्रचंड जीव. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीत तो बऱ्यापैकी फटाके आणायचा. त्यात आवाज करणारे फटाके तसे कमीच असायचे. पण त्या वर्षी मात्र त्यात चुकून भल्या मोठ्या आकाराच्या सुतळी बॉम्बचे एक पाकीट आले. त्या भागाची स्थिती अशी होती की तिथे सुतळी बॉम्ब उडवायचे म्हणजे इमारतीची एखादी भिंत पडण्याची भीती ! मग मामा म्हणाला की हे तू गावी गेल्यावर उडव. त्यानुसार सुटी संपल्यानंतर मी ते सुतळी बॉम्ब माझ्याबरोबर गावी आणले. शाळा सुरु होऊन एक आठवडा झाल्यानंतर मला सुतळीबॉम्ब वाजविण्याची हुक्की आणि हिंमत आली. मग सुतळीबॉम्ब उडवीण्यासाठी दुसऱ्यादिवशी सायंकाळची वेळ ठरविली. आणि हो,जागाही ठरविली - शाळेसमोर असलेली माळरानवजा मोकळी जागा !&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसऱ्या दिवशी सायंकाळी एका शाळासोबत्याला घेऊन सुतळीबॉम्बसह मी ते मैदान गाठले. सोबत लांबलचक कागद होताच. स्वतंत्रपणे स्वत: सुतळीबॉम्ब उडविणे ही दोघांच्याही आयुष्यातीली पहिलीच घटना होती. त्यामुळे माझ्या मनात एक प्रकारची भीतीही होती. माझा सोबती मात्र बऱ्यापैकी हिम्मतवाला होता. आणि त्याआधारे सुतळीबॉम्ब पेटविण्याच्या मोक्‍याच्या प्रसंगी तो मला धीर देत होता. साधारणपणे एक वर्ग किलोमीटर आकाराचे ते मैदान होते, त्यामुळे पळायला भरपूर वाव होता. माझ्या पद्‌धतीप्रमाणे लांब कागदाच्या एका टोकाला सुतळीबॉम्ब ठेवून, कागदाचे दुसरे टोक आम्ही पेटविले आणि ज्या वेगाने शक्‍य होईल त्या वेगाने मैदाच्या दुसऱ्या भागात जीव घेऊन पळालो आणि योग्य अशा सुरक्षित जागी उभे राहिलो. आता बॉम्ब कधीही फुटणार होता. किती मोठा आवाज होणार? वगैरे भीतीने माझ्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते. शेवटी एकदाचा तो बॉम्ब फुटला आणि त्याठिकाणी एक मोठा आगीचा गोळा आम्हाला दिसला. क्षणभर डोळे दिपले. परंतु आवाज मात्र आला नाही. ज्या अर्थी आवाज आला नाही त्या ते सर्व सुतळीबॉम्ब फुसके असल्याचा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे एक गोष्ट बरी होती की आता मी घरापुढील अंगणात ते सुतळीबॉम्ब उडवू शकणार होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शनिवारी आमची सकाळची शाळा असायची आणि दुपारी सुटी असायची. शनिवारी चार-पाचच्या समोर घरासमोर सुतळीबॉम्ब उडविण्याचा विचार पक्का केला. आम्ही राहत होतो त्या घराची रचना अशी होती. संपूर्ण घर मातीचे होते. घरासमोर साधारण वीस - पंचवीस फुट लांबीचा चिंचोळ्या आकाराचा ओटा किंवा अंगण होते. अंगण संपल्यानंतर त्या गावातील बऱ्यापैकी वर्दळीचा छोटासा रस्ता आणि त्या पलीकडे हेअर कटींग सलूनची तीन दुकाने होती. रस्त्यावरून लांब उडी मारली की कमी श्रमात आणि फारच कमी वेळात कटींगसाठी समोरच्या दुकानात जाता येत असल्यामुळे मला या दुकानांचा त्यावेळी फार अभिमान होता. कारण येथे कटींग करण्यासाठी बरोबरच्या मुलांना दूरवरुन यावे लागे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;या दुकानात नाना नावाच्या भल्या गृहस्थांचे त्यातले त्यात बऱ्यापैकी सजविलेले दुकान होते. नाना पन्नाशीत असले तरी त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होती आणि गप्पा मारण्यासाठी व पेपरची लहानमुलांची पुरवणी वाचण्यासाठी मी त्यांच्या दुकानी अधूनमधून जात असे. सकाळी आणि सायंकाळी या दुकानावर सतत गर्दी असे आणि आमच्या घराच्या दारातून जेव्हा बघू तेव्हा कोणाची दाढी किंवा कोणाची कटींग करताना नाना नजरेस पडत असत. असो तर मी अंगणाच्या रस्त्याकडील टोकाला सुतळीबॉम्ब उडविण्याचे ठरविले. सायंकाळची वेळ होती. नानांच्या दुकानात नेहमीसारखी गर्दी होती आणि तेही बऱ्यापैकी कामात गढलेले होते. त्यामुळे त्यांना ही सुतळीबॉम्बची गोष्ट मी सांगितली नाही. तसं सांगितले असते तर त्यांनी माझ्या मदतीला माझ्यापेक्षा खूपच मोठ्या असलेल्या दोन मुलांपैकी एकाला पाठविलेही असते. परंतु सुतळी बॉम्ब फुसके असल्याने कोणाची मदत घेतली तर आपली प्रतिष्ठा खालावेल म्हणून मीच सुतळीबॉम्ब पेटवायचे ठरविले. आणि नेहमीच्या "कागद' पद्धतीने सुतळीबॉम्ब पेटविला आणि बचावाचा उपाय म्हणून घराच्या दारात पळून आलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आता नुसताच उजेड दिसेल असे वाटले. पण या खेपेस तसे घडले नाही आणि जोरात धडाम्‌ऽऽ असा आवाज आला. धमाका फारच मोठा होता. अनपेक्षितरित्या आलेल्या या आवाजाने बरेच जण दचकले. अर्थात त्यात मीही होतो. पण त्यातून एक गोष्ट चांगली झाली आणि ती म्हणजे मी स्वावलंबीपणाने सुतळीबॉम्ब उडवू शकतो असा आत्मविश्‍वास आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही घटना नंतर मी विसरुन गेलो. पण दुसऱ्या दिवशी सायंकाळी बाहेरुन आल्यावर वडील माझ्यावर बऱ्यापैकी चिडले. पण मी काय केले? असा मला प्रश्‍न पडला. "तू गल्लीत सूतळीबॉम्ब फोडला म्हणून समोरचे नाना सांगत म्हणाले' त्यांची आगपाखड सुरु झाली. " पण, मी तर आपल्या अंगणात फोडला होता. यात त्यांचा संबंध कुठे येतो?' माझे स्पष्टीकरण. " &lt;strong&gt;ते सगळं ठिक आहे, पण त्याचा जो आवाज झाला त्यामुळे ते दचकले आणि गिऱ्हाईकाची दाढी करताना त्यांच्या हातून वस्तरा सटकला ना ! ' वडीलांनी खरे कारण सांगितले.&lt;/strong&gt; त्यांच्या चिडण्यामुळे मी नाराज झालो. मात्र तरीही समोरचे नाना ग्राहकाची मन लावून दाढी करताहेत आणि अचानक मोठा धमाका होऊन त्यांच्या हातातून वस्तरा सटकतो... मग त्या ग्राहकाचे काय झाले असेल? ही कल्पना डोळ्यासमोर लढवून मी बाजूला जाऊन पोटभर हसून घेतले. झाल्या प्रकाराने आधी रागावलेले वडीलही नंतर बऱ्यापैकी हसत होते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;मी मात्र या घटनेतून बोध घेतला. बॉम्ब खरा असो की सुतळीबॉम्ब त्याची चाचणी घेतल्यावर विलक्षण हंगामा होतो&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-116039926333945246?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/116039926333945246/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=116039926333945246&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/116039926333945246'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/116039926333945246'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/10/blog-post.html' title='सुतळीबॉम्ब&apos;ची चाचणी'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115839971242292536</id><published>2006-09-16T18:40:00.001+09:00</published><updated>2006-09-16T18:43:23.606+09:00</updated><title type='text'>I like this song</title><content type='html'>&lt;embed src="http://www.odeo.com/flash/audio_player_standard_gray.swf" quality="high" width="300" height="52" name="audio_player_standard_gray" align="middle" allowScriptAccess="always" wmode="transparent"  type="application/x-shockwave-flash" flashvars="audio_id=1908303&amp;audio_duration=293.887&amp;valid_sample_rate=true&amp;external_url=http://media.odeo.com/1/9/3/Choti_si_Asha.mp3" pluginspage="http://www.macromedia.com/go/getflashplayer" /&gt;&lt;/embed&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115839971242292536?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115839971242292536/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115839971242292536&amp;isPopup=true' title='2 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115839971242292536'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115839971242292536'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/09/i-like-this-song_16.html' title='I like this song'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115747156804538282</id><published>2006-09-06T00:44:00.000+09:00</published><updated>2006-09-06T00:52:48.060+09:00</updated><title type='text'>...मी साधू झालो !</title><content type='html'>दिवस आता कलायला लागला होता. तपोवनातल्या सेक्‍टर दोन मधून भटकत होतो. जी गोष्ट घडायला हवी होती तिला अजून तरी काही अवकाश होता. त्यामुळे मी नाराज होतो. सकाळपासून तो संपूर्ण परिसर पालथा घातला होता. काही कामे झाली परंतु महत्त्वाची गोष्ट राहूनच गेलेली होती. आजच करायला हवी.&lt;br /&gt;नाही केली तर आपण कुठलेच काम करण्याच्या लायकीचे उरणार नाही, अशा टोकाच्या भूमिकेवर आलो होतो. तपोवन आता बऱ्यापैकी भरले होते. दूरवरून लोकांचे डेरे पडत होते. काही ठिकाणी मंडप, राहुट्या उभारणीचे काम सुरु होते तर काही ठिकाणी ते पूर्ण झाले होते. पूर्णत: अनोळखी माणसांनी हा भाग भरुन गेला होता. मध्येच कुठेतरी राम- कृष्णाचा उच्चार करणाऱ्या रेकॉर्डस्‌ ऐकू येत. पुढील काही दिवसांत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचे ते वातावरण होते. (नाशिकमध्ये 2 वर्षांपूर्वी तो पार पडला.) कुंभमेळ्यात सहभागी होणारे साधू काही दिवस आधीच नाशकातील तपोवनात येऊन डेरेदाखल होत होते. त्याचेच हे दृश्‍य होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला नक्की काय शोधायचे होते? तर एखाद्या साधूचा आखाडा. थेट साधूंबरोबरच राहायचे आणि त्यांची दैनंदिनी जवळून बघायची आणि त्यावर लिहायचे काम मला पार पाडायचे होते. कुंभमेळ्याच्या दृष्टीने बहुतेक गोष्टींची माहिती मी आधीच मिळविली होती. मात्र आता मी जे काही करायला जाणार होतो ते थोडे अवघड काम होते. पत्रकार म्हणून नाही तर सर्वसामान्य माणूस किंवा भक्त म्हणून मला साधूंच्या गोटात वावरावे लागणार होते. त्यासाठी माझी मूळ ओळख दडवून ठेवावी लागणार होती. त्यापोटी काही संकटे आणि त्रासांनाही सामोरे जावे लागण्याची शक्‍यता होती. तर अशा अनेक विचारांच्या तंद्रीत मी भटकत होतो. सेक्‍टर दोन-ए च्या मुख्य रस्त्यावरच बाजूला मोटरसायकल पार्क करून आतील छोट्या गल्ल्यांमध्ये असलेल्या साधूंच्या आखाड्यांतून फेरफटका मारावा असा विचार केला. मुख्य रस्ता ओलांडून उजव्या बाजूच्या नव्याने तयार केलेल्या तात्पुरत्या गल्लीत बळलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साधूंना राहूट्या उभारण्यासाठी प्रशासनातर्फे ठरावीक आकारमानाचे प्लॉट्‌स पुरविण्यात आले होते. प्रत्येक प्लॉटमध्ये 24 पाण्याचे नळ, शौचालय, बाथरुम, 24 वीजपुरवठा अशी सोय होती. तर अशा या गल्लीच्या कोपऱ्यालाच एका बड्या मंडपाचे काम सुरु होते. कुण्या बड्या साधूसाठी ती असावी. त्याच्या शेजारीच दुसऱ्या एका प्लॉटवर दोन तीन तंबू घातलेले होते. या आखाड्याचा साधू गरिब असावा बिचारा असा मनात विचार आला. त्या तंबूबाहेर एका खाटेवर एक वृद्ध आणि कृश साधू बसलेला होता. त्याच्या जोडीला आणखी एक तसाच थकलेला म्हातारा साधू बसलेला होता. कुठल्यातरी विषयांवर गप्पा चालल्या होत्या. मला कुठल्याही आखाड्यात केवळ प्रवेश हवा होता. सहजच म्हणून मी या तंबूसमोर घुटमळलो. खाटेवर बसलेल्या म्हाताऱ्या साधूच्या माझे अस्तित्व लक्षात आले असावे. त्याने मला जवळ बोलावून घेतले. मीही गेलो. औपचारिकता पाळत नमस्कार वगैरे केला -- मी येथे जवळच राहतो. दर्शनासाठी आलोय. मेळा बघतोय -- वगैरे माहिती त्याला पुरविली. त्यानेही थोड्याफार चौकशा केल्या. माझ्या मनात मात्र या माणसाला पटवून याठिकाणी प्रवेश कसा मिळवता येईल याचे विचार सुरू होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचे बोलणे सुरु असताना मध्येच पाण्याचा आवाज ऐकू येत होता. बाजूला असणाऱ्या पत्र्याच्या बाथरुममध्ये कोणी साधू आंघोळ करत असावा असे वाटले. पण बराच वेळ मोठ्याने तो आवाज येत राहिला. आवाजाने मी अस्वस्थ होत होतो. एवढे पाणी उगाचच नासल्या जातेय याची ती अस्वस्थता होती. न राहवून त्या साधूला विचारले. कुणी आंघोळ करतोय का आत? त्यावर आतील नळ खराब झालाय आणि म्हणून हे पाणी वाया जातेय असे त्याने सांगितले. नक्की काय प्रकार आहे हे मी प्रत्यक्ष बघायचे ठरविले. तेथे असे दृश्‍य दिसले बाथरुममध्ये पाण्यासाठी एक पाईपलाईन पुरविण्यात आली होती. त्या पाईपलाईनलाईनलाच दोन-दोन फूट अंतरावर सहा नळ जोडण्यात आले होते. ते नळच गळून पडले होते. आणि त्यातून पाणी वाहत होते. ते दुरुस्त करण्यासाठी बाजूलाच असलेल्या तात्पुरत्या कार्यालयातून महानगरपालिकेच्या प्लंबरना बोलवावे लागणार होते. आधीच कुंभमेळ्यातील कामांच्या दर्जाविषयी माध्यमांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यात अशा प्रकारचे कामचलावू काम बघून बातमीसाठी पुन्हा एक विषय मिळणार होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुम्ही काही तक्रार केली का याविषयी? ' मी त्या म्हाताऱ्याला विचारले. " केली होती पण कुणी आले नाही अजून', त्याचे उत्तर. त्याचे हे उत्तर ऐकून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविषयी मला प्रचंड राग आला आणि मी बघून येतो, काय ते ! असे त्याला सांगून मी बाहेर पडलो. बाहेर आल्यावर रस्त्यावर एक ओळखीचा नगरसेवक भेटला. त्याला हे सांगितले, वर या ठिकाणी बरीच पत्रकार मंडळी फिरताहेत तेव्हा लवकर काय ते करा असा हळूवार दमही दिला. " कुठल्या सेक्‍टरमध्ये येतो रे तो प्लॉट ?' बरोबर असलेल्या एकाला त्याने दरडावले. सेक्‍टरचे नांव सांगितल्यावर बाजूच्याने तिथे तर आपलेच कॉन्ट्रॅक्‍ट आहे, अशी अभावितपणे माहिती पुरविली. अच्छा म्हणजे असे उद्योग चालतात तर या राजकारण्यांचे, कुंभमेळ्याचे कंत्राट आपल्याच नावावर आणि त्यातही घोटाळा, असा विचार मनात आला. मला सोयीस्कररित्या कटविण्यासाठी मग त्या नगरसेवकाने कोणाला तरी पाठवितो असे चाचरत आश्‍वासन दिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt; पडत्या फळाचे आश्‍वासन घेऊन पुन्हा साधूच्या आखाड्यात गेलो. आता सायंकाळ झाली होती आणि तासाभरातच अंधार पडेल अशी स्थिती होती. वाट बघूनही त्या नगरसेवक कम्‌ कंत्राटदाराचा माणूस आला नाही. इकडे पाणी बरेच वाया चालले होते. शेवटी न राहवून मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो की मीच तो नळ बसविण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी मला कल्पना नव्हती की अजून काही वेळातच माझ्या आयुष्यात एक अनोखा प्रसंग घडणार होता आणि त्यानंतर पुढील काही काळ आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून जाणार होती. त्याने संमती दिली आणि मी पुढच्या दुरुस्तीच्या कामाला लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बाथरुममधून पाणी बऱ्यापैकी दाबाने बाहेर पडत होते. एक शॉवरच तयार झाला होता तेथे. अशा स्थितीत काम केले तर कपडे ओले होणार यात शंकाच नाही. शर्ट ओला होऊ नये म्हणून तो काढून टाकावा असा मी विचार केला आणि शर्ट काढून जवळच्या एका दोरीवर ठेवला. पण अनुभवी साधूने सांगितले की शर्ट काढला पण पॅंटचे काय तीही ओली होणार? इतकेच काय तर आतील कपडेही बदलावे लागणार होते. माझ्याकडे तर बदलण्यासाठी कपडे असण्याचे कारणच नव्हते. शेवटी साधूने त्याच्याकडे असलेली भगवी लुंगी मला बदली वस्त्र म्हणून दिली. माझ्या अंगावर असलेला एकूण एक कपडा काढून मी ती भगवी लुंगी परिधान केली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नळ दुरुस्त करत असताना प्रचंड भिजलो. पाण्याचा दाब माझ्या प्रयत्नांना दाद देत नव्हता. शेवटी जवळ असलेल्या लाकडी काठ्यांचा वापर करुन दोन नळ मी कायमचे बंदच केले आणि उरलेले दोन कसेबसे बसविण्यात मी एकदाचा यशस्वी झालो. साधारणपणे तासभर माझी ही खटपट चालली या काळात माझ्या नेसलेल्या लुंगीसह डोक्‍यापासून पायापर्यंत मी संपूर्ण भिजलो होतो. भगवे वस्त्र परिधान करुन थंड पाण्याचे एक बळजबरीचे स्नान कुंभमेळ्यापूर्वीच मला घडले होते. पावसाळ्याचे ते दिवस असल्याने आणि त्यात रात्रही झाल्यामुळे हवेतील गारठा वाढला होता अन्‌ मीही पुरता गारठला होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गेले तासभर मी नळ दुरुस्तीचे काम करत होतो. त्या कामात इतका बुडालो की बाजूच्या जगाचाही मला विसर पडला होता. काम पूर्ण झाल्यावर प्रथमच जाणवले की आपण भगव्या कपड्यांमध्ये आहोत. माझ्या जवळच्या सर्व गोष्टींचा या आधीच मी त्याग केलेला होता. भगव्या लुंगीचा तो प्रताप होता असे सांगण्यासारखा मी काही अंधश्रद्धाळू किंवा अतिश्रद्धाळू नाही. माझी श्रद्धा मर्यादीत आहे. पण तरीही त्यावेळी एक मजेशीर विचार मनात येऊन गेला तो म्हणजे मी साधू झालो असल्याचा. अगदी काही क्षणासाठी का होईना मी साधू झालो होतो आणि माझ्या अंगावर केवळ एक भगवी लुंगी होती. असो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझी गारठलेली अवस्था बघून, अंग पुसण्यासाठी त्या म्हाताऱ्याने एक पंचा दिला. अर्थात तोही भगवाच होता. माझ्या या छोट्याशा कामाचे त्याला फारच कौतुक वाटले. त्याने तसे बोलूनही दाखवले.  त्याच वेळी बाजारासाठी गेलेली त्या आखाड्यातील इतर काही मंडळी परत आली. त्या मंडळींबरोबरच एक वयस्कर पण भारदस्त साधू होता. त्याने पांढरे कपडे परिधान केलेले होते. तोच होता या आखाड्याचा मुख्य महंत. अजूनही मी लुंगीवरच होतो. मला बधून त्याने, ये बालक कौन है? अशी विचारणा केली.  त्यावर " ये बालक तो बहुत पराक्रमी है ', असे आधीच्या म्हाताऱ्याने उत्तर दिले अन्‌ मग मी नळ कसा दुरुस्त केला वगैरे गोष्ट सांगितली. आता या मुख्य महंतालाही माझ्याविषयी थोडी आपुलकी वाटायला लागली होती. त्याचा आवाजही तसा थोडा प्रेमळच होता. मग त्याने घाईने कोणालातरी धुनी पेटवायला सांगितली आणि मग मला म्हणाला की, "थोडा सेक लो, ठंड चली जायेगी '. भल्या मोठ्या कडुनिंबाचा ओंडका पेटवून धुनी केली होती. ? मी शेकत होतो. बरोबरच्या माणसांच्या प्रश्‍नांना उत्तरे देत होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरीकडे त्याच धुनीवर साधूचा एक भक्त चहा उकळत होता. मला चहाही देण्यात आला. बिनदुधाचा चहा होता पण चव मात्र वेगळी होती त्याची. चहाबरोबरच लिंबू, मीठ व साखर त्यात घातलेली होती. मला हुशारी आली. माझे कपडे मी पुन्हा चढविले. ज्या म्हाताऱ्या साधूने मला लुंगी नेसायला दिली होती, तो साधू या आखाड्याच्या महंताकडे पाहुणा आलेला होता. दुसऱ्या दिवशी त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला जगन्नाथ पुरीला जायचे होते. मी सोडतो तुम्हाला स्टेशनवर असे मी कबूल केले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या एका घटनेमुळे माझा आखाड्यातला प्रवेश सुकर झाला होता आणि साधूंबरोबर राहून त्यांची दैनंदिनी टिपण्याच्या मुलखावेगळ्या पत्रकारितेची संधी मला लाभणार होती. हा एकच दिवस माझ्या पत्रकारिलेला आणि वैयक्तिक आयुष्याला वळण देणारा ठरेल याची कल्पनाही मला नव्हती. पुढे मी केवळ एक नाही तर तब्बल दोन महिने त्या साधूबरोबर वावरलो. अनेकदा मी घर सोडून इथेच जेवायला आणि मुक्कामालाही राहिलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा संपूर्ण कुंभमेलाच माझ्या कायमस्वरुपी आठवणीत राहील असा होता. त्याविषयी लिहीले तर खूप विस्तार होईल. ( त्याविषयी लिहिणारच आहे मी नंतर !) पण तरीही हा कुंभमेळ्यातला पहिला दिवस माझ्या मनावर कायमचा कोरलेला आहे. कारण काही क्षणापुरता का होईना सर्व जगाला विसरुन मी साधू झालो होतो ही भावना मला उगाचच सुखावून जाते.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115747156804538282?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115747156804538282/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115747156804538282&amp;isPopup=true' title='8 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115747156804538282'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115747156804538282'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/09/blog-post.html' title='...मी साधू झालो !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115651555867295967</id><published>2006-08-25T23:17:00.000+09:00</published><updated>2006-08-25T23:34:51.266+09:00</updated><title type='text'>मातीचा गणपती !</title><content type='html'>खेडेगांवातील मुलांची कुतुहलाची आणि आकर्षणाची जी काही ठिकाणे असतात, त्यापैकी एक म्हणजे गावातल्या कुंभाराचा वाडा. त्याची कलाकुसर तासोनतास पहात राहवी अशी. मग ते दिवाळीच्या निमित्ताने फिरत्या चाकावर पणत्या तयार करणे असो किंवा उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर गाडगे, मडके तयार करणे असो. त्याच्या या कामाकडे कितीही पाहिले तरी कंटाळा येत नाही. परंतु गावातल्या आम्हा मुलांना मात्र यासर्वांबरोबरच एक विशेष आकर्षण असायचे ते म्हणजे बैल पोळा आणि गणेशोत्सव या काळातील कुंभाराचे सुबक काम.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थातच त्याच्यासारखेच आपणही मातीचे बैल किंवा गणपतीची मूर्ति तयार करावी असे फार वाटे. मग सुटीच्या दिवशी आम्ही मुले गावाजवळील शेतातली माती आणून त्याचा गोळा तयार करुन वेगवेगळे आकार तयार करण्याचा प्रयत्न करत असू! कुणाला ते जमायचेही. मला मात्र तुळशीवृंदावनापलीकडे फार काही जमत नसे. पण तरीही मातीशी खेळायची हाव काही कमी होत नसे. गणपती हा तर आमचा आवडता देव ! लहानग्यांना आपल्यातलाच वाटावा इतका तो जवळचा ! मला तर खूपच आवडायचा. अशा या लाडक्‍या देवाची मूर्ति तयार करता आली तर !&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रयत्न केला. नाही असे नाही मात्र फार काही सुबकता त्या मुर्तित नसे. शिवाय कुंभाराकडील माती "स्पेशल' फॉर्मुला वापरुन बनवलेली असे. आम्ही मात्र शेतातली काळी मातीच वापरत असू. तरीही मी आपल्या लाडक्‍या गणपतीची मुर्ति तयार करावी हे ठरवलेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर कुंभाराच्या वाड्यात जमेल तेव्हा वारंवार जाऊन त्याचे मातीकाम बघणे हा माझा छंद नेहेमीच्या उद्योगात परिवर्तीत झाला. त्यावेळेस चौथीत असेल. शाळा सुटली की बाजूलाच असलेल्या गल्लीत जायचे आणि मातीकाम बघत बसायचे. आणि चौकशाही करायच्या. अर्थात तोही काही विशेष बोलत नसे. एक दिवस मात्र गणपती कसा तयार करतात, त्याची जादूची कांडी मिळाली. ही प्रक्रिया आपण विचार करतो त्यापेक्षा फारच सोपी आहे असे त्यावेळेस वाटले. त्याचं असं झालं की त्या दिवशी सहजच म्हणून मी कुंभारबुवांच्या घरी चक्कर मारली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साधारण 14 ते 15 वर्षे वयाचा त्याचा मुलगा घरी होता. त्याने मला गणपती कसे तयार करतात? याचे रहस्य सांगितले. आणि ते रहस्य म्हणजे- मातीचा साचा. मातीचा साचा वापरून गणपती आणि वेगवेगळी मातीची चित्रे तयार करता येतात याचे ब्रम्हज्ञान मला झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीच्या मी शोधात होतो तो दिवस एकदाचा आला म्हणजे. तसा मी खूप नसलो तरी बऱ्यापैकी हुशार होतो. म्हणजे साचा मिळविण्यासाठी त्या अडाणी मुलाला गुंडाळण्याइतका तरी. शेवटी काही झाले तरी चौथीतले मुलं तशी सुशिक्षितच असतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो. तो बाजाराचा दिवस होता. माझे आईवडील जवळच्याच गावाला बाजारसाठी गेले होतो. संध्याकाळी पाचपर्यंत तरी ते परतण्याची शक्‍यता नव्हती. घरी मी आणि माझी धाकटी बहीण दोघेच. म्हणजे जर या मुलाकडून साचा घेतला, चटकन जवळच्याच शेतातून माती आणून तिचा गोळा केला तर साच्यातून भराभर 25 ते 30 मुर्ति तयार होतील असा मी विचार केला.( आणीबाणीच्या काळात माझं डोकं तसं फार वेगाने धावतं. लहानपणची सवय!) कुंभाराच्या घरी तो मुलगा एकटाच होता. त्यावेळेस साडेअकरा-बारा वाजले असतील. मी त्याला काही काळापुरता तो साचा देण्याविषयी गळ घातली. तो काही तयार होईना. कारण सरळ होतं. तो साचा मातीचा होता आणि त्याचे आई-वडीलही घरी नव्हते. मी जर फोडला तर? . परंतु कांही केल्या हा साचा घरी न्यायचाच या इरेला मी पेटलो होतो. माझ्या डोळ्यांसमोर मी स्वत: तयार केलेल्या गणेशाच्या मुर्तिंचे निर्माणकार्य दिसत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यावेळेस मला चटकन एक कल्पना सुचली. मला खाऊला म्हणून माझ्या वडीलांनी एक रुपया दिला होता. तो मी काही खर्च केला नव्हता. मग हाच रुपया या मुलाला साच्याचे भाडे म्हणून दिला तर? वस्तू भाड्याने देता- घेता येतात या गोष्टी मला मोठ्यांकडून माहिती झालेल्या होत्या. पण माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या त्या साध्याभोळ्या मुलाला कुठलं माहित असणार? तरीही मी प्रयत्न करायचा ठरवला. एक रुपयात दुपारी चार पर्यंत तुझा साचा देशील का? मी फोडणार नाही आणि परत आणून देईन असे त्याला सांगितले. मी एक प्रामाणिक आणि सज्जन छोटा मुलगा असल्याचेही त्याला पटवून दिले. बऱ्याच वेळाने आढेवेढे घेत का होईना तो तयार झाला. झालं मला आकाश ठेंगणं झालं. माझ्याकडे असलेला एकुलता एक रुपया देऊन त्याच्याकडून तो साचा ताब्यात घेतला. आणि उड्या मारतच घरी आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता लवकरच पावले उचलायला हवी होती कारण वेळ फार कमी होता. बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. सर्वप्रथम गल्लीत असलेल्या सर्व मुलांना तुम्हाला लवकरच एक-एक मुर्ति देतो असे आश्‍वासन देऊन टाकले. घरी लहान्या बहीणीने कुतुहलाने तो साचा बघीतला. परंतु मी पुढे घराच्या ओट्यावर खूप सारा चिखल ( तब्बल पोतंभर) आणि घरभर मूर्ति तयार करणार असे तिला सांगितल्यावर मग मुळच्या स्वभावाने तिने आई-दादांना येऊ देत? अशी धमकी दिली. शेवटी सर्व पसारा मी आवरुन व नंतर तिला चक्क एक रंगवलेली ( माझ्या शाळेसाठी असलेल्या रंगपेटीचा वापर करुन) गणेशमुर्ति आणि वरती एक तुळशी वृंदावन देण्याचे ठरले. एवढे सर्व मिळणार म्हणून मग तीही गप्प राहिली. चला एक मोठा प्रश्‍न मिटला होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग थोडी घाई करुन दुसऱ्या एका गल्लीत राहणाऱ्या नानाला मी बोलावून घेतले. तो आणि मी जवळच एका शेतात जाऊन भल्या चांगली पिशवीभर काळी माती आणली. शाळेच्या दप्तराचीच होती ती पिशवी. आई ओरडू नये म्हणून मी ती नंतर गुपचूप धूणार होतोच. झाले माती आली. तोपर्यंत दीड वाजला होता. मग भराभर सर्व माती ओतून आम्ही चिखल तयार करण्याच्या कामाला लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आम्ही म्हणजे मी एकटा हात भरवत होतो आणि बाकीचे गंमत बघत होते. पण मध्येच नाना की कोणीतरी शंका काढली की कुंभार जी माती वापरतो त्यात घोड्याची लीद वगैरे वापरतात. तरच ती चांगली होते. आता ऐनवेळी घोडा कुठून आणायचा हा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा समोरच गोठ्यात बांधलेल्या गाईचे शेण वापरून बघू असा एक पर्यायी विचार माझ्या मनात आला. मी तो लगेच अमलात आणला. थोड्याच वेळात गोळा तयार होता. मला मूर्ति तयार करायची खूपच घाई झालेली होती. दरम्यान आमच्या घरासमोरील ओट्यावर एका बाजूला शेण, एका बाजूला माती, एका बाजूला सर्वच चिखल असे दृश्‍य तयार झाले होते. मी घाईने त्या साच्यात मातीचा गोळा भरला आता लगेच मुर्ति तयार होणार होती. मग मी साचा जमिनीवर पालथा केला व मूर्ति बाहेर येण्यासाठी प्रयत्न केला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण काही केल्या तो मुर्ति बाहेर येईना. काय करावे. काही कळेना खूप प्रयत्न केला पण मूर्ति काही बाहेर पडत नव्हती. मातीचा गोळा त्या साच्याला घट्ट चिकटून बसला होता. त्यामुळे क्षणातच पुढचे भविष्य माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले आणि माझ्या पोटात भीतीने गोळा आला. त्या कालावधीत पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येऊन तेथे जमलेले बालमित्रमंडळ हळूच गायब झाले. आई येऊ दे मग सांगतेच ! अशी धमकी देऊन बहिणही घरात गेली आणि अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसली. शेवटी उरलो आम्ही दोघेच मी आणि माझा तयार न झालेला साच्यातला गणपती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी फार जड मनाने मी तो साचा त्यातील मातीसह त्या मुलाकडे घेऊन गेला. त्याचा साचा सुस्थितीत असला तरी त्याने तो खराब झाला असे सांगितले व ठेवून घेतला. त्या साच्यात घालण्यासाठी फक्त कुंभाराकडचीच माती चालते असेही सांगितले. मी मात्र फारच हिरमुसलो. घरी येऊन पटापट सर्व माती, चिखल वगैरे आवरुन पुन्हा सर्व काही चकाचक करुन ठेवले. दिवसभर यातायात करुन गणपती मिळाला नाहीच पण बऱ्याच दिवसांनी मिळालेला रुपयाही गमवावा लागल्याचे दुहेरी दु:ख मला झाले होते. अर्थात मुर्ति तयार न होण्याचे रहस्य असे होते की, त्या साच्यात मी खूप घटट मातीचा गोळा अतिशय दाबून घातला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साच्यात माती घालण्याआधी साच्याला आतून पाणी लावायला पाहिजे होते म्हणजे मुर्ति न चिकटता चटकन बाहेर पडली असती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे मला मागावून कळाले. त्यावयात इतके व्यवहारज्ञान मात्र माझ्याकडे नव्हते. पण आजही त्या घटनेचा विचार करताना मला फार वाईट वाटते. वाटते आज नाशिक-पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान मुलांसाठी गणपतीच्या मुर्ति तयार करण्याची खास शिबिरे होतात. आपल्या वेळी तशी असती तर...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115651555867295967?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115651555867295967/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115651555867295967&amp;isPopup=true' title='5 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115651555867295967'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115651555867295967'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/08/blog-post_25.html' title='मातीचा गणपती !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115599481389027306</id><published>2006-08-19T22:39:00.000+09:00</published><updated>2006-08-19T22:40:13.903+09:00</updated><title type='text'>It's me</title><content type='html'>&lt;embed style="width:400px; height:326px;" id="VideoPlayback" align="middle" type="application/x-shockwave-flash" src="http://video.google.com/googleplayer.swf?docId=583558415077147477&amp;hl=en" quality="best" bgcolor="#ffffff" scale="noScale" salign="TL"  FlashVars="playerMode=embedded"&gt; &lt;/embed&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115599481389027306?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115599481389027306/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115599481389027306&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115599481389027306'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115599481389027306'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/08/its-me.html' title='It&apos;s me'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115461308946556417</id><published>2006-08-03T22:47:00.000+09:00</published><updated>2006-08-03T22:51:29.486+09:00</updated><title type='text'>शाळेतल्या दिवसातली पाववड्याची पार्टी !</title><content type='html'>बेसनात पाव बुडवून तळतात तो पाववडा. पुण्यात याला पाव पॅटीस म्हणतात. आम्ही राहायचो त्या गावात एका माणसाने नुकतीच पाववड्याची गाडी टाकली. दिवसेंदिवस त्याला गावातून प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला. कधी-मधी पैसे जमले तर आम्ही मुलेही त्या ठिकाणी जात असू. खाताखाता पाववडेवाला कसे वडे तयार करतो याचे बारकाईने निरीक्षण करत असू. परंतु असे प्रसंग फारच कमी यायचे. आमच्या बऱ्याच मित्रांची घरची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. माझ्यासह एक दोन जणांशी स्थिती त्यातलेत्यात बरी असली तरी घरून खाऊसाठी वगैरे पैसे मिळण्याची सुतराम शक्‍यता नव्हती. पाववड्यांचा विषय मात्र आमच्या मनात बऱ्यापैकी घर करून राहिला होता. अखेर सर्वजण एकत्र आलो. बालमित्रमंडळाची बसस्टॅंडवर असलेल्या शनीच्या पारावर एक इमर्जन्सी मिटींग बोलावली. अर्थातच विषय होता पाववड्याची पार्टी !&lt;br /&gt;&lt;br /&gt;बैठकीला नाना, पुंज्या( पुंजाराम), भीवशा (भीवसन), बाळ्या ( बाळू), चंद्या ( चंदू) म्हशा ( म्हसू), गौत्या (गौतम), गंग्या ( गंगाधर), सुन्या ( सुनिल) आणि मी अशी सर्व मित्रमंडळी हजर होतो. शेवटी बऱ्याच दीर्घ चर्चेनंतर असे ठरले की पाववड्याची पार्टी करायची आणि त्यासाठी प्रत्येकाने वर्गणी म्हणून पाच रुपये जमवायचे. अर्थात पाच रुपये म्हणजे खूपच होते. मलाही घरून मिळाले नसते. पण प्रयत्न तर करायला हवा होता. उरलेली सर्व मुले सुटीत आईवडीलांबरोबर मजुरीची कामे करून पैसे जमविणार होती. त्यावेळी आम्ही सर्वजण 12 ते 13 या वयोगटात होतो. अखेर एकदाचे पैसे जमा झाले. आणि दिवसही ठरला, रविवार. रविवारी सर्वांनी पार्टीसाठी एकत्र जमायचे असे ठरले. जमलेल्या पैशातून काही वस्तू विकत आणाव्या लागणार होत्या. त्या विकत आणल्या. गोडेतेल, बेसन, अशा गोष्टी आणल्या. मीठ, मिरच्या, कांदे, बटाटे वगैरे वस्तू घरुनच आणायच्या ठरल्या. जवळ असलेल्या तालुक्‍याच्या गावाहून बाळ्याने दोन तीन पावाच्या लादी आणल्या. माझ्याकडे वडे तळण्यासाठी लागणाऱ्या कढई आणण्याची जबाबदारी होती.पाव वड्याची पार्टी म्हणजे पाव हा महत्त्वाचा घटक. बाळ्याने पाव आणले की नाही हे बघण्यासाठी शनिवारी सायंकाळी मी आणि चंद्या बाळ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष खात्री करून आलो. अर्थात परत येताना त्याने आणलेल्या पावांपैकी एकेक पाव खाऊनच परत आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी सर्व साहित्य घेऊन एस.टी. स्टॅडवर असलेल्या शनिमंदिरासमोर आम्ही सर्व एकत्र जमलो. दोघा-तीघांनी सायकलीही आणलेल्या होत्या. सर्व एकत्र आल्यानंतर अचानकपणे एक वेगळाच प्रश्‍न निर्माण झाला. तो म्हणजे जागेचा. दोन आठवड्यापासून आम्ही जी काही बारकाईने तयारी करत होतो, त्यात पार्टी कोठे करायची हा विचारच केलेला नव्हता. आणि म्हणूनच ऐनवेळेस हा प्र?न्‌ निर्माण झाला. वेळेवर एक दोन जणांच्या घरी (जिथे त्या वेळेस कुणीही असणार नव्हते) पार्टी करायची असे ठरले परंतु नंतर हे पर्याय सार्वमताने बाद करण्यात आले. शेवटी नदीच्या दिशेला चार पाच किलोमिटर अंतरावर एक गाव आहे. त्या दिशेने चालत रहायचे आणि जागा मिळेल त्या ठिकाणी तीन दगडांची चूल मांडायची असा निर्णय ठरला. त्यानुसार आम्ही कूच केले. एखाद्या मोहिमेवर चाललो आहोत असा आविर्भाव प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt; पुढे काही सांगण्याआधी या गावाची भौगोलिक स्थिती सांगणे उचित ठरेल. बारामहिने दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावर हे छोटेसे गाव वसलेले होते. संथ वाहणाऱ्या गोदावरीला या भागात प्रचंड पाणी असे आणि यापूर्वी या पाण्यात अनेकजणांना प्राण गमवावे लागले होते. नदीच्या परिसरातील शेतीला गाळपेऱ्याची शेती संबोधले जाते. ही जमीन सुपिक असते आणि कमी पाण्यावर याठिकाणी पिके घेतली जातात. अशा या गाळपेऱ्याच्या शेतातूनच आम्ही चालत असलेली गाडीवाट जात होती. ज्या गावाकडे ही वाट जाई तिथे गेल्यावर होडीन नदी ओलांडून जावे लागत असे. ( आता त्या ठिकाणी पूल झाला आहे.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर आम्ही चालत राहिलो. साधारण दीड किलोमीटर अंतरावर आम्हाला हवी असलेली जागा सापडली. नदीच्या मुख्य प्रवाहाला जोडून एक लांबलचक घळी तयार झालेली होती आणि ती थेट रस्त्यापर्यंत येऊन मिळालेली होती. तिच्यात पाणीही होते. त्याच घळईच्या बाजूला असलेल्या खोलगट भागात हिरवळीवर आम्ही आमचा डेरा टाकला. मंडळी कामाला लागली. कोणी चूलीसाठी दगड शोधून आणले. कुणी जळणासाठी वाळलेले गवत, कागद, काड्या वगैरे जमा केल्या. आता बऱ्यापैकी तयारी झाली होती. मुख्य काम सुरू करायला काही अडचण नव्हती. आम्ही आमच्या जवळचे साहित्य बाहेर काढले. गोडेतेलाची किटली, एक कढई, एक पातेले, पावाच्या लाद्या, बेसनपीठ, मीठ,मिरच्या, बटाटे अशा सर्व गोष्टी त्यात होत्या. पण पीठ भिजविण्यासाठी पाणी, तळण करण्यासाठीचा झाऱ्या आणि मुख्य म्हणजे चूल पेटविण्यासाठी काडेपटी या गोष्टीच नव्हत्या. काय करावे ? हा प्रश्‍न पुन्हा आ वासून उभा राहीला. सुदैवाने भीवसन आणि बाळू यांनी सायकली आणलेल्या होत्या. त्यांनी गावात जाऊन आपापल्या घरून (अर्थात घरच्यांच्या नकळत) पाणी भरण्यासाठी बादली, काडेपेटी, तळणाचा झाऱ्या घेऊन यावे असे ठरले. त्याप्रमाणे त्यांना सर्वांनी गावात पिटाळले. ते येईपर्यंत वाट बघणे आवश्‍यक होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;इकडे उन वाढायला लागलेले होते. मग उरलेल्यानी तेथील जागा साफ करणे वगैरे कामाला सुरवात केली. परिसराची पाहणी करणे अणि फेरफटका मारणे या गोष्टीही काहींनी केल्या. नानाने मात्र चुलीचा ताबा घेऊन, जो सापडेल त्याच्याकडून पुढील व्यवस्था करण्यास सुरुवात केली. आहे ते सामान सोडून घेण्याचे काम मी केले तर कुणीतरी बटाटे चिरून ठेवले. साधारणत: अर्धा पाऊण तासाने गावाकडे पीटाळलेले दोघे धापा टाकत परत आले. त्यांना पाण्यासाठी बादली काही मिळालेली नव्हती पण एक मोठे पातेले त्यांनी बरोबर आणलेले होते. झाऱ्या ही मिळाला नाही एक चमचा होता. आता त्यावरच काम भागवावे लागणार होते. मग सर्व मुले कामाला लागली. नानाने चुलीचा ताबा घट्ट ठेवला होता, त्यामुळे पाववडे बहुदा तोच तळणार हे स्पष्ट होते. मग दोघे -तीघे जवळच्या नदीवर गेलो आणि त्या मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन आलो. तोपर्यंत नानाने एक दोन जणांच्या मदतीने चुल पेटवून सज्ज ठेवली होती पाणी आल्याबरोबर त्याने पीठ भिजवले आणि कढईवर तेल तापत ठेवले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या प्रसंगाची गेल्या काही दिवसांपासून आम्ही वाट पहात होतो. तो प्रसंग साक्षात आता घडणार होता. भरपेट पाववड्याचा आस्वाद घेण्याचा. पाव बेसनात बुडवून नाना, पुंज्या आणि सुन्या यांनी पाववडे तयार केले. सर्वांना पुरून उरतील एवढे झाले होते. पाववडा तयार होत असताना प्रत्येकाला तो कधी खातो अन्‌ कधी नाही असे वाटत होते. परंतु सर्व पाववडे तयार झाल्यानंतरच खायचे ठरलेले असल्याने तोपर्यंत लाळ गिळत शांत रहाणे भाग होते. पाववडे तयार केल्यानंतर बटाट्याची भजीही तळण्यात आली. तोंडी लावण्यासाठी मिरच्या तळून त्यांना मीठ लावले. तरीही पातेल्यात पीठ उरलेच. कढईतही भरपूर तेल होते. त्यातील काही पुन्हा किटलीत काढून ठेवले. उरलेल्या पीठाबद्दल नानाला पुन्हा झकास कल्पना सुचली त्याने उरलेले पीठ, बटाटे वगैरे पदार्थ कढईतल्या तेलात टाकले. वरून बऱ्यापैकी मिरची पावडर, मीठ वगैरे गोष्टी टाकल्या. त्यातून एक नवाच पदार्थ तयार झाला. मिरच्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी त्याचा उपयोग केला. अर्थात तयार पाववडे एकत्र करण्यासाठी ताट वगैरे गोष्टी नव्हत्याच मुळी. मग मी आणलेल्या नायलॉनच्या पिशवीवरच ते पाववडे ठेवण्यात आले होते. ( त्यामुळे त्या पिशवीला छिद्र पडले. ते बघून जिची ती पिशवी होती त्या माझ्या लहान बहिणीने प्रचंड भोकाड पसरले आणि मग आईच बोलणे मला खावे लागले ही गोष्ट अलहिदा!) अशा या तयार पाववड्यांचा आम्ही रसभरीत आस्वाद घेतला. त्यातील काही उरले ते दोन तीन जणांनी त्यांच्या लहान भावंडांसाठी घरी नेण्याचे ठरले. दुपारपर्यंत आमची ही पार्टी चालली. त्यानंतर भांडी वगैरे घासून, सर्व आवरासावर करून दुपार कलत असताना आम्ही सर्वजण तृप्त मनाने आणि भरल्या पोटाने गावाकडे परतलो. अनेक अडचणींना तोंड देऊन आमची पाववड्याची पार्टी सफल झाली होती. आणि एक रविवार कारणी लागला होता. पुढे शाळेतील मित्रांसाठी अनेकदिवस तो चर्चेचा विषय होता. वर्गातील आमच्या विरोधी गटातील मुलांचा मात्र या गोष्टीमुळे चांगलाच जळफळाट झाल्याचे आमचे सर्वांचे मत होते.&lt;br /&gt;&lt;div align="center"&gt;*******************************&lt;/div&gt;&lt;br /&gt;या घटनेला साधारणपणे सहा-सात महिने उलटून गेले होते. आम्ही ते गाव सोडून नव्या गावात दाखल झालो होतो. या नव्या गावातील एक शिक्षक यापूर्वीच्या गावात काही दिवस माझ्या वडीलांच्या जागी बदलीवर होते. त्या वेळेस त्यांनाही आमच्या पाववडा पार्टीची बातमी समजली होती आणि पार्टी करणाऱ्या छोट्या टोळीचा मुख्य हस्तक मी होतो हे ही समजले होते. आम्ही ज्या गावात होतो तेथील शाळेत हे शिक्षक महोदय पुन्हा मूळ जागेवर बदलून आले. एके दिवशी आमच्या वर्गावर असताना त्यांनी नाव घेऊन मला बोलावून घेतले आणि विचारले, " काय रे (अमूक गावी ) तुम्ही सर्वांनी स्मशानाच्या जागेवरच पाववड्याची पार्टी केली होती म्हणे ' माझ्या दृष्टीने तो एक धक्काच होता. आपण असं काही केलेलं नाही या बद्दल आणि आमच्या सतत विरोधी असलेल्या गटातील पोरांचे हे कारस्थान असल्याबद्दल मी ठाम होतो. तरीसुद्धा आजही त्या जागेबद्दल मला थोडीशी का होईना शंका आहेच. पण त्यापेक्षाही पाववड्याच्या पार्टीची आठवण आजही मनात चांगल्या अर्थाने घर करून आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115461308946556417?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115461308946556417/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115461308946556417&amp;isPopup=true' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115461308946556417'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115461308946556417'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/08/blog-post.html' title='शाळेतल्या दिवसातली पाववड्याची पार्टी !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115337805271675164</id><published>2006-07-20T15:47:00.000+09:00</published><updated>2006-07-20T15:47:32.726+09:00</updated><title type='text'>test</title><content type='html'>test&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115337805271675164?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115337805271675164/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115337805271675164&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115337805271675164'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115337805271675164'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/07/test.html' title='test'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115287797965530590</id><published>2006-07-14T20:51:00.000+09:00</published><updated>2006-07-14T20:52:59.666+09:00</updated><title type='text'>किस्से दैनिकातले! भाग - 2</title><content type='html'>&lt;p&gt;साधारणपणे 91-92 सालची घटना आहे. त्यावेळी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती होती. पाण्यासाठी फार वणवण करावी लागत असे. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने विविध कामे सुरू केली होती. त्यातच विंधन विहीरी(बोअरवेल्स) तयार करण्याच्या कामाचाही समावेश होता. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक ठिकाणी बोअरवेल्स घेण्याचे काम सुरू होते. नाशिक शहरात असलेल्या मध्यवर्ती बस स्थानक परिसतातही अशीच एक विंधन विहीर घेण्यात आली. त्याचीच ही गंमत.&lt;/p&gt;&lt;p&gt;तर सांगायची गोष्ट अशी की एकदाचे त्या जागेवर बोअरींग करण्याचे ठरले आणि संबंधित यंत्रणा कामाला लागली. प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर मात्र विशेष आश्‍चर्याची घटना घडली. केवळ 7 ते 8 फूटांवरच पाणी लागले, अन्‌ तेही मोठ्या दाबाने. एवढया दुष्काळात जमिनीत कमी खोलीवर पाणी लागणे, ही नवलाचीच गोष्ट होती. मग हा आनंद संबंधित यंत्रणेतर्फे सादर करण्यात आला व बोअरिंगचे काम त्या ठिकाणीच थांबवून ही यंत्रणा परतली. &lt;/p&gt;&lt;p&gt;ज्या जागेवर बोअरिंग घेतले होते, तेथे एक हॅंडपंप बसविण्यात आला. या हॅंडपंपला खूपच पाणी असायचे. अर्थात त्यातही एक गोम आढळली आणि ही बाब तर फारच विलक्षण होती. या हॅंडपंपला सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास पाणी असायचे नंतर मात्र ते गायब व्हायचे. हा काय वेगळा प्रकार म्हणून मग या गोष्टीचा पूर्णपणे शोध घेण्याचे ठरले. &lt;/p&gt;&lt;p&gt;तपासाअंती जे सत्य बाहेर आले ते फारच विनोदी आणि धक्कादायक होते. तर घडले असे होते, की ज्या जागेवर कमी खोलीवरच पाणी लागले ती जागा दुसरे-तिसरे काही नसून चक्क &lt;strong&gt;मुन्सिपाल्टीची भूमिगत जलवाहिनी होती आणि घाई गडबडीत या जलवाहिनीलाच बोअर केले होते&lt;/strong&gt;. म्हणून अशा पद्धतीने विलक्षण घटना घडू शकली.&lt;/p&gt;&lt;p&gt;अर्थात याचा आणि दैनिकाचा काय संबंध? म्हणजे काय हीच तर त्या दिवशीची पहिल्या पानावरची बातमी होती. लोकांनी आवर्जून वाचली असेल यात शंकाच नाही. आणि ज्यांनी ही बातमी घडवली? त्यांचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला असेल. अर्थात मी मात्र तेव्हा हायस्कूलातला विद्यार्थी होतो. लक्षात राहिला आणि दैनिकाशी संबंधित म्हणून हा किस्सा सांगितला. &lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115287797965530590?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115287797965530590/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115287797965530590&amp;isPopup=true' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115287797965530590'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115287797965530590'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/07/2.html' title='किस्से दैनिकातले! भाग - 2'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115227812520944827</id><published>2006-07-07T22:14:00.000+09:00</published><updated>2006-07-07T22:15:25.220+09:00</updated><title type='text'>किस्से दैनिकांतले!</title><content type='html'>दैनिकांत काम करत असताना घाई गडबडीत कोणते गोंधळ होतात आणि त्यातून कोणच्या गंमती होतात त्याचाच हा एक नमूना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी प्रत्यक्ष अनुभवलेला.त्या शहरात आप्पा रणखांबे ( नांव बदलले) नावाचे एक वयोवृद्ध सर्पमित्र राहतात. त्यांचे वय 78 च्या आसपास असेल. अशाही परिस्थितीत शहराच्या कुठल्याही भागात, कुणाकडे सर्प, नाग वगैरे प्राण्यांनी हजेरी लावली की ते हक्काने अप्पांना फोन करतात आणि आप्पा स्व:खर्चाने तेथे जाऊन सर्पांना पकडतात. त्यामुळे तो सर्प व ज्याच्या घरात सर्प निघातो तो, असे दोघांनाही दिलासा मिळतो. अप्पांविषयी सर्व शहराबद्दल आदर आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी अप्पा असेच एका ठिकाणी साप पकडण्यासाठी गेले. भला विषारी नाग होता तो. चावला आप्पांना. त्यांना शहरातीलच मोठ्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्‍टरांनी 48 तासांची मुदत दिली. समाजसेवा अप्पांच्या जीवावर बेतली. त्या दिवशी शहरातील सर्व दैनिकांनी त्याची दखल घेतली आणि आप्पांच्या बातमीला पहिल्या पानावर स्थान मिळाले. बातमी अशी होती- विख्यात सर्पमित्र अप्पा रणखांबे सर्पदंशाने अत्यवस्थ.' मी ज्या दैनिकात काम करत होतो त्या दैनिकातही ही बातमी 1ल्या पानावर प्रसिद्‌ध झाली होती.बातमी छापून आली त्याच दिवशी सायंकाळची गोष्ट. तशी मजेशीरच. अप्पांच्या तब्येतीची हालहवाल विचारून त्यासंबंधीची आणखी बातमी आपल्या दैनिकात दयावी म्हणून आमच्या एका स्मार्ट वार्ताहराने सायंकाळी रुग्णालयात फोन केला. दैनिकांत वेळा फार पाळाव्या लागतात. ठराविक बातमी ठराविक वेळेला द्यावीच लागते. त्यामुळे सायंकाळी येथे फारच घाईगर्दी आणि धावपळ असे दृश्‍य असते. आमचा हा वार्ताहर थेट दुसऱ्या दिवशीचे पान तयार करण्यासाठीच बसला होता आणि त्या जागेवरूनच त्याने रुग्णालयात फोन केला. "हॅलो, मी अमूक वार्ताहर बोलतोय, मला जरा अप्पांच्या तब्येतीबद्दल बोलायचेय. जरा त्यांच्या जवळच्या कुणाला बोलवता का? तिकडून उत्तर आले " अहो, आप्पा आत्ताच गेलेत'. अप्पा गेलेत असे म्हटल्याबरोबर या वार्ताहराने तसाच फोन ठेवून दिला आणि मोठ्या घाईने ती बातमी ऑफीसमध्ये सर्वांना सांगितली. अरेरे ! वाईट झाले, आमच्या प्रतिक्रिया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरे तो तर पान तयार करण्यासाठीच बसला होता. घाईतच त्याने संबंधीत डी.टी. पी. ऑपरेटरला हूकूम सोडला. हे बघ कालची जी बातमी होती ना ती तशीच ठेव. त्यात फक्त हेडिंग बदलून घे- आप्पा रणखांबे यांचे निधन- अशा पद्धतीने. मथळ्यात आप्पा अत्यवस्थ ऐवजी आप्पा निवर्तले असा बदल कर आणि जशीच्या तशी बातमी सोड. झाले ऑपरेटरनेही तसेच केले. अर्थात तोपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते आणि पानाची अंतिम वेळ 12 पर्यंतची होती. दरम्यानच्या काळात अधिक माहितीसाठी तो वार्ताहर कामाला लागला. आता या विषयी कोणत्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या याचाह? त्याने विचार करून तसे वृत्तसंपादकाला सांगितले. आम्ही सर्व मात्र हळहळत होतो की एक चांगला माणूस गेला म्हणून.दैनिकांत कोणतीही बातमी दोन्ही बाजूने आणि पूर्णपणे तपासून मगच प्रसिद्‌धीसाठी पानात सोडायची असते. त्या संकेताला अनुसरून वृत्तसंपादक महोदयांनी संबंधीत रुग्णालयात पुन्हा फोन केला, " काहो अप्पा गेले का?' हो इतक्‍यातच घरी गेले. तब्येत ठिक झाल्यामुळे त्यांना " डिस्चार्ज' दिला.' आणि खरी परिस्थिती वृत्तसंपादकाच्या ध्यानी आली. त्यांनी सर्वांना सांगितली. सर्वांसमोर मात्र एकच प्रश्‍न होता हसावे की रडावे. अप्पा रणखांबे त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा आपल्या समाजसेवेच्या कामाला लागले. इश्‍वर त्यांना उदंड आयुष्य देवो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115227812520944827?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115227812520944827/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115227812520944827&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115227812520944827'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115227812520944827'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/07/blog-post_115227812520944827.html' title='किस्से दैनिकांतले!'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115227613530997946</id><published>2006-07-07T21:38:00.000+09:00</published><updated>2006-07-07T21:42:15.316+09:00</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;a href="http://photos1.blogger.com/blogger/606/3206/1600/pandurang.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://photos1.blogger.com/blogger/606/3206/400/pandurang.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115227613530997946?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115227613530997946/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115227613530997946&amp;isPopup=true' title='0 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115227613530997946'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115227613530997946'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/07/blog-post_07.html' title=''/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115192659162634230</id><published>2006-07-03T20:31:00.000+09:00</published><updated>2006-07-03T20:36:31.640+09:00</updated><title type='text'>मृत्यांऽगण !</title><content type='html'>बहुदा सकाळ झाली असावी ! बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांच्या चिवचिवाटावरून ओळखले मी ! आज तशी उठण्याची इच्छाच झाली नाही. सर्व अंग थंड आणि जड पडल्यासारखे वाटतेय. तसा अलीकडे पडूनच असतो. तब्येत ठिक नसते माझी. घरातल्या घरात सुद्धा काही हालचाल करता येत नाही. सर्व गोष्टी एकाच जागेवरुन कराव्या लागतात. कारण आता वय झालंय ना माझं ! तसा दिवसभर या खोलीत एकटाच असतो मी ऽऽ ! नाही म्हणजे ैअधनं-मधनं मुलगे, सुना किंवा नातवंडे यांच्यापैकी कोणीतरी येतो आणि चौकशी करून जातो. चौकशी मात्र लांबूनच करतात हां ! न जाणे या म्हाताऱ्याचा आजार त्यांना लागला तर? तसा अगदी जवळून चौकशी करायला फक्त एकच जण येतो. तो म्हणजे रोज येणारा डॉक्‍टर. दिवसातनं दोनदा येतो आणि " कश्‍ये आहाऽत आजोबा, बरे व्हाल हां लवकर ' असे म्हणून इंजेक्‍शन टोचून जातो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अरे हे काय? आज सकाळ झाली तरी कोणीच कसे उठवायला आले नाही अजून ! एरवी या वेळेस धाकटा आप्पा किंवा मोठा नाना यापैकी कुणीतरी येतातच. आज कसे नाही आले कुणी? आणि डोळेही आज उघडत नाहीत कसे ते? हातपायही हालवता येत नाहीत. आज डॉक्‍टरला सांगायला हवं हे सगळं आणि हे काय मग हा गोंधळ कसला ऐकू येतोय. दुरून कुणीतरी रडत असल्यासारखा. म्हातारपणात काय काय सहन करावं लागतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तसा मी एकटाच म्हटले तरी चालेल आता. आता मी ज्या अंधाऱ्या खोलीत निजलो आहे, तीही तशी माझ्यासारखीच एकाकी. खरं तर ही आमच्या आजोबांची हवेली ! आजपासून बरोबर 82 वर्षांपूर्वी मी ज्या खोलीत सध्या निजलो आहे त्याच ठिकाणी माझी आई बाळंत झाली... आणि माझा जन्म झाला. बालपण तसे आरामातच गेले माझे. पण मी लाडावलो नाही. तरुणपणातच स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. आई-वडिल, आजोबा-आजी, बहिण-भावंड सर्वांचा प्रेमाने सांभाळ केला. पूर्वजांच्या हवेलीसमोरच त्याही पेक्षा मोठी अशी नवी हवेली बांधली. माझ्या कर्तृत्वाने आई-बाप धन्य झाले. पण आता या माझ्या उतराई पोरांना त्याचे आहे का काही? आजारी पडल्यानंतर बापाची अडगळ वाटते म्हणून एकट्यालाच इथे आणून टाकलेय मला. अरेऽऽऽ ! तुम्ही जेव्हा लहान होता आणि थोडा जरी आजारी पडायचात ना तेव्हा तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपायचो मी आणि तुमची आई तुम्हाला. तुमच्या लहानशा तापासाठीही रात्र-रात्र जागून काढायचो आम्ही !... अन्‌ आता मात्र...! नालायक निघालात रे पोरांनोऽऽऽ!&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुरून येणारा आवाज वाढलाय बहुतेक. अगदी माझ्या खोलीत असल्यासारखा येतोय. पण तरीही क्षीण वाटतोय. आणि हे काय कुणीतरी अगदी माझ्या जवळ बसल्यासारखे वाटतेय. आणि रडतच असावेत. अरे, अरेऽऽ! नका रे गलका करु ! या म्हाताऱ्याला स्वस्थ पडू तरी द्या रेऽ! या वयात शांतता म्हणून मिळत नाही आजकाल ! म्हाताऱ्याचा द्वेषच करतात सगळी.... आज मला उठता का येत नाहीये? डोळेही उघडत नाहीत ती ! छातीतही फार शांत आणि थंड वाटतेय आता ! कालच्या रात्री सारखं नाही. कालची रात्र आजही आठवते मला. काल हातापायाला पेटके यायचे. छातीत गलबलून येत होतं म्हणून धाकट्याला ठेवून घेतलं सोबतीला. उत्तर रात्री फारच त्रास झाला. धाप लागली. श्‍वास जवळजवळ थांबलाच. छातीचे ठोके वाढले. पोटात कसेसेच होऊ लागले आणि जीव घाबरा झाला. आप्पा, अरे आप्पा, मी ओरडलो. थोड्याच वेळात सगळे धावून आले. डॉक्‍टरही आला असावा बहुतेक ! कारण मोठी सुनबाई म्हणत होती ; "" डॉक्‍टर देऊन टाका न "ते' इंजेक्‍शन त्यांना बघा ना किती त्रास होतोय... या इंजेक्‍शनमुळे त्यांची सुटका तरी होईल या त्रासातून ''. धाकट्या आप्पाने बहुदा विरोध केला असावा. तो म्हणत होता, " पण मी ते इंजेक्‍शन नाही देऊ देणार त्यांना... त्यांनी किती त्रास काढला आपल्यासाठी आणि आपण असे वागायचे म्हणजे..' " अरे! मग त्यांना अशाच त्रासात ठेवणार का कायम, डॉक्‍टर द्या ते इंजेक्‍शन', इति मोठा. शेवटी ते इंजेक्‍शन दिले असावे. मला टोचल्यासारखे वाटले. मग छान गार झोप लागली. नाहीतरी अलिकडे त्रास वाढलाच होता माझा. जीवाला शांतता अशी ती नव्हतीच. बरं केलं ते इंजेक्‍शन दिलं.... आणि म्हणून मला आज असे छान थंड वाटतेय ! पण मग हालचाल तर काहीच कशी करता येत नाहीये?&lt;br /&gt;&lt;br /&gt;"तुप चोळा म्हणजे वास येणार नाही ' कुणीतरी बोलतंय बहुतेक ! असे कसलं तुप, कसला वासऽ काही कळत नाही ! आणि हे काय माझ्या अंगाला हे काय चोळतंय कोणी. अरे तुपंच की हे! अरे अरेऽ हे काय चाललंय. म्हाताऱ्याची चेष्टा करताय की काय? आवाज आता वाढत चाललाय. खूप माणसं आजूबाजूला जमली असावीत. पण माझे डोळे का उघडत नाहीयेत?&lt;br /&gt;&lt;br /&gt; "पाणी तापलंय? झाली सर्व तयारी ! आणा बाहेर त्यांना ' असे काहीसं बोलतंय कुणी? अरेऽऽऽ हे कायऽऽ मला उचलंत कशासाठी? आधी मी म्हातारा म्हणून इथे आणून टाकले आणि आता मला बाहेर फेकून देता की काय? अरे हे काय चाललेय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;"बसवा त्यांना पाटावर...धरा रे त्याबाजूने कुणीतरी... सांभाळून... पाणी घाला'... काय काय ऐकायला येतंय. अरे हे काय अंगावर गरम पाणी का टाकताय माझ्या. जीवाचे हाल चालवलेत रे.. बहुतेक मला आंघोळ घालत असावेत. पण मग मला उठता का येत नाही आणि डोळेही उघडता येत नाहीत. पण एक चांगले झाले की मला आंघोळ घातली. डॉक्‍टरने सांगितली असावी बहुदा! नाहीतरी मला अवघडल्यासारखंच झालं होतंऽ आता आंघोळीने बरं वाटेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला झोपवतेय कुणीतरी. पण हे अंगाला टोचतयं का? आणि माझे हातपाय असे का बांधताय? अरेऽ आप्पाऽऽ, अरे नानाऽऽ हे काय चाललेय ! असहाय म्हाताऱ्याचा खेळ चालवलाय का रे हा. कुणीतरी बघा रेऽ हे काय चाललेय ते !&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी आता बऱ्याच वेळापासून शांत पडलोय. आवाजही आता कमी झालेत. पण असे मंत्रांसारखे ध्वनी मात्र कानावर पडतायेत. या वयात काय काय भास होतात. आऽ आईऽ आऽऽ ईऽऽऽऽऽ गं ! अरे हे काय तोंडाला चटका का दिला कोणी? आता मात्र फार झालं ! म्हाताऱ्या माणसाचा आवाज दाबण्यासाठी चक्क त्याला चटका? कुठे फेडाल रे हे पाप तुम्ही.... आणि माझ्या अंगावर हे जड ओझं कसलं ते? काही तरी उबदार आणि गरम लागतेय. बापरे? खूपच उष्णता वाटतेय. जळाल्यासारखी? कुऽ कुठून आली ही उष्णता, सर्व अंगभर पसरतेय ती माझ्या आणि, आणि माझ्या डोक्‍यापर्यंत आली ही आगऽ ! आऽऽ वाचवा ! आईऽऽ आऽऽऽऽईऽऽ आऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ..... !&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;......आणि मोठ्याने "फट ' असा आवाज होतो. " कवटी फुटली वाटतं' उपस्थितांपैकी कुणीतरी बोलतं... "आप्पा, नाना, बस्स करा आता' आता परतायला हवं' आणखी कुणीतरी बोलतं.... हळू हळू त्याठिकाणी शांतता पसरते, प्रचंड शांतता! भयाण शांतता!! मृत्यांगणातली स्मशान शांतता!!!.&lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115192659162634230?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115192659162634230/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115192659162634230&amp;isPopup=true' title='3 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115192659162634230'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115192659162634230'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/07/blog-post.html' title='मृत्यांऽगण !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115079020260110264</id><published>2006-06-20T16:53:00.001+09:00</published><updated>2006-06-20T16:56:57.003+09:00</updated><title type='text'>एका खेडूताचा ब्लॉग</title><content type='html'>गावच्या बाता, गावाकडल्या गोष्टी, गावच्या आठवणी आणि इतर बऱ्याच गोष्टींची देवाण घेवाण करणारा एका खेडूताचा ब्लॉग&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115079020260110264?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115079020260110264/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115079020260110264&amp;isPopup=true' title='1 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115079020260110264'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115079020260110264'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/06/blog-post_20.html' title='एका खेडूताचा ब्लॉग'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-29976021.post-115079019216105046</id><published>2006-06-20T16:53:00.000+09:00</published><updated>2006-06-29T15:37:00.246+09:00</updated><title type='text'>भागाई !</title><content type='html'>तसं बघितलं तर भागाईचं या जगात कुणीही नव्हतं. नाही म्हणायला दोन-तीन बकऱ्या सोबतीला होत्या. मी प्रथम तिला बघितलं तेव्हा तिचे पहिले दर्शन खाष्ट म्हातारी असेच झाले.तिच्या खाष्टपणामागे दडलेली इतरांविषयीची काळजी आणि प्रेमळपणा लक्षात येण्याजोगे माझे वय नव्हते. 3री किंवा 4 थीत असेल मी! तरीही मी जरा तिच्यापासून फटकून आणि घाबरुनच राहत असे. भागाईचे घर साधे मातीचे आणि धाबे असलेले असे होते. घराच्या पुढच्या दरवाज्याला एक छोटेसे फाटकही होते. आणि घरासमोरील जोतं इतक्‍या उंचीचं होतं की आम्हा लहान मुलांना त्यावरून चटकन उड्या मारता येऊ नये. आपल्या घराच्या उंबऱ्यात भागाई तिच्या समवयस्कांशी किंवा गल्लीतील बायकांशी बोलत बसलेली दिसे. या बाईचे व्यक्तिमत्व तसे साधेच. सुरकुतलेला चेहरा वय झाल्याचे व पूर्वीचे दिवस कष्टात गेल्याचे स्पष्ट दाखवित असे. दोन लुगड्यांच्या तुकड्यांपासून तयार केलेले ( दांड मारलेले) लुगडे भागाई नेसत असे. तिची गरिबी त्या फाटक्‍या कपड्यातून स्पष्ट डोकावून जात. भागाईला भागाई हे नाव कसे पडले किंवा तिचे मूळ नाव आडनांव काय हे माहित नाही परंतु लहानांपासून म्हाताऱ्याकोताऱ्यांपर्यंत सर्वच लोक तिला भागाई या नावानेच ओळखत असत. तसा माझा आणि या भागाईचा संबंध फारच कमी येत असे. कारण एक तर ही म्हातारी अतिशय तोंडाळ होती. त्यामुळे ती कधी काय बोलेल ते सांगता येत नसे. त्यामुळे माझ्यासह माझे समवयस्क मित्र म्हातारीपासून जाणूनबुजून चार हात दूरच राहत असू. सुरुवातीला या म्हातारीविषयी आमची ही भावना होती. पण नंतर नंतर मात्र तिची बऱ्यापैकी ओळख की सवय झाल्याने तिच्याशी अधनंमधनं बोलणंही होत असे. एकदा अशाच एका बोलण्यात तिने सांगितले की ती रहात असलेल्या त्या खेड्यातून जवळच असलेल्या नाशिकला उभ्या हयातीत कधी गेलीच नाही. पंचवटीतील काळाराम बघण्याची तिला फार इच्छा होती असे तिच्या बोलण्यातून जाणवले. आम्हाला मात्र नवल वाटले. एक व्यक्ति आपले सर्व आयुष्य एका गावात काढूच कसे शकते? याचे.एकदा आम्ही चेंडू खेळत असताना तो नेमका भागाई राहात असलेल्या पाठीमागील अंगणात गेला. आता मोठा प्रश्‍न निर्माण झाला आमच्यापुढे. वाघाच्या गुहेत शिरायचे कोणी याचा! शेवटी हिय्या करुन मीच भागाईच्या घरात गेलो. दोन खणाचे लहानसे पण आतून व्यवस्थित शाकारलेले असे ते घर होते. लहानशा भिंतीने घराचे दोन भाग केलेले होते. बाहेरच्या भागात एक दोन शेळ्या घास खात होत्या आणि कोपऱ्यात एके ठिकाणी एक-दोन जुन्या गोधड्या आणि मळकट उशी इतक्‍याच वस्तू ठेवलेल्या होत्या. दरवाजाच्या बाजूला एक काठी आणि एक प्लॅस्टिकच्या बुटांचा जोड ठेवलेला होता. पुरुषाच्या पायाचे ते बुट होते आणि पूर्वीच्या काळी आठवडे बाजारातून मिळायचे तसे ते पिवळसर लाल रंगाचे स्वस्त असे बूट होते. आतील खोल्यात एका कोनाड्यात एक पाळणेवजा देवघर आणि त्यात दोनचार दगड गोटे काही देवांचे टाक अशी सामुग्री होती. एखादी गाथा किंवा हरिपाठाचे पुस्तकही असावे. म्हातारी वारकरी होती. रोज बुक्का लावायची. अर्थात ती गंगा भागीरथी कधीच झालेली असावी. कारण ती तशी एकटीच होती. असो. शेवटी तो चेंडू मी मिळवला पण म्हातारीचे ते घर मात्र माझ्या कायमचे डोक्‍यात घर करून राहिले.दिवस असेच जात राहिले. मीही आता 5 वी, सहावीत गेलो असेल. उन्हाळ्याच्या सुटीला नुकतीच सुरुवात झाली होती. दुपारची वेळ होती. मी घरात पलंगावर नुसताच लोळत पडलेलो होतो. दुपारी साडेबारा दीडच्या सुमारास बाहेर हातगाडी घेऊन भंगारवाला आला. सहज गंमत म्हणून मी त्याच्या हालचालींकडे आणि त्याच्याशी होणाऱ्या बाजूच्या लोकांच्या बोलाचालीकडे बघत होतो. इतक्‍यात समोरुन भागाई बाहेर आली तिच्या हातात काही वस्तू होत्या. भंगारवाल्याला त्या देवून काही चार आठ आणे मिळाले तर बरे हा त्यामागचा स्पष्ट उद्देश होता. एक दोन वस्तूंचे वजन झाल्यावर म्हातारीने एक बुटाचा जोड भंगारवाल्याला दिला. तोच जोड जो मी म्हातारीच्या घरी कोपऱ्यात पाहिला होता. आता मी जास्तच कुतुहलाने तिकडे पाहू लागलो. त्यांच्या बोलाचाली वाढायला लागल्या. भंगारवाल्याने बुटाचे आठ आणे द्यायचे कबूल केले. पण म्हातारी मात्र ऐकायला तयार नव्हती. ती जास्त पैसे मागत होती. किमान एक-दीड रुपया तरी असावा.भंगारवाला भागाईच्या ओळखीचा असावा. शेवटी वैतागून म्हणाला "भागाई तुम्ही येवड्या का मागं लागता ? या जुन्या बुटाचे मी तरी किती देणार?' त्याचे बोलणे ऐकले मात्र भागाईच्या चेहऱ्याचे रंग बदलत गेले. आवाज थोडा क्षीण झाला आणि काहीशा समजावणीच्या आणि काहीशा गदगदलेल्या स्वरात ती म्हणाली, भाऊ अरे ही माझ्या म्हाताऱ्याची शेवटची आठवणंय रे ! म्हातारीच्या या बोलण्याचा त्या भंगारवाल्यावर काय परिणाम झाला माहित नाही परंतु माझ्या काळजात मात्र चरर्र झाल्यासारखे वाटले. हा प्रसंग मनात कायमचा कोरला गेला. त्या दिवसापासून भागाईकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पूर्ण बदलला. म्हणजे म्हातारीची परिस्थिती इतकी खालावली होती की नवऱ्याची प्रेमाने जपून ठेवलेली आठवण, त्याचे जोडे तिला अखेर भंगारवाल्याकडे विकायला काढावे लागले. आजही हा प्रसंग मनात ताजा आहे. त्याकडे जेव्हा बघतो तेव्हा वाटते की गरिबांना आठवणी जपण्याचाही अधिकार आहे की नाही? वडिलांच्या बदलीमुळे मी सातवीत असताना ते गाव आम्हाला सोडावे लागले. त्यानंतर चार-पाच वर्षांनी त्या गावी पुन्हा जाण्याचा योग आला. भागाई राहात होती त्या घराकडे अवश्‍य गेलो. तिथे आता कुलूप होते. भागाई हयात होती की नव्हती कळाले नाही. पण त्या घराकडे बघताना भागाईचे तेच शब्द मात्र माझ्या मनात पुन्हा उफाळून आले, ""भाऊ अरे ही माझ्या म्हाताऱ्याची शेवटची आठवणंय रे !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/29976021-115079019216105046?l=gavwala.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://gavwala.blogspot.com/feeds/115079019216105046/comments/default' title='टिप्पणी पोस्ट करा'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=29976021&amp;postID=115079019216105046&amp;isPopup=true' title='4 टिप्पण्या'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115079019216105046'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/29976021/posts/default/115079019216105046'/><link rel='alternate' type='text/html' href='http://gavwala.blogspot.com/2006/06/blog-post.html' title='भागाई !'/><author><name>Pankaj Joshi</name><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry></feed>
